शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील नऊ मध्यम व १२ लघुसिंचन प्रकल्प प्रशासकीय अडचणीमुळे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार पाडवी यांनी त्यांच्याशी ...

राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार पाडवी यांनी त्यांच्याशी याप्रकरणी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात नऊ मध्यम प्रकल्प व १२ लघु पाटबंधारे याेजना असे विविध ठिकाणांचे असे २१ लहान- मोठे सिंचन प्रकल्प निधीअभावी व सुधारित प्रशासकीय मान्यताअभावी रखडलेले आहेत. साहजिकच यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा हजारो हेक्टर सिंचनाचा प्रश्नदेखील तसाच प्रलंबित आहे. यात नर्मदा नदी वळण योजना, उकाई धरणातील जलाशय, देहली, कोरडी, नागण अशा मोठ्या प्रकल्पांबरोबरच इच्छागाव्हण, धनपूर, रापापूर, सुसरी हरिमोळ असा प्रकल्पांचा समावेश आहे. नर्मदा नदीवळण योजना २०११ पासून प्रस्तावित आहे. यासाठी एक हजार ५३३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे नर्मदा जल लवादाच्या निर्णयानुसार साधारण १०.८९ अब्ज पाण्यापैकी पाच अब्ज घनफूट पाणी तापी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित आहे. त्यामुळे या कामालाही चालना देण्यात यावी. त्याचबरोबर उकई धरणाच्या बॅक वाॅटरमधून पाच अब्ज घनफूट पाणी उचलून यात अंदाजे तीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेमुळे नंदुरबारसह तळोदा, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याच्या फायदा होणार आहे. यासाठी ६८९ कोटी रुपयांची आवश्यकता असून, प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पडून आहे. वास्तविक २०१५ मध्ये शासनस्तरावर सामंजस्य करारदेखील झाला आहे. यावरही तातडीने कार्यवाही व्हावी. शिवाय देहाली, कोरडी, नागन हे मध्यम प्रकल्प किरकोळ कामांच्या निधीअभावी रखडले आहेत. कोरडी प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्णही झाले आहे. नागान मध्यम प्रकल्पासाठी १८०.२९ लाखांच्या निधीचा प्रस्ताव शासनदरबारी नवीन सुधारित मान्यतेकरिता पडून आहे. तळोदा तालुक्यातील इच्छगव्हाण, रापापूर हे लघु पाटबंधारे निधीसाठीच रखडले आहेत. त्यांचा सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावदेखील शासनास सादर केला आहे. परंतु, त्यावर अजून कार्यवाही करण्यात आलेली नाही. यात नवीन भूसंपादन व बुडीत कुटुंबांना मोबदला देणे बाकी आहे. शहादा तालुक्यातील सुसरी धरणाचा कालवा व वितरकांची कामे शिल्लक राहिल्यामुळे भूसंपादनअभावी रखडलेले आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यातील या सर्व पाणी योजनांची कामे शासन स्तरावरील कार्यवाहीअभावी रखडली असून, आदिवासी शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या मोठा अनुशेष बाकी आहे. आपल्या स्तरावर रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची चौकशी करून संबंधित यंत्रणांना कार्यवाहीची सूचना द्यावी. जेणेकरून शेतकऱ्यांचा हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे.

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तांत्रिक अडचणी, अंदाजपत्रके, भूसंपादन व निधीअभावी त्या-त्या विभागात प्रलंबित असून यावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. सदर प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. - उदेसिंग पाडवी, माजी आमदार.