शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

जिल्ह्यात पुढचे १५ दिवसही पावसाचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST

नंदुरबार : जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत तीव्र स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. दरम्यान ...

नंदुरबार : जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत तीव्र स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. दरम्यान २१ ऑगस्टनंतरही १५ दिवस जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळत राहणार असल्याने शेतीपिकांची चिंता मिटणार आहे.

जिल्ह्यात १७ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. जून ते ऑगस्ट मध्य या काळात कोरडे दिवसच अधिक असल्याने शेतीपिके हातची गेली होती. परंतू दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जुलै महिन्यात पेरणी केलेल्या सर्व पिकांना जीवदान मिळाले आहे. आगामी तीन दिवसात आणखी पाऊस कोसळणार असल्याने कापूस, सोयाबीन यासह धान्य, कडधान्य आणि बागायती पिकांनाही पूर्णपणे लाभ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

२१ ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी त्यापुढे १५ दिवसही पाऊस तुरळक स्वरुपात हजेरी लावणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कृषी हवामान तज्ञ सचिन फड यांनी वर्तवला आहे.

१७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ यादरम्यान नंदुरबार तालुक्यात ६३ मिलीमीटर, शहादा ४४, अक्कलकुवा ४८, नवापूर ३०, धडगाव ३२ तर तळोदा तालुक्यात ४५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ ते १९ रोजी सकाळी साडेआठ या वेळेत नंदुरबार तालुक्यात १५, शहादा १५, अक्कलकुवा ६, नवापूर २५ तर धडगाव आणि तळोदा तालुक्यात प्रत्येकी ५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.