शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुढचे १५ दिवसही पावसाचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST

नंदुरबार : जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत तीव्र स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. दरम्यान ...

नंदुरबार : जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत तीव्र स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. दरम्यान २१ ऑगस्टनंतरही १५ दिवस जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळत राहणार असल्याने शेतीपिकांची चिंता मिटणार आहे.

जिल्ह्यात १७ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. जून ते ऑगस्ट मध्य या काळात कोरडे दिवसच अधिक असल्याने शेतीपिके हातची गेली होती. परंतू दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जुलै महिन्यात पेरणी केलेल्या सर्व पिकांना जीवदान मिळाले आहे. आगामी तीन दिवसात आणखी पाऊस कोसळणार असल्याने कापूस, सोयाबीन यासह धान्य, कडधान्य आणि बागायती पिकांनाही पूर्णपणे लाभ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

२१ ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी त्यापुढे १५ दिवसही पाऊस तुरळक स्वरुपात हजेरी लावणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कृषी हवामान तज्ञ सचिन फड यांनी वर्तवला आहे.

१७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ यादरम्यान नंदुरबार तालुक्यात ६३ मिलीमीटर, शहादा ४४, अक्कलकुवा ४८, नवापूर ३०, धडगाव ३२ तर तळोदा तालुक्यात ४५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ ते १९ रोजी सकाळी साडेआठ या वेळेत नंदुरबार तालुक्यात १५, शहादा १५, अक्कलकुवा ६, नवापूर २५ तर धडगाव आणि तळोदा तालुक्यात प्रत्येकी ५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.