शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

ताप्ती सेक्शनवर नव्याने दोन मेमू ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:27 IST

नंदुरबार : : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्यानंतर आता या मार्गावर प्रवासी गाडय़ांची संख्या वाढू लागली ...

नंदुरबार : : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्यानंतर आता या मार्गावर प्रवासी गाडय़ांची संख्या वाढू लागली आहे. मुंबई-सुरत-अहमदाबाद या व्यस्त रेल्वे लाईनवरील अनेक प्रवासी गाडय़ा आता नंदुरबार, भुसावळमार्गे वळविण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार-उधना व उधना-जळगाव अशा दोन नवीन मेमू ट्रेन देखील लवकरच या मार्गावर सुरू होणार आहेत. मुंबईसाठी देखील बांद्रा-मुंबई ही एक्सप्रेस नंदुरबारमार्गे सुरू होत आहे.पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणारा महत्वाचा ठरलेला सुरत-भुसावळ रेल्वे मार्गाचे नुकतेच दुहेरीकरण पुर्ण झाले आहे. या मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा कमी भार लक्षात घेता व्यस्त रेल्वे मार्गावरील अनेक प्रवासी गाडय़ा या मार्गावर आता वळविण्यात आल्या आहेत. काही नवीन प्रवासी रेल्वेगाडय़ा देखील सुरू करण्यात येत आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला जिल्ह्यातील लोकांचे सुरत, वापी, बलसाड, उधनाशी नाते जोडले गेले आहे. या जिल्ह्यंमधील अनेक कुटूंबे वर्षानुवर्ष सुरत, उधना या भागात उद्योगधंदे, रोजगारानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यामुळे भुसावळ-सुरत या पॅसेंजर रेल्वेला नेहमीच मोठा प्रतिसाद असतो. ही बाब लक्षात    घेता या मार्गावर सर्वसामान्यांना  प्रवास दर परवडेल अशा पद्धतीने नवीन रेल्वेगाडय़ा देखील सुरू करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दोन नवीन मेमू ट्रेन येत्या काळात सुरू होत आहेत.सुरत-नंदुरबार ही मेमू ट्रेन गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. रात्री साडेअकरा वाजता ही मेमू ट्रेन नंदुरबारला येते. पहाटे 2.20 वाजता ती सुरतकडे रवाना होते. या प्रवासी गाडीला मोठा प्रतिसाद आहे. या व्यतिरिक्त आता आणखी दोन मेमू ट्रेन या मार्गावर सुरू होत आहेत. त्यात उधना-नंदुरबार व उधना-जळगाव या मेमू ट्रेनचा समावेश आहे. उधना-नंदुरबार ही ट्रेन सकाळी 6.25 वाजता उधनाहून निघेल व 12.15 वाजता नंदुरबारला पोहचणार आहे. तर नंदुरबारहून दुपारी 1 वाजता उधनाकडे रवाना होईल. याशिवाय उधना-जळगाव ही ट्रेन सकाळी 10.20 वाजता निघेल तर जळगावहून मध्यरात्री 12.45 वाजता उधनाकडे निघणार आहे.  दररोज ही ट्रेन धावणार आहे. एकुण सर्वसाधारण श्रेणीच्या 12 डब्यांची रेल्वे राहणार आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या मुंबईसाठीच्या नवीन एक्सप्रेसला देखील मंजुरी मिळाली असून लवकरच ती धावणार आहे. बांद्रा-भुसावळ अशी ही एक्सप्रेस राहणार आहे. ती दररोज धावणार असून तिचे शेडय़ूल देखील तयार करण्यात आले आहे. ही एक्सप्रेस उधना व सुरत स्थानकांवर न जाता चलथानपासून मुंबई-दिल्ली रेल्वेमार्गाला जोडून भेस्तानमार्गे मुंबईकडे जाणार आहे. यामुळे जळगाव, अमळनेर, नंदुरबारहून मुंबईकडे जाणा:या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय येत्या काळात आणखी काही नवीन प्रवासी रेल्वेगाडय़ा  या मार्गावरून धावणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.