शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

ताप्ती सेक्शनवर नव्याने दोन मेमू ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:27 IST

नंदुरबार : : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्यानंतर आता या मार्गावर प्रवासी गाडय़ांची संख्या वाढू लागली ...

नंदुरबार : : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्यानंतर आता या मार्गावर प्रवासी गाडय़ांची संख्या वाढू लागली आहे. मुंबई-सुरत-अहमदाबाद या व्यस्त रेल्वे लाईनवरील अनेक प्रवासी गाडय़ा आता नंदुरबार, भुसावळमार्गे वळविण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार-उधना व उधना-जळगाव अशा दोन नवीन मेमू ट्रेन देखील लवकरच या मार्गावर सुरू होणार आहेत. मुंबईसाठी देखील बांद्रा-मुंबई ही एक्सप्रेस नंदुरबारमार्गे सुरू होत आहे.पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणारा महत्वाचा ठरलेला सुरत-भुसावळ रेल्वे मार्गाचे नुकतेच दुहेरीकरण पुर्ण झाले आहे. या मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा कमी भार लक्षात घेता व्यस्त रेल्वे मार्गावरील अनेक प्रवासी गाडय़ा या मार्गावर आता वळविण्यात आल्या आहेत. काही नवीन प्रवासी रेल्वेगाडय़ा देखील सुरू करण्यात येत आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला जिल्ह्यातील लोकांचे सुरत, वापी, बलसाड, उधनाशी नाते जोडले गेले आहे. या जिल्ह्यंमधील अनेक कुटूंबे वर्षानुवर्ष सुरत, उधना या भागात उद्योगधंदे, रोजगारानिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यामुळे भुसावळ-सुरत या पॅसेंजर रेल्वेला नेहमीच मोठा प्रतिसाद असतो. ही बाब लक्षात    घेता या मार्गावर सर्वसामान्यांना  प्रवास दर परवडेल अशा पद्धतीने नवीन रेल्वेगाडय़ा देखील सुरू करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दोन नवीन मेमू ट्रेन येत्या काळात सुरू होत आहेत.सुरत-नंदुरबार ही मेमू ट्रेन गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. रात्री साडेअकरा वाजता ही मेमू ट्रेन नंदुरबारला येते. पहाटे 2.20 वाजता ती सुरतकडे रवाना होते. या प्रवासी गाडीला मोठा प्रतिसाद आहे. या व्यतिरिक्त आता आणखी दोन मेमू ट्रेन या मार्गावर सुरू होत आहेत. त्यात उधना-नंदुरबार व उधना-जळगाव या मेमू ट्रेनचा समावेश आहे. उधना-नंदुरबार ही ट्रेन सकाळी 6.25 वाजता उधनाहून निघेल व 12.15 वाजता नंदुरबारला पोहचणार आहे. तर नंदुरबारहून दुपारी 1 वाजता उधनाकडे रवाना होईल. याशिवाय उधना-जळगाव ही ट्रेन सकाळी 10.20 वाजता निघेल तर जळगावहून मध्यरात्री 12.45 वाजता उधनाकडे निघणार आहे.  दररोज ही ट्रेन धावणार आहे. एकुण सर्वसाधारण श्रेणीच्या 12 डब्यांची रेल्वे राहणार आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या मुंबईसाठीच्या नवीन एक्सप्रेसला देखील मंजुरी मिळाली असून लवकरच ती धावणार आहे. बांद्रा-भुसावळ अशी ही एक्सप्रेस राहणार आहे. ती दररोज धावणार असून तिचे शेडय़ूल देखील तयार करण्यात आले आहे. ही एक्सप्रेस उधना व सुरत स्थानकांवर न जाता चलथानपासून मुंबई-दिल्ली रेल्वेमार्गाला जोडून भेस्तानमार्गे मुंबईकडे जाणार आहे. यामुळे जळगाव, अमळनेर, नंदुरबारहून मुंबईकडे जाणा:या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय येत्या काळात आणखी काही नवीन प्रवासी रेल्वेगाडय़ा  या मार्गावरून धावणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.