शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

नवापूरात आंतरराष्ट्रीय परिषद : आदिवासी हेच या जगाचे खरे रहिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : जागतिक पातळीवर आदिवासी समाजाचा मोठा हिस्सा सांस्कृतिक स्तरावर संपन्न आहे. असे असतांनाही हा वर्ग मुख्य प्रवाहापासुन दुर असल्याचे मत आमदार सुरूपसिंग नाईक यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले.  येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आधुनिक जगातील आदिवासी समुदायाचे राजकारण या विषयावर आयोजित परिषदेत अध्यक्षस्थानावरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : जागतिक पातळीवर आदिवासी समाजाचा मोठा हिस्सा सांस्कृतिक स्तरावर संपन्न आहे. असे असतांनाही हा वर्ग मुख्य प्रवाहापासुन दुर असल्याचे मत आमदार सुरूपसिंग नाईक यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले.  येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आधुनिक जगातील आदिवासी समुदायाचे राजकारण या विषयावर आयोजित परिषदेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.  परिषदेचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष नाईक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष  डॉ. पी. डी. देवरे, नागपूरचे डॉ. मोहन काशिकर, नगराध्यक्षा हेमलता पाटील, संस्थेचे मानद सचिव अजित नाईक, तानाजीराव वळवी, सहसचिव मधुकर नाईक, अजय पाटील, संचालक विनोद नाईक, जी. के. पठाण, अमृत पाडवी, डॉ. शुभदा ठाकरे, नेपाळच्या डॉ. इंद्रा अधिकारी, डॉ. निर्मला उपरेती, बांगलादेशचे डॉ. खसरुल आलम कुद्दुसी काझी  व्यासपीठावर उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या विकासाचे चित्र जागतिक संशोधनाचा विषय झाला आहे याचे समाधान असल्याचे सांगून आमदार नाईक पुढे म्हणाले, आदिवासी हे या जगाचे खरे रहिवासी आहेत. जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग त्यांनी व्यापला असल्याचे ते म्हणाले. शिरीष नाईक यांनी  पर्यावरण पुरक सांस्कृतिक ठेवा जतन करूनही आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासुन आजही लांब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. मोहन काशिकर यांनी सांगितले, भारताचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण अनेक अंगांनी सातत्याने बदलत आहे. आधुनिक काळात बदलती परिस्थिती लक्षात घेता घटनात्मक बदल अपेक्षित असल्याचे सांगून बदलाची ही प्रक्रिया स्थानिक पातळीवरुन झाल्यास राजकारणात सकारात्मक बदल शांततेत घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधुनिक काळात सध्याच्या शासनाने क्रांतीकारक बदल सुचवून विकासाचे धोरण लाऊन धरले असले तरी गत 60 वर्षाचा विकासाचा पाया विसरुन चालणार नाही असे डॉ. पी. डी. देवरे यांनी सांगितले. नवापूर तालुक्यासह जिल्ह्यातील आदिवासी जनतेचा झालेल्या विकासात अधिकची भर टाकण्याची गरज व्यक्त करतांना  विकासाची ही गरज अविकसित भागासाठी आवश्यक असल्याचे मत डॉ. गिरीष राणा यांनी व्यक्त केले.  याप्रसंगी परिषदेत सादर झालेल्या संशोधन पेपरचे संकलन केलेले ट्रायबल कम्युनिटी अॅण्ड सोशियो पॉलिटीकल थॉट, रिसेंट पॉलिटीकल डेव्हलपमेंट इन इंडिया, परिषद स्मरणिका व विचार मंथन या चार पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल यांनी प्रास्तविक करुन अतिथींचे स्वागत केले. स्वागतपर मनोगत परिषदेचे संयोजक उपप्राचार्य ए. बी. महाजन यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. आय. जी. पठाण व प्रा. सुरेखा बनसोडे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. वाय. जी. भदाणे यांनी आभार मानलेत.