शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरात आंतरराष्ट्रीय परिषद : आदिवासी हेच या जगाचे खरे रहिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : जागतिक पातळीवर आदिवासी समाजाचा मोठा हिस्सा सांस्कृतिक स्तरावर संपन्न आहे. असे असतांनाही हा वर्ग मुख्य प्रवाहापासुन दुर असल्याचे मत आमदार सुरूपसिंग नाईक यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले.  येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आधुनिक जगातील आदिवासी समुदायाचे राजकारण या विषयावर आयोजित परिषदेत अध्यक्षस्थानावरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : जागतिक पातळीवर आदिवासी समाजाचा मोठा हिस्सा सांस्कृतिक स्तरावर संपन्न आहे. असे असतांनाही हा वर्ग मुख्य प्रवाहापासुन दुर असल्याचे मत आमदार सुरूपसिंग नाईक यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले.  येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आधुनिक जगातील आदिवासी समुदायाचे राजकारण या विषयावर आयोजित परिषदेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.  परिषदेचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष नाईक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष  डॉ. पी. डी. देवरे, नागपूरचे डॉ. मोहन काशिकर, नगराध्यक्षा हेमलता पाटील, संस्थेचे मानद सचिव अजित नाईक, तानाजीराव वळवी, सहसचिव मधुकर नाईक, अजय पाटील, संचालक विनोद नाईक, जी. के. पठाण, अमृत पाडवी, डॉ. शुभदा ठाकरे, नेपाळच्या डॉ. इंद्रा अधिकारी, डॉ. निर्मला उपरेती, बांगलादेशचे डॉ. खसरुल आलम कुद्दुसी काझी  व्यासपीठावर उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या विकासाचे चित्र जागतिक संशोधनाचा विषय झाला आहे याचे समाधान असल्याचे सांगून आमदार नाईक पुढे म्हणाले, आदिवासी हे या जगाचे खरे रहिवासी आहेत. जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग त्यांनी व्यापला असल्याचे ते म्हणाले. शिरीष नाईक यांनी  पर्यावरण पुरक सांस्कृतिक ठेवा जतन करूनही आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासुन आजही लांब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. मोहन काशिकर यांनी सांगितले, भारताचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण अनेक अंगांनी सातत्याने बदलत आहे. आधुनिक काळात बदलती परिस्थिती लक्षात घेता घटनात्मक बदल अपेक्षित असल्याचे सांगून बदलाची ही प्रक्रिया स्थानिक पातळीवरुन झाल्यास राजकारणात सकारात्मक बदल शांततेत घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधुनिक काळात सध्याच्या शासनाने क्रांतीकारक बदल सुचवून विकासाचे धोरण लाऊन धरले असले तरी गत 60 वर्षाचा विकासाचा पाया विसरुन चालणार नाही असे डॉ. पी. डी. देवरे यांनी सांगितले. नवापूर तालुक्यासह जिल्ह्यातील आदिवासी जनतेचा झालेल्या विकासात अधिकची भर टाकण्याची गरज व्यक्त करतांना  विकासाची ही गरज अविकसित भागासाठी आवश्यक असल्याचे मत डॉ. गिरीष राणा यांनी व्यक्त केले.  याप्रसंगी परिषदेत सादर झालेल्या संशोधन पेपरचे संकलन केलेले ट्रायबल कम्युनिटी अॅण्ड सोशियो पॉलिटीकल थॉट, रिसेंट पॉलिटीकल डेव्हलपमेंट इन इंडिया, परिषद स्मरणिका व विचार मंथन या चार पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल यांनी प्रास्तविक करुन अतिथींचे स्वागत केले. स्वागतपर मनोगत परिषदेचे संयोजक उपप्राचार्य ए. बी. महाजन यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. आय. जी. पठाण व प्रा. सुरेखा बनसोडे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. वाय. जी. भदाणे यांनी आभार मानलेत.