शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

जलयुक्तच्या कामांबाबत तळोद्यात उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांबाबत उदासिनता दिसून येत आह़े जलसंधारण, सामाजिक वनीकरण व जीवन प्राधिकारणाकडून एकही काम  घेण्यात आले नसल्याचे समजत़ेतालुका प्रशासनाकडून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामांसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला असला तरी, हा प्रस्ताव पहिला तर वरील तिन्ही यंत्रणा या कामांबाबत उदासीन असल्याचे दिसून येत़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांबाबत उदासिनता दिसून येत आह़े जलसंधारण, सामाजिक वनीकरण व जीवन प्राधिकारणाकडून एकही काम  घेण्यात आले नसल्याचे समजत़ेतालुका प्रशासनाकडून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कामांसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला असला तरी, हा प्रस्ताव पहिला तर वरील तिन्ही यंत्रणा या कामांबाबत उदासीन असल्याचे दिसून येत़े या विभागांनी एकही काम घेतली नसल्याचे समजत़े त्यासोबतच इतरांनीदेखील अतिशय कमी कामे घेतल्याचे चित्र आहे.भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करुन पाणी टंचाईवर कायम स्वरूपी मात करण्यासाठी शासनाने 2015 पासून ‘जलयुक्त शिवार’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. संपूर्ण राज्यात ही योजना राबविली जात आहे. तथापि तळोदा तालुक्यात पाणी टंचाई सदृश्य स्थिती नसल्याने पहिल्या वर्षी तालुक्यास या योजनेतून वगळण्यात आले होत़े साहजिकच ग्रामीण भागातील आदिवासी जनतेमध्ये याबाबत तीव्र नाराजी पसरली होती. या योजनेत तळोदा तालुक्याचाही समावेश करावा अशी मागणी होती. यासाठी प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधीनी शासनाकडे पाठपुरावा करत योजनेत तळोदा तालुक्याचा समावेश करण्यास भाग पाडले. 2016 मध्ये सुरुवातीस सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा योजनेअंतर्गत  समावेश करत तेथे जलयुक्तची कामे करण्यात आली. तेथे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर गेल्या वर्षी 9 ते 10 गावे या योजनेंतर्गत घेण्यात आली. यंदाही तालुका प्रशासनाने या योजनेसाठी जिल्हा प्रशासनाकडे निविदा प्रस्ताव पाठवले आह़े. या प्रस्तावात तालुका कृषी विभाग, जिल्हा परिषदेचे लघुसिंचन, जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायत, जलसंधारण स्थानिकस्तर, वनविभाग व सामाजिक वनीकरण अशा सात विभागांकडून कामांचे प्रस्ताव मागवण्यात आले होत़े परंतु यातील जलसंधारण, सामाजिक वनीकरण व जीवन प्राधिकरण या तिन्ही यंत्रणांनी यंदा एकही काम घेतले नसल्याचे समजत़े या शिवाय कृषी विभाग व ग्रामपंचायत वगळता इतरांनीदेखील अतिशय कमी कामे घेतल्याची माहिती आहे. जलयुक्तअंतर्गत यंदा एकूण 118 कामे घेण्यात आली आहेत़ त्यातही 16 कामे जुनी आहेत. सर्वात जास्त कामे कृषी विभागाची आह़े नाला खोलीकरण, माती, सिमेंट, बांधाचे खोलीकरण, दुरुस्ती, गाव तलाव,  बंधारे दुरुस्ती, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, वनतळे, बंधारे अशा कामांचा समावेश आहे. वास्तविक या योजनेमुळे तालुक्यात खोलवर गेलेली पाण्याची पातळी मोठय़ा  प्रमाणात वाढून सध्या तरी तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती नसल्याचे चित्र आहे. मात्र काही यंत्रणांनी या योजनेबाबत उदासीन भूमिका घेत शेतक:यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. आजही तालुक्यात जलसंधारणाच्या कामांची गरज आह़े शिवाय वृक्ष लागवडही गरजेची आह़े मात्र या दोन्ही याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. एकीकडे शासन ही योजना यशस्वी करण्यासाठी अथक प्रय} करीत असतांना शासनाचीच दुसरी यंत्रणा याबाबत उदासिन धोरण अंगीकारत आह़े त्यामुळे या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशी करुन संबंधितांना याबाबत जाब विचारणे गरजेचे आह़े