शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

मांडवी परिसरात मोबाइल टॉवर उभारण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

डिजिटल इंडिया म्हणवणाऱ्या भारतातील ग्रामीण भागात अद्यापदेखील अनेक खेडे गावात मोबाइल नेटवर्क नाही. धडगाव तालुक्यातील अनेक गावांना तर अजून ...

डिजिटल इंडिया म्हणवणाऱ्या भारतातील ग्रामीण भागात अद्यापदेखील अनेक खेडे गावात मोबाइल नेटवर्क नाही. धडगाव तालुक्यातील अनेक गावांना तर अजून मोबाइल नेटवर्क मिळत नाही तर डिजिटल केव्हा होणार. तालुक्यातील मांडवी परिसरात मोबाइल टॉवर नसल्याने नेटवर्कअभावी अनेक विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहे. विद्यापीठाच्या परीक्षादेखील ऑनलाइन चालू असल्याने मांडवी परिसरातील विद्यार्थ्यांना अनेकवेळा ऑनलाइन परीक्षेला मुकावे लागत आहे. नेटवर्क नसल्याने ग्रामपंचायतीचे ऑनलाइन कामे, मांडवी आश्रमशाळेतील कामे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक कामात खंड पडत आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थ नाराज आहे.

मांडवी ग्रामपंचायत ही ११ गावाची ग्रुप ग्रामपंचायत आहे. यात बऱ्याच गावात मोबाइल नेटवर्क नाही, गावात सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखादेखील आहे. मात्र अद्याप ही गावात मोबाइल टॉवर नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मांडवी येथे टॉवर उभारण्याची मागणीसाठी ग्रामस्थांकडून वेळोवेळी लोकप्रतिनिधी आणि शासन दरबारी ई-मेल द्वारे अर्ज पाठवून व निवेदनाद्वारे केली जात आहे. मात्र याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप मांडवी व परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गावात सन २०१७ साली खासगी कंपनीकडून टॉवर बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु मांडवी व परिसरातील अनेक गावे वनविभागात येत असल्याने ते काम वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी थांबवले. यावर प्रशासनाने तोडगा काढून नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकरच मोबाइल टॉवरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

मांडवी व परिसरातील नागरिकांकडून येथे बंद झालेल्या खासगी कंपनीच्या टॉवरचे काम पुन्हा चालू करण्यात यावे किंवा भारत दूरसंचार निगम या सरकारी कंपनीचे टॉवर उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.