शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डामरखेडय़ाजवळील पुलाच्या दुरुस्तीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:42 IST

गोमाई नदीवरील पूल : संरक्षक कठडे निकामी, रस्त्यावरही मोठमोठे खड्डे

प्रकाशा : शहादा ते प्रकाशा दरम्यान डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे            पूर्णपणे तुटले असून पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ात अवजड वाहन           आदळले तर पूल हलतो, अशी           स्थिती आहे. त्यामुळे संबंधित विभागाने काही दुर्घटना घडण्याअगोदरच पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे.शहादा तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवर सुमारे 40 वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला दोनवेळा महापुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. आजच्या स्थितीत पुलाची अवस्था फारच बिकट झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे सिमेंटचे असून ते पूर्णपणे तुटले आहेत. या कठडय़ांना धक्का लावताच ते पडतील की काय अशी स्थिती आहे. पुलावरील  रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमध्ये अवजड वाहन आदळले तर पूल अक्षरश: हलतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावर पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाईप काढण्यात आले आहेत. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला व या पाईपांजवळ माती साचल्याने पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. पाऊस झाल्यावर या पुलावर पाण्याचे डबके साचतात. त्यातच खड्डे असल्याने वाहने आदळून अपघातही होतात. पुलाच्या दोन्ही टोकाला अर्धवट भिंती बांधलेल्या आहेत.              या भिंतींना तडे पडून त्या              तिरकस झालेल्या आहेत. पूल ज्या खांबांवर उभा आहे त्या खांबांच्या लोखंडी सळ्याही बाहेर आलेल्या आहेत.या पुलाची पडझड झाली तर या मार्गावरील वाहतूक बंद होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. वाहनचालकांना 70 ते 80 किलोमीटरचा फेरा मारून शहादा, सारंगखेडा, कोपर्ली, नंदुरबारमार्गे वाहतूक करावी लागेल. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून संबंधित विभागाने या पुलाची चांगल्याप्रकारे डागडूजी व दुरुस्ती करण्याची गरज आहे.