शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

डामरखेडय़ाजवळील पुलाच्या दुरुस्तीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:42 IST

गोमाई नदीवरील पूल : संरक्षक कठडे निकामी, रस्त्यावरही मोठमोठे खड्डे

प्रकाशा : शहादा ते प्रकाशा दरम्यान डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे            पूर्णपणे तुटले असून पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ात अवजड वाहन           आदळले तर पूल हलतो, अशी           स्थिती आहे. त्यामुळे संबंधित विभागाने काही दुर्घटना घडण्याअगोदरच पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे.शहादा तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवर सुमारे 40 वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला दोनवेळा महापुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. आजच्या स्थितीत पुलाची अवस्था फारच बिकट झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे सिमेंटचे असून ते पूर्णपणे तुटले आहेत. या कठडय़ांना धक्का लावताच ते पडतील की काय अशी स्थिती आहे. पुलावरील  रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमध्ये अवजड वाहन आदळले तर पूल अक्षरश: हलतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलावर पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाईप काढण्यात आले आहेत. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला व या पाईपांजवळ माती साचल्याने पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. पाऊस झाल्यावर या पुलावर पाण्याचे डबके साचतात. त्यातच खड्डे असल्याने वाहने आदळून अपघातही होतात. पुलाच्या दोन्ही टोकाला अर्धवट भिंती बांधलेल्या आहेत.              या भिंतींना तडे पडून त्या              तिरकस झालेल्या आहेत. पूल ज्या खांबांवर उभा आहे त्या खांबांच्या लोखंडी सळ्याही बाहेर आलेल्या आहेत.या पुलाची पडझड झाली तर या मार्गावरील वाहतूक बंद होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. वाहनचालकांना 70 ते 80 किलोमीटरचा फेरा मारून शहादा, सारंगखेडा, कोपर्ली, नंदुरबारमार्गे वाहतूक करावी लागेल. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून संबंधित विभागाने या पुलाची चांगल्याप्रकारे डागडूजी व दुरुस्ती करण्याची गरज आहे.