शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण व नातेवाईकांची पायपीट थांबण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने सध्या शहादा तालुक्यात गंभीर रुप घेतले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. रुग्ण ...

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने सध्या शहादा तालुक्यात गंभीर रुप घेतले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. रुग्ण संख्या वाढल्याने आणि शासकीय यंत्रणा कमी पडू लागल्याने शहरात अचानक खासगी कोविड सेंटरची संख्या वाढली आहे. यापैकी काही रुग्णालयातून बेड, रेमडेसिविर, व्हेंटिलेटर, पी.पी.ई. किट यांच्या नावाखाली प्रचंड लूट सुरू झाली आहे. रुग्णांचे नातेवाईक पाण्यासारखा पैसा खर्च करून आपल्या माणसाचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न करीत आहेत. खासगी कोविड सेंटरची संख्या वाढूनही रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट मात्र थांबलेली नाही. जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविर डायरेक्ट कोविड सेंटरला पुरविले जातील असे जाहीर करूनही रुग्णांना कोविड सेंटरमध्ये रेमडेसिविर मिळत नसल्याने रेमडेसिविरसाठी पायपीट करावी लागत आहे. रुग्णाला रेमडेसिविर बाहेरून आणल्याशिवाय काही कोविड सेंटर रुग्णास दाखल करून घेत नाहीत. एकतर प्रशासनाकडून सेंटरला पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर मिळत नाहीत किंवा सेंटरमध्येच त्याचा काळाबाजार होत असेल त्यामुळे प्रशासनाने रोज कोणत्या कोविड सेंटरला किती रेमडेसिविर पुरवले, किती रेमडेसिविर उपलब्ध आहेत याची माहिती रोजच्या रोज जाहीर केली पाहिजे.

त्याचप्रमाणे प्रत्येक कोविड सेंटरला एकूण व उपलब्ध बेड किती, एकूण व उपलब्ध व्हेंटिलेटर किती, उपलब्ध रेमडेसिविर किती याची माहिती देणारा फलक लावण्याची सक्ती केली पाहिजे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट थांबेलच पण त्याचबरोबर कोविड सेंटरमधील गैरप्रकारावरही आळा बसू शकेल. ही माहिती कोविड सेंटरकडून रोजच्यारोज सोशल मीडियावरूनही जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला पाहिजे.

तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता शासकीय व खासगी कोविड सेंटरमध्ये बेड, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

शहरातील सर्व कोविड सेंटरचे प्रमुख व तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा अन्य आरोग्य अधिकारी यांचा व्हाॅट्स ॲप ग्रुप तयार करून प्रत्येक कोविड सेंटरने ग्रुपवर रोज सकाळी व संध्याकाळी आपापल्या कोविड सेंटरमधील उपलब्ध बेड, व्हेंटीलेटर, रेमडेसिविर आदी माहिती टाकली व ती माहिती शहरातील इतर ग्रुपवर शेअर केली तर रुग्णांची पायपीट नक्कीच थांबेल व रुग्णांना वेळेवर उपचार मिळून प्राण वाचविता येतील. फक्त गरज आहे ती प्रामाणिक प्रयत्नांची.