शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

‘राष्ट्रवादी’ नव्या दमाने उभी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत 'जे झालं ते गंगेला न्हाल' असे समजून पुन्हा कार्यकर्त्यांनी नव्या दमाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत 'जे झालं ते गंगेला न्हाल' असे समजून पुन्हा कार्यकर्त्यांनी नव्या दमाने पक्ष कार्यासाठी लागावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी अनिल गोटे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी व्यासपीठावरील पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून पक्षाशी प्रामाणिक राहण्याच्या निर्धार केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी भगवती लॉन्स येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी केले. व्यासपीठावर निरीक्षक नाना महाले,अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव मुख्तार शेख, जितेंद्र मराठे, राजू पाटील, माधव चौधरी, दादा कापडणीस, सुरेंद्र कुवर, पुष्पा गावित, अश्विनी जोशी, जगदीश माळी आदी उपस्थित होते. प्रसंगी,डॉ. अभिजित मोरे, शांतीलाल साळी, उपसरपंच डी.जी मोरे, अभियंता बी.के पाडवी, राणूमल जैन आदींनी यांनी मनोगत व्यक्त केले.मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना अनिल गोटे म्हणाले, कार्यकर्त्यांनी विरोधाभास सोडून समाजासाठी कार्य करावे. पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे कुठलाही व्यक्ती काम घेऊन आला तर त्याची निराशा होऊ नये. जोपर्यंत त्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत मदत करा. असे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणुकीत पराभव झाला. पराभवाने घाबरून जाऊ नये. मी कार्यकर्त्यांच्या पराभव सहन करेन पण लज्जास्पद पराभव सहन करणार नाही. कार्यकर्त्यांनी घरावर झेंडे लावून वातावरण निर्मिती करून गाव तेथे राष्ट्रवादीचे शाखा उघडण्यात यावी अशा सूचना अनिल गोटे यांनी केल्या.डॉ.विजयकुमार गावित यांना आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी मंत्री बनविले होते. आदिवासी विकास विभागाला नऊ टक्के निधी देऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास केल्याची माहिती निरीक्षक नाना महाले यांनी दिली. पक्ष कोण सोडून गेलं याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी पक्षकार्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.