शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

वाहने फसत असल्याने राष्ट्रीय महामार्ग थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण रखडल्याने रस्त्याची प्रचंड दैना झाली आहे. धावती वाहने रस्त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण रखडल्याने रस्त्याची प्रचंड दैना झाली आहे. धावती वाहने रस्त्यात फसुन जाणे व रस्त्याच्या कडेला पलटी होणे असे प्रकार वाढीस येत आहेत. यातून रहदारीचा खोळंबा, अपघात, वित्त व जीवीतहानी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.आर्थिक संकटात सापडलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व चौपदरीकरण करणारी कंपनी यामुळे कोंडाईबारी ते बेडकी या 55 किलोमिटर अंतराची अक्षरश:         चाळण झाली आहे. दरदिवशी तीन हजाराहून अधिक वाहनांच्या वर्दळीमुळे महामार्गाचे ठराविक  अंतरात झालेले काम कुचकामी             ठरले आहे. जेथे काम बाकी होते            असा रस्त्याचा भाग तर जीवघेणा            ठरु लागला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात  झालेल्या अतिवृष्टीमुळे रायंगण शिवारातील ब्रिटीशकालीन पूल कोसळल्याने महामार्ग बंद   पडला. संवेदनशिल घटना घडल्यानंतर त्याकडे गांभिर्याने पाहणे आवश्यक असतांनाही महामार्ग प्राधिकरण झोपेचे सोंग घेऊन राहिले. पाईपचा पुरवठा केल्याखेरीज ते ही जास्त काही करु शकले नाही. दररोज सुमारे दोन कोटीचे नुकसान होत असल्याचे पाहून महामार्गावर व्यवसाय करणारे सर्वस्तरातील व्यापा:यांनी एकत्र येवून मातीचा भराव करीत 12 दिवसानंतर महामार्ग पूर्ववत सुरु करण्यात यश मिळविले. रायंगण येथील मोठा पुल व शहरालगतचा वाकीपाडा येथील पुल कधी  कोसळेल हे सांगणे कठीण झाले असतांना आता महामार्गाची नव्याने केलेली उभारणी जीवावर बेतत  आह़े एकाच दिवसात पानबारा जवळ दोन वेगवेगळी वाहने रस्यावर चिखलात रुतून गेली तर विसरवाडी जवळ एक ट्रक  पलटी झाला. एकाच दिवसात तीन अपघात झाल्याने वाहन मालकांचे आर्थिक नुकसान झाले आह़े यातून वाहतुकीचा खोळंबाही झाला़ यातून अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.या घटना नित्याच्या झाल्या असुन लहान चारचाकी वाहने फसुन जातील इतके मोठ्या आकाराचे खड्डे महामार्गावर झाले आहेत. रस्त्यावरील डांबराचा थर निघुन गेला आहे व मातीचा भाग वर आल्याने  मोठी वाहने रुतुन जातील अश्या अवस्थेत चिखल झाला आहे. याचा अंदाज येत नसल्याने अश्या घटना वाढीस येत आहे. महामार्गाचा कोणी वालीच नसल्याने व चौपदरीकरण रखडल्याने या घटना घडत आहेत़ या घटनांना कसा व केव्हा पायबंद घातला  जाईल, असा जटील प्रश्न चर्चिला जात आह़े