शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

शहाद्याच्या सारस्वताचा लेखणीला राष्ट्रीय आयाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 11:44 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : साने गुरुजी, विनोबा भावे आणि म.गांधींच्या साहित्यावर सखोल अभ्यास करणारे गांधीवादी ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : साने गुरुजी, विनोबा भावे आणि म.गांधींच्या साहित्यावर सखोल अभ्यास करणारे गांधीवादी साहित्यिक डॉ.विश्वास पाटील यांच्या ‘कस्तूरी परिमल’ या ग्रंथांचे भारत सरकारच्या सुचना व प्रसारन विभागाने प्रकाशन केले आहे. नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे. या प्रकाशनामुळे शहाद्यातील सारस्वताच्या लेखणीला राष्ट्रीय आयाम मिळाला आहे.  म.गांधींच्या सहचारिणी कस्तूरबा गांधी यांचा जीवनपटही गांधींइतकाच मोलाचा आहे. मात्र, त्यांच्या संदर्भात फारसे कुठे लिहिले गेले नाही. गिरिराज किशोर यांचा ‘बा’ हा ग्रंथ वगळता इतर कुठलेही साहित्य कस्तुरबा गांधी यांच्या संदर्भात सापडत नाही. या पाश्र्वभुमीवर डॉ.विश्वास पाटील यांनी गांधी आणि विनोबा भावें संदर्भातील संशोधनात्मक लेखन करीत असतांना त्यांनी कस्तुरबा गांधी यांच्या जीवनपटासंदर्भात लेखन केले. सुरुवातीला ‘कस्तूरी गंध’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याचे प्रकाशान जळगाव येथील गांधी तिर्थने केले होते. त्यासाठी म.गांधी यांचे नातू अरुण गांधी व पणतू तुषार गांधी हे प्रकाशनासाठी आले होते. या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. त्याची दखल भारत सरकारच्या सुचना व प्रसारण मंत्रालयाने घेतली आणि डॉ.विश्वास पाटील यांना कस्तूरबा संदर्भात चरित्र ग्रंथ लिहिण्याचे सांगितले. त्यानुसार डॉ.विश्वास पाटील यांनी ‘कस्तूरी परिमल’ हा चरित्रपर कादंबरी ग्रंथ लिहिला. त्याचे प्रकाशन भारत सरकारच्या सुचनाप्रकाशन विभागाने केले आहे. या ग्रंथाचे नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन झाले. सुमारे सव्वादोनशे पानांचा हा ग्रंथ असून त्यात कस्तूरबांचा म.गांधींसोबत ‘मोहन ते महात्मा’ बनण्यार्पयतचा प्रवासात कस्तूरबा एक सहचारिणी व धर्मप}ी म्हणून काय भुमिका राहिली आहे त्याचा जीवनप्रवासाचा उलगडा आहे. 

रचनात्मक कार्याचा प्रवास.. कस्तूरी परिमल या ग्रंथात कस्तूरबांचा आश्रमातील, स्वातंत्र्य लढय़ातील आणि तुरुंगातील जीवनाचा प्रवास मांडला आहे. त्यांच्या रचनात्मक कार्याची दखल या ग्रंथात घेण्यात आली आहे. कस्तूरबांचा गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण अफ्रिका यासह     भारतातील विविध भागात म.गांधींसोबतचा प्रवास वर्णन त्यात मांडले आहे. त्या      केवळ गांधींच्या सहचारिणी नव्हत्या तर गांधींच्या अनेक निर्णयात त्यांची भुमिकाही महत्त्वाची ठरली आहे. त्यासंदर्भातील वर्णन लेखकाने त्यात अतिशय समर्पकपणे मांडले आहे.