शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कलाल समाजाच्या एकत्रिकरणाच्या उद्देशाने नाशिक ते तळोदा सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:25 IST

मिरवणूक काढून समाज बांधवांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कआमलाड : क्षत्रिय कलाल समाजाच्या एकत्रिकरणाच्या उद्देशाने उत्तर महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने नाशिक ते तळोदा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचा तळोदा शहरात समारोप करण्यात आला. या वेळी कलाल समाजाच्या वतीने मिरवणूक काढून या सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. नाशिक येथून 26 ऑक्टोबरला रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. या रॅलीचा मार्ग पिंपळगाव, चांदवड, मालेगाव, आर्वी, धुळे, शिरपूर, शहादामार्गे तळोदा येथे पोहोचल्यावर गणपती गल्लीतील कलाल समाजवाडी येथे स्वागत करून रॅलीचा समारोप करण्यात आला होता. शहरात आल्यानंतर समाजाचे अध्यक्ष संजय कलाल यांनी सप}ीक या सायकल रॅलीची आरती ओवाळून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नंतर संपूर्ण तळोदा शहरातून वाजत-गाजत या सायकल रॅलीची मिरवणूक काढून रॅलीमध्ये भाग घेतलेल्या समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गणपती गल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिरपूर येथील समाजाचे अध्यक्ष जगदीश कलाल उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र कलाल समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ कलाल, ज्येष्ठ सल्लागार ए.व्ही. कलाल, कलाल समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा भारतीबाई कलाल, व नंदुरबार येथील पी.एस.आय. पदमा कलाल, नाशिक येथील विभागीय आयुक्त राजेंद्र कलाल, प्रदीप कलाल, राहुल सोनवणे व समाज बांधव उपस्थित होते. या वेळी नाशिक येथील समाज कल्याण विभागाचे विभागीय आयुक्त राजेंद्र कलाल म्हणाले की, दीड महिन्यांपूर्वी मी आमच्या व्हाट्सअप ग्रुपवर सायकल रॅलीचा विचार मांडला व त्याला ग्रुपमध्ये असलेल्या समाज बांधवांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला व लगेच आम्ही या रॅलीच्या नियोजनासाठी कामाला लागलो. समाज बांधवांनी उत्साह दाखवून कलाल समाजाच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने व एक मोठी समाजाची शक्ती यातून दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. प्रदीप बागुल म्हणाले की, आम्ही दररोज शंभर किलोमीटर सायकलचा प्रवास करायचो. कलाल समाजात एकत्रिकरणाची मोठी शक्ती आहे व ही शक्ती सायकल रॅलीतून दिसून आली. जगदीश कलाल म्हणाले की, सायकल रॅलीची संकल्पना अत्यंत चांगली असून समाजातील लोकांना एकत्र करून विचारांचे आदान प्रदान करता आले. समाजाने एकजूट होऊन एक संघटनाच निर्माण झाली पाहिजे. सायकल रॅलीमुळे आपल्या समाजात एक चेतना निर्माण झाल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचसलन अक्षय कलाल यांनी तर आभार संजय कलाल यांनी मानले. कार्यक्रमासाठी तळोदा कलाल समाज बांधव व नवयुवक समाज मंडळ यानी परिश्रम घेतले.