शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

नंदुरबारच्या लाल मिरची उद्योगाला आता पिवळ्या हळदीची जोड

By admin | Updated: April 24, 2017 13:47 IST

नंदुरबारात आता मिरची पावडरच्या लालीला हळदीच्या पिवळ्या रंगाची जोड मिळाल्याने जिल्ह्यात मसाला उद्योगाला तेजी आली आहे.

ऑनलाईन लोकमत विशेष /रमाकांत पाटील  नंदुरबार, दि.24- मिरचीसाठी राज्यात सर्वदूर परिचित असलेल्या नंदुरबारात आता हळद उत्पादनालाही चालना मिळत असून मिरची पावडरच्या लालीला हळदीच्या पिवळ्या रंगाची जोड मिळाल्याने जिल्ह्यात मसाला उद्योगाला तेजी आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी मिरचीचे प्रचंड उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे हंगामात येथील बाजार समितीत रोज जवळपास पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची विक्रीसाठी येत होती. ही मिरची व्यापारी खरेदी करून ते वाळविण्यासाठी शहराबाहेरील पथारीवर टाकत होते. त्यामुळे शहरात प्रवेश करताच प्रत्येकाला शेकडो एकर परिसरातील लालजर्द पथा:या सर्वानाच आकर्षीत करीत असे. त्यावरूनच नंदुरबारची ओळख मिरचीचे शहर म्हणून परिचीत झाले होते. पण गेल्या दहा वर्षापासून विविध कारणांनी मिरचीचे उत्पादन कमी झाले. सहाजिकच येथील मिरची उद्योजकांना सध्या बाहेरून मिरची आणावी लागते.  मिरची उद्योगाची ही घसरण सुरू असतांनाच त्याला जोड आता हळदीची मिळत आहे.गेल्या दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. यावर्षी देखील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हळदीची लागवड झाली होती. हळदीला स्थानिक स्तरावर पूर्वी बाजारपेठ नसल्याने शेतक:यांचे हाल होत होते. त्याला पर्याय म्हणून काही मिरची उद्योजकांनी मिरची बरोबरच हळद पावडरही तयार करण्याचा उद्योग सुरू केला. शेतातून हळद काढल्यानंतर त्याला ‘बॉईल’ करण्याची प्रक्रिया अवघड असते. ही प्रक्रिया जिल्ह्यात काही ठिकाणी शेतक:यांनी एकत्र येवून सुरू केली. एक-दोन उद्योजकांनीही पुढाकार घेवून त्याला व्यापक स्वरूप दिले. त्यामुळे स्थानिक स्तरावरच हळदीची खरेदी होऊन त्याची पावडर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नंदुरबार शहरात सध्या काही मिरची उद्योजक हळद पावडर बनवून ते बाहेर विक्री करतात. एका उद्योजकाने या प्रकल्पाला व्यापकता दिली आहे. त्या उद्योजकाकडे दरवर्षी साधारणत: सात हजार क्विंटलपेक्षा अधीक हळद शेतक:यांकडून खरेदी करून त्याची पावडर बनवून ती मिरची पावडर बरोबरच देशभरात पाठविली जात आहे. या उद्योगामुळे हळद उत्पादक शेतक:यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. एक हजार क्विंटलपेक्षा जास्त हळद पावडरची निर्मितीजिल्ह्यातील काही शेतकरी हळद बॉईल करून ती सांगली बाजारपेठेत विक्रीला नेतात. तर काही शेतकरी स्थानिक व्यापा:यांकडेच विक्री करतात. व्यापा:यांनीही हळद पावडर उत्पादनाला सुरुवात केल्याने दरवर्षी जवळपास एक हजार क्विंटलपेक्षा जास्त पावडरची निर्मिती करून ते देशभरात विक्रीला पाठवित असल्याची माहिती उद्योजक सुनील अग्रवाल यांनी दिली.