शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू झाल्याची भीती, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
4
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
5
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
6
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
7
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
8
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
10
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
11
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
12
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
13
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
14
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
15
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
16
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
17
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

नंदुरबारच्या लाल मिरची उद्योगाला आता पिवळ्या हळदीची जोड

By admin | Updated: April 24, 2017 13:47 IST

नंदुरबारात आता मिरची पावडरच्या लालीला हळदीच्या पिवळ्या रंगाची जोड मिळाल्याने जिल्ह्यात मसाला उद्योगाला तेजी आली आहे.

ऑनलाईन लोकमत विशेष /रमाकांत पाटील  नंदुरबार, दि.24- मिरचीसाठी राज्यात सर्वदूर परिचित असलेल्या नंदुरबारात आता हळद उत्पादनालाही चालना मिळत असून मिरची पावडरच्या लालीला हळदीच्या पिवळ्या रंगाची जोड मिळाल्याने जिल्ह्यात मसाला उद्योगाला तेजी आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी मिरचीचे प्रचंड उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे हंगामात येथील बाजार समितीत रोज जवळपास पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची विक्रीसाठी येत होती. ही मिरची व्यापारी खरेदी करून ते वाळविण्यासाठी शहराबाहेरील पथारीवर टाकत होते. त्यामुळे शहरात प्रवेश करताच प्रत्येकाला शेकडो एकर परिसरातील लालजर्द पथा:या सर्वानाच आकर्षीत करीत असे. त्यावरूनच नंदुरबारची ओळख मिरचीचे शहर म्हणून परिचीत झाले होते. पण गेल्या दहा वर्षापासून विविध कारणांनी मिरचीचे उत्पादन कमी झाले. सहाजिकच येथील मिरची उद्योजकांना सध्या बाहेरून मिरची आणावी लागते.  मिरची उद्योगाची ही घसरण सुरू असतांनाच त्याला जोड आता हळदीची मिळत आहे.गेल्या दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. यावर्षी देखील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हळदीची लागवड झाली होती. हळदीला स्थानिक स्तरावर पूर्वी बाजारपेठ नसल्याने शेतक:यांचे हाल होत होते. त्याला पर्याय म्हणून काही मिरची उद्योजकांनी मिरची बरोबरच हळद पावडरही तयार करण्याचा उद्योग सुरू केला. शेतातून हळद काढल्यानंतर त्याला ‘बॉईल’ करण्याची प्रक्रिया अवघड असते. ही प्रक्रिया जिल्ह्यात काही ठिकाणी शेतक:यांनी एकत्र येवून सुरू केली. एक-दोन उद्योजकांनीही पुढाकार घेवून त्याला व्यापक स्वरूप दिले. त्यामुळे स्थानिक स्तरावरच हळदीची खरेदी होऊन त्याची पावडर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नंदुरबार शहरात सध्या काही मिरची उद्योजक हळद पावडर बनवून ते बाहेर विक्री करतात. एका उद्योजकाने या प्रकल्पाला व्यापकता दिली आहे. त्या उद्योजकाकडे दरवर्षी साधारणत: सात हजार क्विंटलपेक्षा अधीक हळद शेतक:यांकडून खरेदी करून त्याची पावडर बनवून ती मिरची पावडर बरोबरच देशभरात पाठविली जात आहे. या उद्योगामुळे हळद उत्पादक शेतक:यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. एक हजार क्विंटलपेक्षा जास्त हळद पावडरची निर्मितीजिल्ह्यातील काही शेतकरी हळद बॉईल करून ती सांगली बाजारपेठेत विक्रीला नेतात. तर काही शेतकरी स्थानिक व्यापा:यांकडेच विक्री करतात. व्यापा:यांनीही हळद पावडर उत्पादनाला सुरुवात केल्याने दरवर्षी जवळपास एक हजार क्विंटलपेक्षा जास्त पावडरची निर्मिती करून ते देशभरात विक्रीला पाठवित असल्याची माहिती उद्योजक सुनील अग्रवाल यांनी दिली.