शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 11:26 IST

‘विरचक’मध्ये 37 टक्के पाणीसाठा : गेल्या आठवडय़ातील अतीवृष्टीचा परिणाम

नंदुरबार : शिवण नदीच्या उगम क्षेत्रात गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे विरचक प्रकल्पातील पाणी पातळी थेट 19 टक्क्यांनी वाढली आहे. सद्य स्थितीत प्रकल्पात 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. अजूनही शिवण नदीचा प्रवाह आणि नदीला येवून मिळणा:या विविध नाल्यांचा प्रवाह सुरूच असल्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. यामुळे नंदुरबारकरांवरील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले आहे. पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरी विरचक प्रकल्पातील पाणी पातळीत थेंबभरही वाढ झालेली नव्हती. त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठा कमालीचा घडला होता. 15 ऑगस्टर्पयत केवळ 19 टक्के पाणीसाठा होता. उपयुक्त पाणी साठय़ाची टक्केवारी केवळ 12 टक्के होती. त्यामुळे पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. येत्या 1 सप्टेंबरपासून पाणी कपातीचा निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पालिकेने ठरविलेही होते. परंतु नंदुरबारकरांच्या सुदैवाने गेल्या आठवडय़ात शिवण नदीच्या उगम क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे संकट तुर्तास टळले आहे.पाणीसाठा 37 टक्क्यांवरविरचक प्रकल्पात सद्य स्थितीत 37 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह लक्षात घेता आणखी दोन दिवसात साठा 40 टक्केपेक्षा अधीक जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच काळात पाणीसाठा 34 टक्केर्पयत होता. सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस यामुळे धरणातील पाणीसाठा 70 टक्केपेक्षा अधीक गेला होता. यंदा देखील सप्टेंबर आणि परतीचा पाऊस चांगला झाला तर पाणीसाठा गेल्यावर्षाइतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी पालिकेने पाणी कपातीचा विषय बाजुला ठेवला असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितले.पाण्याची वेळ जैसेथे पाणी पुरवठय़ाची सध्याची वेळ कायम ठेवण्यात येणार आहे. सध्या एक दिवसाआड 45 ते 60 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येतो. जो शहरवासीयांच्या दृष्टीने पुरेसा आणि योग्य आहे. 1 सप्टेंबरपासून किमान 20 ते 25 मिनिटांनी पाणी पुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे नागरिकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागले असते. पावसाळ्यात ही स्थिती राहिली असती तर हिवाळा आणि उन्हाळ्यातील स्थिती आणखी त्रासदायक राहिली असती. सुदैवाने नंदुरबारकरांवरील हे संकट तुर्तास टळले आहे.पदाधिकारी, अधिका:यांकडून पहाणीविरचक प्रकल्पातील वाढलेला पाणीसाठय़ाची पहाणी पालिकेच्या पदाधिका:यांनी व अधिका:यांनी केली. पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार नदीचा प्रवाह आणखी आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळ आणि दीड ते दोन फुटांनी वाढणार आहे. अर्थात याच गतीने नदीतील पाणी वाहत राहिल्यास प्रकल्पातील पाणीसाठा 40 टक्केपेक्षा अधीक जाणार आहे.तीन वर्षापूर्वी देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. संपुर्ण पावसाळा संपुनही विरचक प्रकल्पात एक टक्काही पाणी पातळी वाढली नव्हती. परंतु परतीच्या पावसाने प्रकल्पाला जिवदान दिले होते. परतीचा पाऊस दोन दिवसातच सरासरीचा 20 ते 25 टक्के पडून गेल्याने विरचक प्रकल्पातील पाणी पातळी थेट आठ टक्क्यावरून 41 टक्क्यांवर गेली होती. पाणी टंचाईचे टळलेल्या संकटामुळे त्यावेळी पालिकेने पालिका कार्यालयातच सार्वजनिक सत्यनारायण पुजेचेही आयोजन केले होते. ती आठवण यावेळी पुन्हा आली.आंबेबाराही भरण्याच्या मार्गावरनंदुरबार शहराला आंबेबारा प्रकल्पातून देखील पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पात देखील केवळ 20 टक्के पाणीसाठा होता. गेल्या आठवडय़ातील पावसामुळे हा प्रकल्पही 60 टक्केपेक्षा अधीक भरला आहे. येत्या काळात समाधानकारक पाऊस राहिल्यास हा प्रकल्प दरवर्षाप्रमाणे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पातील 50 टक्के पाणीसाठा शहरासाठी आरक्षीत केला जातो. तेथून नदीद्वारे पाणी आणून ते आष्टे पंपींग स्टेशनर्पयत आणून तेथून ते पाईपलाईनीने शहरात आणले जाते. हा प्रकल्पही पुर्णपणे भरत असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.