शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विकसनशील शहरांमध्ये नंदुरबार राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नंदुरबारची ओळख निर्माण झाली आहे. राज्यातील एक स्मार्ट शहर म्हणून नंदुरबार नावारूपास आले आहे.  समर्पित भावनेने काम केल्यावरच हे शक्य होते, असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नंदुरबारात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले.     ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नंदुरबारची ओळख निर्माण झाली आहे. राज्यातील एक स्मार्ट शहर म्हणून नंदुरबार नावारूपास आले आहे.  समर्पित भावनेने काम केल्यावरच हे शक्य होते, असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नंदुरबारात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले.         नंदुरबार पालिकेतर्फे उभारण्यात आलेले दादासाहेब बटेसिंह रघुवंशी  उद्यान, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम  ई-लायब्ररी, आरोग्य सुविधा केंद्राचे उद्घाटन व सुवर्ण जयंती रोजगार योजनेअंतर्गत बचत गट व महिलांना विविध वस्तूंचे वाटप राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाशेजारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी  माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत, माजीमंत्री आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे, आमदार काशीराम पावरा, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, शिरपूरचे नगराध्यक्ष भुपेश पटेल, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आदिवासी कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, पंचायत समिती सभापती रंजना नाईक,  जि.प. चे माजी अध्यक्ष भरत गावीत, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.  राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राजकारण करताना समर्पित भावनेने काम केले पाहिजे. माजी आमदार कै.बटेसिंह रघुवंशी यांची काम करण्याची पद्धत तीच होती. तीच परंपरा आमदार चंद्रकांत रघुवंशी हे चालवित आहेत. शहर विकासाच्या योजना राबवितांना सामान्य घटक डोळ्यासमोर ठेवला गेला पाहिजे. नागरी सुविधा देतांना शहराचा विकास आणि बेरोजगार हातांना काम कसे मिळेल हे देखील पाहिले पाहिजे. नंदुरबार पालिकेतर्फे ते पाहिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी १८ टक्के असलेला वेग आता ५२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे शहर विकास आणि मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी मोठे नियोजन करावे लागणार आहे. सध्या राजकारणाचा धंदा झाला आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कुठून काय आणि कसे मिळेल यावरच डोळा राहत आहे. त्यामुळे चांगली पिढी राजकारणात आली पाहिजे, अशी अपेक्षाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेने केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आपण गेल्या निवडणुकीत दिलेले सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे. नंदुरबारात काय आहे असे विचारण्यापेक्षा काय नाही असे विचारले जाते. येत्या काळात गरीब, सर्वसामान्यांसाठी औषधालय सुरू करण्याचा मानस आहे. त्यात २५ ते ३० टक्के कमी दराने औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या अत्यल्प शुल्कात विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. राज्यातील एक आदर्श शहर बनविण्याचा आपला संकल्प असून तो पूर्णत्वास येत असल्याचा आनंद असल्याचेही आमदार रघुवंशी यांनी सांगितले.सूत्रसंचालन प्रा.डॉ. माधव कदम यांनी केले. या वेळी नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा विमलबाई रघुवंशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र मराठे, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, मुख्याधिकारी गणेश गिरी, बाजार समितीचे सभापती भरतभाई पटेल, माजी सभापती डॉ.सयाजी मोरे, शेतकरी संघाचे सभापती बी.के. पाटील, मजूर फेडरेशनचे किरण पाटील, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेजखान, सभापती निखिल रघुवंशी, शकुंतला मोहन माळी, वंदना कैलास पाटील, नगरसेवक राजेश परदेशी, निंबा माळी, मोहन माळी, करिश्मा बोरसे, विद्या शिंदे, लीला साळवे, अनिल पाटील, भरत पाटील, बापू पाटील आदी उपस्थित होते.