शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यात पाऊस व गारपीटमुळे पावणे दोनशे हेक्टरवर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

नंदुरबार : अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नंदुरबार तालुक्यात १७४ हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रात नुकसान झाले आहे. प्राथमिक स्तरावर पंचनामे करण्यात ...

नंदुरबार : अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नंदुरबार तालुक्यात १७४ हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रात नुकसान झाले आहे. प्राथमिक स्तरावर पंचनामे करण्यात आले आहेत. दरम्यान आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसात अवकाळी पाऊस व काही भागात झालेल्या गारपीटमुळे शेतशिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, पपई, केळी, टरबूज या पिकांना फटका बसला आहे. नंदुरबारसह शहादा व तळोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक पंचनाम्यात साधारणत: ३०० हेक्टपर्यंत नुकसानीचा अंदाज आहे. त्यात काही भागात कमी अधीक नुकसानीचा समावेश आहे.

नंदुरबार तालुक्यात प्राथमिक पंचनाम्यात एकुण १७४.५७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये गहू १२.४५हेक्टर, पपई ८४.५१ हेक्टर, केळी ४९.९३ हेक्टर, मका ५.१८ हेक्टर, ज्वारी सहा हेक्टर, टोमॅटो दोन हेक्टर, हरभरा ४.५० हेक्टर, टरबूज पाच हेक्टर, मिरची पाच हेक्टर अशा क्षेत्रात नुकसान झाले आहे.

बुधवारी आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांनी नंदुरबार तालुक्यातील कानळदे, बोराळे, काकर्दे, नाशिंदे, विखरण, सुजालपूर आदी परिसरातील नुकसानीची पहाणी केली.

यावेळी पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील, शेखर पाटील, शांताराम पाटील, आर.डी.वळवी, विजय मोहिते, करणसिंग गिरासे, एम.एस.लाड, राजेंद्र गिरासे, मनोज पंदाणे, नायब तहसीलदार भिमराव बोरसे आदी उपस्थित होते. दिवसभर कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामात व्यस्त असल्याचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांनी सांगितले.

आमदार डॅा.गावीत यांनी अधिकाऱ्यांना विविध सुचना दिल्या.