नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीचा साठा संपल्याने प्रशासनाने एक लाख डोसेसची मागणी केली होती. मंगळवारी शासनाने २५ हजार डोसेसचा पुरवठा केला आहे. दरम्यान, मंगळवारी रुग्णसंख्या घटली असली तरी नऊजणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती. आता आठवड्याभरापासून ही संख्या नियंत्रणात आल्याने प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. रोजचे सुमारे पाच ते सहा हजार जणांचे लसीकरण करण्याची माेहीम सुरू असल्याने लसींचा डोस संपला होता. त्यासाठी एक लाख डोसेसची मागणी केली होती. त्याबदल्यात शासनाने २५ हजार डाेसचा पुरवठा केला आहे.
दरम्यान, मंगळवारी नवीन १७९ रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मृत्यूची संख्या मात्र नऊ असल्याने अजूनही भीतीचे वातावरण आहे.