शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात यंदाही ‘निवडक’ शाळांनाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:50 IST

आरटीई : पालकांमध्ये प्रवेशाबाबत उत्सूकता, शिक्षण विभागाचा जनजागृतीवर भर

नंदुरबार : २५ फेब्रुवारीपासून पालकांना ‘आरटीई’अंतर्गत आॅनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे़ परंतु मागील काही वर्षांचा अनुभव बघता यंदाही पालकांकडून काही ‘निवडक’ शाळांनाच पसंती मिळणार की काय? असे चित्र आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे़२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया २०१९-२०२० ला सुरुवात झाली आहे़ ८ फेब्रुवारीपासून आरटीईअंतर्गत शाळांचे रजिस्ट्रेशन तसेच व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे़ याची अंतीम मुदत २२ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आलेली आहे़ तर पालकांना प्रत्यक्षात आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची मुदत २५ फेब्रुवारी ते ११ मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे़ त्यामुळे पालकांमध्ये आॅनलाईन शाळा प्रवेशाबाबत कमालीची उत्सूकता दिसून येत आहे़ मात्र बहुतेक पालकांकडून २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांची निवड करताना निवडक शाळांना प्राधान्य देण्यात येत आहे़ त्यामुळे इतर शाळांकडे आरटीईअंतर्गत जागा रिक्त राहत असल्याचे सांगण्यात येत आहे़२५ टक्के प्रवेश प्रक्रिया पुणे येथील ‘एनआयसी’ सेंटरअंतर्गत चालविण्यात येत आहे़ गेल्यावर्षी जिल्ह्यातील ४७९ जागांसाठी ५७९ आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते़ परंतु अ‍ॅडमिशन घेण्यासाठी पालकांकडून नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील ठराविक शाळांनाच प्राधान्य देण्यात आले होते़ २५ टक्केअंतर्गत प्रवेश प्रकिया जिल्ह्यातील ४३ शाळांमध्ये सुरु असतानासुध्दा पालकांकडून केवळ ३ ते ४ शाळांनाच प्राधान्य देण्यात येत असते़ त्यामुळे इतर शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेशाबाबत घरघर असल्याचे दिसून येत आहे़ वर्षानुवर्षे अशा प्रकारे आरटीईअंतर्गत जागा रिक्त राहत असल्याने यामुळे पालक वर्गाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़मागील वर्षी केवळ १३७ विद्यार्थ्यांचेच प्रवेशदरम्यान, आरटीई प्रवेश प्रकियेअंतर्गत मागील वर्षी तीन प्रवेश फेऱ्या झाल्या होत्या़ याअंतर्गत केवळ १३७ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले होते़ तर तब्बल ३४२ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळाली़ रिक्त जागांमुळे शिक्षण विभागाला चौथी प्रवेश फेरी घेण्याबाबत कार्यवाही करावी लागली होती़तर दुसरीकडे, सीबीएसई व इतर शाळा उघडून बरेच दिवस झाल्यावरही आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरुच होती़ त्यामुळे आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली होती़तांत्रिक अडचणींची समस्याआरटीईअंतर्गत आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबतची कार्यवाही पुणे येथील ‘एनआयसी’ सेंटरकडून होत असते़ अनेक वेळा आॅनलाईन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणींअभावी व्यत्यय निर्माण होत असतो़ ही परिस्थती केवळ जिल्ह्याचीच नव्हे तर राज्यभरात सारखीच असल्याचे सांगण्यात आले़