शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार, नवापूरात 14 तास वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 10:53 IST

मुसळधार पावसाचा परिणाम : दुरूस्तीसाठी धुळे व चाळीसगाव येथून मागवावे लागले पथक

ठळक मुद्दे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस अनेक दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यातील अनेक भागात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा व विसरवाडी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली तर नवापूर मंडळात 60 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. नंदुरबा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उर्जा मंत्र्यांच्या आगमनाच्या आधीच वीज कंपनीने आपला कारभार चव्हाटय़ावर आणला आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील निम्मेपेक्षा अधीक भागात तब्बल 14 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. शहरासह निम्मे तालुका आणि संपुर्ण नवापूर तालुका अंधारात होता. त्यामुळे नंदुरबार आणि नवापूर शहरातील पाणी पुरवठय़ावर त्याचा परिणाम झाला होता.वीज वितरण कंपनीने पावसाळ्याआधी सर्वच संकटांना तोंड देण्यास कंपनी सज्ज असल्याचे सांगितले होते. तसे नियोजन देखील करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. परंतु वीज कंपनीच्या सुदैवाने यंदा ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या चमचमाटात वादळी पाऊस झालाच नव्हता. शनिवारी रात्री मात्र वादळी पाऊस झाल्याने वीज कंपनीचे वाभाडे निघाले. शनिवारी सांयकाळी सात वाजेपासून ढगांच्या गडगडाटात अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस सुरू होता. याच दरम्यान वावद ते उमर्दे दरम्यान टॉवर लाईनवर वीज पडल्याने आणि मुख्य वाहिनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अशा वेळी पर्यायी यंत्रणा असणे आवश्यक असतांना वीज कंपनीकडे तसे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे शहरातील निम्मेपेक्षा अधीक भागात अंधार होता. रात्री आठ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा रविवारी सकाळी 10 वाजता सुरळीत झाला. बिघाड दुरूस्त करणे आणि तुटलेल्या तारा तातडीने जोडण्यासाठी धुळे येथील पथकाला बोलविण्यात आले होते. या पथकाने पहाटे कामाला सुरुवात करून सकाळी 10 वाजेर्पयत काम पुर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला. ज्या ठिकाणी बिघाड झाला होता त्याच ठिकाणच्या शेतात पाणी होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठय़ा अडचणी येत होत्या. त्यामुळे पहाटे कामाला सुरुवात करण्यात आली.नवापूर तालुकाही अंधारातनंदुरबार शहरासह तालुक्यातील काही भाग अंधारात होता. त्याचप्रमाणे नवापूर शहर व संपुर्ण तालुका देखील अंधारात होता. रात्री आठ वाजेपासून रविवारी सकाळी साडेअकरा वाजेर्पयत नवापूर तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला होता.  पाणी पुरवठय़ावर परिणामतब्बल 14 ते 15 तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नंदुरबारसह नवापूर शहरातील आणि अनेक गावांमधील पाणी पुरवठय़ावर परिणाम झाला होता. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या झराळी फिडरवर देखील वीज पुरवठा नसल्यामुळे तेथून पाणी उपसा होऊ शकला नाही. त्याचा परिणाम शहरातील जलकुंभ भरण्यावर झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी पुरवठा देखील सुरळीत करण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागली.काही भागात सुरळीतनंदुरबारातील काही भागात नेहरूनगर उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश आले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना ब:यापैकी दिलासा मिळाला होता. असे असले तरी अधूनमधून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच होते.