शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

नंदुरबार, नवापूरात 14 तास वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 10:53 IST

मुसळधार पावसाचा परिणाम : दुरूस्तीसाठी धुळे व चाळीसगाव येथून मागवावे लागले पथक

ठळक मुद्दे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस अनेक दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यातील अनेक भागात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा व विसरवाडी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली तर नवापूर मंडळात 60 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. नंदुरबा

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उर्जा मंत्र्यांच्या आगमनाच्या आधीच वीज कंपनीने आपला कारभार चव्हाटय़ावर आणला आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील निम्मेपेक्षा अधीक भागात तब्बल 14 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. शहरासह निम्मे तालुका आणि संपुर्ण नवापूर तालुका अंधारात होता. त्यामुळे नंदुरबार आणि नवापूर शहरातील पाणी पुरवठय़ावर त्याचा परिणाम झाला होता.वीज वितरण कंपनीने पावसाळ्याआधी सर्वच संकटांना तोंड देण्यास कंपनी सज्ज असल्याचे सांगितले होते. तसे नियोजन देखील करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. परंतु वीज कंपनीच्या सुदैवाने यंदा ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या चमचमाटात वादळी पाऊस झालाच नव्हता. शनिवारी रात्री मात्र वादळी पाऊस झाल्याने वीज कंपनीचे वाभाडे निघाले. शनिवारी सांयकाळी सात वाजेपासून ढगांच्या गडगडाटात अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस सुरू होता. याच दरम्यान वावद ते उमर्दे दरम्यान टॉवर लाईनवर वीज पडल्याने आणि मुख्य वाहिनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अशा वेळी पर्यायी यंत्रणा असणे आवश्यक असतांना वीज कंपनीकडे तसे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे शहरातील निम्मेपेक्षा अधीक भागात अंधार होता. रात्री आठ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा रविवारी सकाळी 10 वाजता सुरळीत झाला. बिघाड दुरूस्त करणे आणि तुटलेल्या तारा तातडीने जोडण्यासाठी धुळे येथील पथकाला बोलविण्यात आले होते. या पथकाने पहाटे कामाला सुरुवात करून सकाळी 10 वाजेर्पयत काम पुर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला. ज्या ठिकाणी बिघाड झाला होता त्याच ठिकाणच्या शेतात पाणी होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठय़ा अडचणी येत होत्या. त्यामुळे पहाटे कामाला सुरुवात करण्यात आली.नवापूर तालुकाही अंधारातनंदुरबार शहरासह तालुक्यातील काही भाग अंधारात होता. त्याचप्रमाणे नवापूर शहर व संपुर्ण तालुका देखील अंधारात होता. रात्री आठ वाजेपासून रविवारी सकाळी साडेअकरा वाजेर्पयत नवापूर तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला होता.  पाणी पुरवठय़ावर परिणामतब्बल 14 ते 15 तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नंदुरबारसह नवापूर शहरातील आणि अनेक गावांमधील पाणी पुरवठय़ावर परिणाम झाला होता. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या झराळी फिडरवर देखील वीज पुरवठा नसल्यामुळे तेथून पाणी उपसा होऊ शकला नाही. त्याचा परिणाम शहरातील जलकुंभ भरण्यावर झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणी पुरवठा देखील सुरळीत करण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागली.काही भागात सुरळीतनंदुरबारातील काही भागात नेहरूनगर उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश आले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना ब:यापैकी दिलासा मिळाला होता. असे असले तरी अधूनमधून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच होते.