शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पालिकेचा लहान व्यावसायिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता. त्यामुळे पालिकेने पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्पलेक्समधील दुकानगाळे धारकांना तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता. त्यामुळे पालिकेने पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्पलेक्समधील दुकानगाळे धारकांना तीन महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिली. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.कोरोनामुळे २२ मार्चपासून संपुर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. साधारणत: अडीच ते तीन महिने पुर्ण व्यवहार बंद होते. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू होते. जून महिन्यापासून काही अंशी शिथीलता आली. परंतु तरीही व्यवहाराची गाडी रुळावर येण्यासाठी आॅगस्ट उजाडला होता. अद्यापही अनेकांचा व्यवसाय रुळावर आलेला नाही. काही लहान व्यवसायिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती पहाता पालिकेने या व्यावसायिकांच्या मदतीला धावण्याचा निर्णय घेतला आहे.नंदुरबार पालिकेचे शहरातील सर्वच भागात व्यापारी संकुल आहेत. त्यात अनेक दुकाने ही भाड्याने देण्यात आली आहेत. भाड्याने दुकान घेणाऱ्यांमध्ये किराणा, कटलरी, केश कर्तनालये, फळ, भाजीपाला विक्रेते यासह इतर लहान मोठे व्यावसायिक आहेत. त्यांना लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला. दुकाने बंद असतांना त्यांचे भाडे भरावे लागणार असल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली होती.ही बाब लक्षात घेता नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी अशा व्यावसायिकांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान तीन महिन्याचे भाडे माफ केले जाणार आहे. त्यासाठी तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबधीतांना देण्यात आले आहेत. लवकरच याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव केला जाणार असल्याची माहितीही नगराध्यक्षांनी दिली.या निर्णयामुळे लहान, मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पालिकेने नेहमीच सर्वसामान्य नागरिक आणि लहान, मोठ्या व्यावसायिकाचे हित पाहिले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यावयिसाकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे पालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानदारांना तीन महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. असा निर्णय घेणारी नंदुरबार पालिका ही पहिलीच ठरणार आहे.-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,नगराध्यक्षा, नंदुरबार.