शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नंदुरबारात ‘ऑक्टोबर हिट’चा जाणवतोय तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:22 IST

तापमानात वाढ : शहाद्यात तुरळक पाऊस, बुधवार व गुरुवार पावसाचा जोर वाढणार

नंदुरबार : नंदुरबारात गेल्या आठवडाभरापासून ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा जाणवत आह़े रविवारी नंदुरबारात 39 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली़ उन्हाळ्यासारखे उन्ह पडत असल्याने दुपारच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यांवर अघोषित संचारबंदीची स्थिती निर्माण झालेली आह़े  परतीच्या पावसाचे नुसते वातावरणसुध्दा तयार झाले नसल्याने सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े‘ऑक्टोबर हिट’ असल्याने नंदुरबार सध्या ‘हॉट सिटी’ ठरत आह़े दुपारच्या वेळी कडाक्याच्या उन्हाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आह़े ‘आयएमडी’ने सांगितल्यानुसार 10 ऑक्टोबरपासून तापमानात काही अंशी घट होऊन परतीच्या पावसाचा प्रभाव वाढणार आह़े तसेच ‘स्कायमेट’ने वर्तविलेल्या अंदाजानुसार 10 व 11 ऑक्टोबरदरम्यान पावसाळी वातावरण राहणार आह़े तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचे सांगण्यात आल़े दरम्यान, रविवारी नंदुरबारात तब्बल 39 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली़ त्यामुळे पावसाळ्यात उन्हाळा परतलाय की काय? अशी स्थिती निर्माण झालेली आह़े दुपारच्या वेळी तापमानात प्रचंड वाढ होऊन सोबतीला आद्रतेताही चांगलीच जाणवत आह़े त्यामुळे उन्हाळा गेल्यावर अळगळीत ठेवलेले कुलर नागरिकांकडून पुन्हा कार्यान्वित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात यंदा केवळ 67 टक्के इतक्याच पजर्न्यमानाची नोंद करण्यात आली आह़े त्यातच ऑक्टोबर हिट जाणवत असल्याने पिकांची स्थिती चिंताजनक झालेली आह़े वाढत्या तापमानामुळे पिक माना टाकत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यातच पावसाचीही कृपा होत नसल्याने निसर्गाच्या दुहेरी संकटाला शेतक:यांसह सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आह़े दरवर्षी ऑक्टोबर हिटचा नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रभाव जाणवत असतो़ यंदा उन्हाळी दिवसांमध्ये नंदुरबारचे तापमान 44 ते 45 अंशार्पयत जावून पोहचले हहोत़े त्यातच आता ऑक्टोबर हिटमध्येही तापमान चाळीशी जवळ येऊन पोहचले आह़े त्यामुळे सर्वाकडूनच पावसाची आतूर्तेने वाट पाहिली जात आह़ेदरम्यान, स्कायमेट या हवामान संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार व गुरुवार नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आह़े त्याच बरोबर शनिवारी शहादा तालुक्यातील सारंगखेडा, बामखेडा, कौठल, वडाळी, कळंबू आदी परिसरात तुरळक ठिकाणी 15 ते 20 मिनीट पावसाच्या सरी कोसळल्या होत्या़ त्यामुळे येत्या काही दिवसात तापमान कमी होऊन पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आह़े पावसाच्या आगमनाने पिकांना फारसा काही फायदा होणार नसल्याचे म्हटले जात आह़े परतीचा पाऊस चांगला बरसला तर याचा फायदा जलस्त्रोतांमध्ये वाढ होण्यास नक्कीच होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े