शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

नंदुरबारला 30 टक्के पाणीपुरवठा करणारा स्त्रोत झाला बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला कधी नव्हे अशी यंदा पाणी टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. एकुण पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला कधी नव्हे अशी यंदा पाणी टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. एकुण पाणी पुरवठय़ापैकी 30 टक्के पाणी पुरवठा करणारा आंबेबारा प्रकल्प कोरडा झाला आहे. विरचक प्रकल्पात देखील अवघा 22 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. यामुळे पालिकेने यापूर्वीच पाणी कपात केली असली तरी सध्या वेळापत्रक मात्र विस्कळीत झाले आहे. शहराला विरचक प्रकल्पातून 70 टक्के तर आंबेबारा प्रकल्पातून 30 टक्के पाणी पुरवठा केला जातो. विरचकमधील सर्व पाणी पालिकेसाठी आरक्षीत असते तर आंबेबारा प्रकल्प पुर्ण 100 टक्के भरल्यास त्यातील 50 टक्के पाणी आरक्षीत केले जाते. यंदा अवघा 60 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे आंबेबाराचा पुर्ण पाणीसाठा आरक्षीत करण्यात आला होता. परंतु हा साठा देखील आता आटला आहे. शिवाय आष्टे पंपींग स्टेशनची विहिर देखील आटली आहे. त्यामुळे येथून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. वीरचक प्रकल्पात देखील केवळ 22 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. आणखी तीन ते चार आठवडय़ात केवळ मृत साठा शिल्लक राहणार आहे. जर पाऊस लांबला तर शहरवासीयांना पाणी-बाणीच्या स्थितीला सामोरे जावे लागणार आहे. विजेची समस्येमुळे शहरातील जलकुंभांमध्ये पाणीसाठा होण्यास वेळ लागत असून  शहरातील सर्वच भागातील पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले आहे.  गेल्या दहा दिवसांपासून ही समस्या आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. पाण्याचा अपव्यवय करणा:यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अनेक कुटूूंब अंगणात पाणी शिंपडणे, टाकी भरली तरी ती तशीच वाहू देणे, वाहने धुणे, नळांना तोटय़ा न बसविणे, घरातील बेशीन, स्वच्छतागृहात पाणी वाहू देणे असे प्रकार करतात. पाण्याचे मोल ज्यांना नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणे आवश्यक असल्याच्या सुज्ञ नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे.