शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नंदुरबारात आठवडाभरापासून सूर्यदर्शनच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:12 IST

पावसाची रिपरिप सुरुच : भिजपावसाने पिके तरारली तर जलसाठे मात्र कोरडेच

नंदुरबार : गेल्या आठवडाभरापासून नंदुरबारात रिमङिाम पाऊस सुरु आह़े मंगळवारीसुध्दा पहाटेपासूनच संततधार पावसाने हजेरी लावली होती़ पावसाची रिपरिप व ढगाळ हवामानामुळे गेल्या आठवडय़ापासून नंदुरबारकरांना सूर्यदर्शनाची प्रतीक्षा आह़े नंदुरबारसह खान्देश व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खाते तसेच स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेतर्फे देण्यात आला आह़े गेल्या चार दिवसांपासून नंदुरबार शहरासह, नवापूर, शहादा, अक्कलकुवा, तळोदा व धडगाव आदी ठिकाणी पावसाची रिपरिप सुरुच आह़े यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला असल्याचे चित्र दिसून येत आह़े जवळपास सर्वच ठिकाणच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत़ संततधार पावसामुळे शेती पिकांना फायदा मिळत असला तरी, या पावसामुळे अद्याप कुपनलिका, विहिर, नद्या-नाले आदी जलस्त्रोत अद्याप भरलेले नाहीत़ जिल्ह्यात मुसळधार पावसाची आवश्यकता आह़े रिमङिाम पावसामुळे जमिनीतील पाणी पातळीत काही प्रमाणात का होईना भर पडत असल्याचे सांगण्यात येत आहेत़ कष्टक:यांची उडाली दाणादाणमंगळवार नंदुरबारातील बाजाराचा दिवस असल्याने भिजपावसात आपला माल विकायला आलेले शेतकरी, कष्टक:यांची चांगलीच दाणादाण उडाली़ दिवसभर पावसाची संततधार सुरु असल्याने अनेकांनी छत्र्यांचा आधारत घेत भरपावसातच सुभाष चौक, मंगळ बाजार, तुप बाजार आदी ठिकाणी आपली दुकाने मांडली होती़ पावसामुळे बाजारावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आल़े संततधार पावसामुळे दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ कुठे ब्रेक डाऊन तर कुठे पावसामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ पुढील तीन दिवस पावसाची रिपरिप कायम राहणारभारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस नंदुरबारसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आह़े बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे हा अतिवृष्टीचाही इशारा मध्य महाराष्ट्रात देण्यात आला आह़े पावसामुळे पिकं तग धरु लागल्याने शेतक:यांमध्येही साहजिकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आह़े दमदार पाऊस व्हावाजिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु असली तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही़ जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर पाणी साठवणुकीसाठी चा:या तसेच खड्डे खोदण्यात आलेले आहेत़ त्यामुळे दमदार पाऊस होऊन याव्दारे जमिनीत पाण्याचे सिंचन व्हावे तसेच विविध जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े  अद्यापही कुपनलिकांना पाणी लागले नाही तर, विहिरीसुध्दा कोरडय़ा पडल्या आह़े त्यामुळे मुसळधार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आह़े नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव व धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याचे दिसून येत आह़े