शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:16 IST

आरटीई : जिल्ह्याभरातून ४७० जागांसाठी केवळ १८३ आॅनलाईन प्रवेश अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : २५ टक्के मोफत प्रवेशांतर्गत (आरटीई) पहिल्या प्रवेश फेरीत जिल्ह्यातून १८३ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ तर सिंधूदुर्ग जिल्ह्यात ३५३ आरटीई जागांसाठी केवळ १०६ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यात नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’ आहे़ विशेष म्हणजे पालघर, गडचिरोली, यवतमाळ सारखे आदिवासी बहुल जिल्हे नंदुरबारपेक्षा आघाडीवर आहेत़यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत गेल्या वर्षीच्या तुलनेत पालकांकडून उत्साह दाखवला जात असला तरी आरटीईअंतर्गत शंभर टक्के प्रवेश होईल अशी खात्री नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे़ राज्यात सिंधुदूर्ग व नंदुरबार जिल्हे आरटीई प्रथम प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे अहवालातून उघड झालेले आहे़दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७८४ जागांसाठी ३२४ अर्ज, पालघर ४ हजार २५२ जागांसाठी ५७१ अर्ज, यवतमाळ १ हजार ७४४ जागांसाठी तब्बल २ हजार ६५१ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ असे असले तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे जिल्हे काही प्रमाणात मागे आहेत़पुणे जिल्हा हा आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रि येत आघाडीवर असून पुणे जिल्ह्यात एकूण ९६३ शाळा प्रवेशास पात्र आहेत़ तर १६ हजार ६१९ विद्यार्थी कोट्यासाठी तब्बल ३० हजार ३६४ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिकमध्ये ४५७ शाळांमार्फत प्रवेश प्रकिया राबवली जात आहे़ ५ हजार ७६४ जागांसाठी ७ हजार १४३ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ जळगावात २७४ शाळामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे़ यात, ३ हजार ७१७ जागांसाठी ३ हजार ४१८ प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत़ तर धुळ्यात ९७ शाळांतर्फे सुुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेत १ हजार २३७ जागांसाठी ९८० प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात नंदुरबार जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे़दरम्यान, नंदुरबारचा विचार करता यंदा आरटीईच्या पूर्वीच्या ४७९ विद्यार्थ्यांच्या कोट्यामध्ये नऊने घट होऊन यंदा ४७० जागाचा कोटा ठेवण्यात आला आहे़ तर पात्र शाळांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ पूर्वी आरटीई प्रवेश पात्र ४३ शाळा होत्या़ त्यांची संख्या आता ४७ इतकी झाली आहे़ गेल्या वर्षी आरटीईअंतर्गत ४७९ पैकी केवळ १३७ जागाच भरल्या गेल्या होत्या़ तर उर्वरीत जागा पाच वेळा प्रवेश प्रक्रिया राबवूनही भरता आल्या नव्हत्या़ तसेच आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील एकूण ४३ शाळा पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत़ परंतु त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याचा शाळांना पालकांची पसंती असते़उर्वरीत शाळांमध्ये आरटीईअंतर्गत देण्यात आलेला विद्यार्थी कोटा हा शंभर टक्के रिक्त राहत असल्याची स्थिती आहे़ त्यामुळे शासनाने यंदा जिल्ह्यातील आरटीई कोटा केवळ ९ जागांनी घटवला तर दुसरीकडे शाळा ४३ वरुन ४७ वर आणल्या असल्याने शिक्षण विभागाच्या अजब निर्णयावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत़