शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:16 IST

आरटीई : जिल्ह्याभरातून ४७० जागांसाठी केवळ १८३ आॅनलाईन प्रवेश अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : २५ टक्के मोफत प्रवेशांतर्गत (आरटीई) पहिल्या प्रवेश फेरीत जिल्ह्यातून १८३ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ तर सिंधूदुर्ग जिल्ह्यात ३५३ आरटीई जागांसाठी केवळ १०६ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यात नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’ आहे़ विशेष म्हणजे पालघर, गडचिरोली, यवतमाळ सारखे आदिवासी बहुल जिल्हे नंदुरबारपेक्षा आघाडीवर आहेत़यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत गेल्या वर्षीच्या तुलनेत पालकांकडून उत्साह दाखवला जात असला तरी आरटीईअंतर्गत शंभर टक्के प्रवेश होईल अशी खात्री नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे़ राज्यात सिंधुदूर्ग व नंदुरबार जिल्हे आरटीई प्रथम प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे अहवालातून उघड झालेले आहे़दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७८४ जागांसाठी ३२४ अर्ज, पालघर ४ हजार २५२ जागांसाठी ५७१ अर्ज, यवतमाळ १ हजार ७४४ जागांसाठी तब्बल २ हजार ६५१ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ असे असले तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे जिल्हे काही प्रमाणात मागे आहेत़पुणे जिल्हा हा आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रि येत आघाडीवर असून पुणे जिल्ह्यात एकूण ९६३ शाळा प्रवेशास पात्र आहेत़ तर १६ हजार ६१९ विद्यार्थी कोट्यासाठी तब्बल ३० हजार ३६४ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिकमध्ये ४५७ शाळांमार्फत प्रवेश प्रकिया राबवली जात आहे़ ५ हजार ७६४ जागांसाठी ७ हजार १४३ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ जळगावात २७४ शाळामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे़ यात, ३ हजार ७१७ जागांसाठी ३ हजार ४१८ प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत़ तर धुळ्यात ९७ शाळांतर्फे सुुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेत १ हजार २३७ जागांसाठी ९८० प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात नंदुरबार जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे़दरम्यान, नंदुरबारचा विचार करता यंदा आरटीईच्या पूर्वीच्या ४७९ विद्यार्थ्यांच्या कोट्यामध्ये नऊने घट होऊन यंदा ४७० जागाचा कोटा ठेवण्यात आला आहे़ तर पात्र शाळांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ पूर्वी आरटीई प्रवेश पात्र ४३ शाळा होत्या़ त्यांची संख्या आता ४७ इतकी झाली आहे़ गेल्या वर्षी आरटीईअंतर्गत ४७९ पैकी केवळ १३७ जागाच भरल्या गेल्या होत्या़ तर उर्वरीत जागा पाच वेळा प्रवेश प्रक्रिया राबवूनही भरता आल्या नव्हत्या़ तसेच आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील एकूण ४३ शाळा पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत़ परंतु त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याचा शाळांना पालकांची पसंती असते़उर्वरीत शाळांमध्ये आरटीईअंतर्गत देण्यात आलेला विद्यार्थी कोटा हा शंभर टक्के रिक्त राहत असल्याची स्थिती आहे़ त्यामुळे शासनाने यंदा जिल्ह्यातील आरटीई कोटा केवळ ९ जागांनी घटवला तर दुसरीकडे शाळा ४३ वरुन ४७ वर आणल्या असल्याने शिक्षण विभागाच्या अजब निर्णयावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत़