शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
5
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
6
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
7
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
8
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
9
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
10
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
11
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
12
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
13
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
14
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
15
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
16
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
17
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
18
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
19
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
20
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप

प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:16 IST

आरटीई : जिल्ह्याभरातून ४७० जागांसाठी केवळ १८३ आॅनलाईन प्रवेश अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : २५ टक्के मोफत प्रवेशांतर्गत (आरटीई) पहिल्या प्रवेश फेरीत जिल्ह्यातून १८३ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ तर सिंधूदुर्ग जिल्ह्यात ३५३ आरटीई जागांसाठी केवळ १०६ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यात नंदुरबार जिल्हा ‘सेकंड लास्ट’ आहे़ विशेष म्हणजे पालघर, गडचिरोली, यवतमाळ सारखे आदिवासी बहुल जिल्हे नंदुरबारपेक्षा आघाडीवर आहेत़यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत गेल्या वर्षीच्या तुलनेत पालकांकडून उत्साह दाखवला जात असला तरी आरटीईअंतर्गत शंभर टक्के प्रवेश होईल अशी खात्री नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे़ राज्यात सिंधुदूर्ग व नंदुरबार जिल्हे आरटीई प्रथम प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे अहवालातून उघड झालेले आहे़दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७८४ जागांसाठी ३२४ अर्ज, पालघर ४ हजार २५२ जागांसाठी ५७१ अर्ज, यवतमाळ १ हजार ७४४ जागांसाठी तब्बल २ हजार ६५१ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ असे असले तरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे जिल्हे काही प्रमाणात मागे आहेत़पुणे जिल्हा हा आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रि येत आघाडीवर असून पुणे जिल्ह्यात एकूण ९६३ शाळा प्रवेशास पात्र आहेत़ तर १६ हजार ६१९ विद्यार्थी कोट्यासाठी तब्बल ३० हजार ३६४ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिकमध्ये ४५७ शाळांमार्फत प्रवेश प्रकिया राबवली जात आहे़ ५ हजार ७६४ जागांसाठी ७ हजार १४३ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ जळगावात २७४ शाळामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे़ यात, ३ हजार ७१७ जागांसाठी ३ हजार ४१८ प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत़ तर धुळ्यात ९७ शाळांतर्फे सुुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेत १ हजार २३७ जागांसाठी ९८० प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत़ त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यात नंदुरबार जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे़दरम्यान, नंदुरबारचा विचार करता यंदा आरटीईच्या पूर्वीच्या ४७९ विद्यार्थ्यांच्या कोट्यामध्ये नऊने घट होऊन यंदा ४७० जागाचा कोटा ठेवण्यात आला आहे़ तर पात्र शाळांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे़ पूर्वी आरटीई प्रवेश पात्र ४३ शाळा होत्या़ त्यांची संख्या आता ४७ इतकी झाली आहे़ गेल्या वर्षी आरटीईअंतर्गत ४७९ पैकी केवळ १३७ जागाच भरल्या गेल्या होत्या़ तर उर्वरीत जागा पाच वेळा प्रवेश प्रक्रिया राबवूनही भरता आल्या नव्हत्या़ तसेच आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील एकूण ४३ शाळा पात्र ठरविण्यात आलेल्या आहेत़ परंतु त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याचा शाळांना पालकांची पसंती असते़उर्वरीत शाळांमध्ये आरटीईअंतर्गत देण्यात आलेला विद्यार्थी कोटा हा शंभर टक्के रिक्त राहत असल्याची स्थिती आहे़ त्यामुळे शासनाने यंदा जिल्ह्यातील आरटीई कोटा केवळ ९ जागांनी घटवला तर दुसरीकडे शाळा ४३ वरुन ४७ वर आणल्या असल्याने शिक्षण विभागाच्या अजब निर्णयावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत़