शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

राज्यात सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात, एक हजारापेक्षा कमी ॲक्टिव्ह रुग्ण असलेला एकमेव जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

नंदुरबार : राज्यात हवेतील ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प साकारणारा नंदुरबार जिल्हा सध्या सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण असलेला जिल्हा म्हणून ...

नंदुरबार : राज्यात हवेतील ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प साकारणारा नंदुरबार जिल्हा सध्या सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण असलेला जिल्हा म्हणून चर्चेत आला आहे. दुसरी लाट राज्यभर आटोक्यात येत असली तरी एक हजारापेक्षा कमी ॲक्टिव्ह रुग्ण सध्या तरी फक्त नंदुरबार जिल्ह्यात आहेत. तर रोज नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही प्रचंड नियंत्रणात आले आहे.

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सर्वत्र वेदनादायी ठरली. पहिल्या लाटेपेक्षा नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रुग्णांना बेड न मिळण्याचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. हे वातावरण आता हळूहळू निवळू लागले असून रुग्ण संख्याही कमी होऊ लागली आहे. सद्य:स्थितीत राज्यात तीन लाख १४ हजार ३६८ ॲक्टिव्ह रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यात ४५ हजार ६४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत २७ हजार ८५५ तर ठाण्यात २३ हजार ७०२ रुग्ण आहेत. साताऱ्यातही १८ हजार ९०९ रुग्ण असून १० हजारांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण असलेले राज्यात आजही १० जिल्हे आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या कमी झाली असून गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या १२०० ते १५०० आहे. एक हजारापेक्षा कमी ॲक्टिव्ह रुग्ण फक्त नंदुरबार जिल्ह्यात असून या जिल्ह्यात २५ मेच्या आकडेवारीनुसार ९७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

विविध कारणांनी जिल्हा चर्चेत...

नंदुरबार जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. विशेषत: येथील हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प, रुग्णालयात ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना ऑक्सिजनचे नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात आलेली ऑक्सिजन सिस्टर योजना, जिल्ह्याने दुसऱ्या लाटेत सर्वप्रथम केलेले लॉकडाऊन, प्रत्येक रुग्णाला बेड मिळेल यासाठी केलेले प्रयत्न, संपर्क साखळी तोडण्यासाठी गावोगावी लावलेले स्वॅब तपासणी शिबिरे या विविध योजनांमुळे दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यात जिल्ह्याला यश आले आहे.

सर्वात कमी रुग्ण हिंगोली जिल्ह्यात

आजवरच्या एकूण रुग्णांमध्ये सर्वात कमी रुग्ण हिंगोली जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४६३ रुग्ण असून त्यात १५ हजार ८५ रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील २३ हजार २२१ रुग्ण असून त्यापैकी १८ हजार ५१३ रुग्ण बरे झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात २७ हजार ८०८ तर वाशिम जिल्ह्यात ३८ हजार ४१६ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ नंदुरबार जिल्ह्यात एकूण ३८ हजार ५५२ रुग्ण असून त्यापैकी ३६ हजार ७८१ रुग्ण बरे झाले आहेत.

नंदुरबारमधील मृत्यू मात्र चिंताजनक

जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या व सध्या राज्यात सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ही बाब समाधानकारक असली तरी जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. एकूण ७९३ मृत्यू झाले असून त्याचे प्रमाण १.९१ टक्के आहे. सध्या देखील गेल्या पंधरवड्यापासून नवीन रुग्ण संख्या दोन आकडी येत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र रोजचे वाढले आहे.