शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

नंदुरबार जिल्ह्यात अडीच लाख टन चा:याची कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येत्या महिनाभरात जिल्ह्यात चारा टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस लांबल्यास त्याची भिषणता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : येत्या महिनाभरात जिल्ह्यात चारा टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस लांबल्यास त्याची भिषणता आणखी वाढणार आहे. जिल्ह्याला लागणा:या एकुण चा:यापैकी सद्य स्थितीत दोन लाख 65 हजार मे.टन चा:याची कमतरता आहे. दरम्यान, अनेक गावांमधून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पुढे येवू लागली असली तरी प्रशासन अद्याप त्याबाबत गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.      गेल्या वर्षी अपेक्षीत पजर्न्यमान झाले नाही. सरासरीचा केवळ 67 टक्के पाऊस झाला. तो देखील अनियमित होता. त्यामुळे खरीप पीक जेमतेमच आले.  पाऊसच कमी असल्यामुळे धरणे, नदी, नाले, बंधारे कोरडे राहिले. परिणामी रब्बी पीक देखील घेता आले नाही. त्याचा परिणाम चारा उत्पादनावर झाला. ही  बाब लक्षात घेता गेल्या महिन्यापासून जनावरांच्या चा:याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भागातील शेतक:यांनी चारा, पाण्याअभावी आपली गुरं विकून टाकली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली चारा छावणीची मागणी प्रशासनाने पुर्ण केली असती तर आज अनेक शेतक:यांची गुरं विक्री झाली नसती.परजिल्ह्यात बंदीचारा टंचाईची स्थिती उद्भवणार ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यातच परराज्य आणि इतर जिल्ह्यात चारा विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. तसा अद्यादेशही काढलेला आहे. असे असतांना बराच चारा परजिल्ह्यात विक्री झाला आहे. त्यासाठी संबधीतांनी विविध माध्यमाचाही वापर केला आहे. चारा उत्पादन अभियानकृषी विभागाच्या चारा उत्पादन अभियानाचाही फारसा उपयोग झालेला नाही. शेतक:यांना सिंचनासाठी पाणीच नसल्यामुळे चारा लागवड करणार तरी कशी हा प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता यंदा कृषी विभागाच्या या योजनेलाही अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याची स्थिती आहे. परिस्थिती बिकटपिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा संदर्भातील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा तालुक्यातील काही भाग तसेच नवापूर तालुक्यातील पूर्व भागात ही स्थिती गंभीर आहे. अनेकांनी आपली गुरे पोषणासाठी इतर ठिकाणी पाठवून दिली आहेत. तापी काठावर छावण्या..तापी काठावर अर्थात प्रकाशा ते सारंगखेडा या दरम्यान तापीला पाणी आहे. या दोन्ही ठिकाणी बॅरेज असल्यामुळे पाणी अडविले गेले आहे. त्यामुळे तापी काठावर चारा छावण्या उभारल्यास जनावरांचा पाणी प्रश्न मिटणार होता तसेच चारा वाहतुकीलाही सोयीचे ठरणार होते. त्यानुसार सव्र्हे देखील करण्यात आला. परंतु छावणी उभारण्यासारखी परिस्थिती नसल्याचे चित्र प्रशासनानेच निर्माण केल्याने हा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. आता पावसाळा तोंडावर आल्याने चारा छावण्यांना खो बसणार आहे.