शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या मिरचीचा ठसका झाला कमी!, रोगामुळे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:00 IST

मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबारमध्ये विविध कारणांनी उत्पादन घटत आहे. परराज्यातील मिरचीने येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एकप्रकारे नंदुरबारच्या मिरचीचा ठसका कमी झाला आहे.

रमाकांत पाटील नंदुरबार : मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबारमध्ये विविध कारणांनी उत्पादन घटत आहे. परराज्यातील मिरचीने येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एकप्रकारे नंदुरबारच्या मिरचीचा ठसका कमी झाला आहे.१० वर्षापूर्वी येथील बाजारपेठेत हंगामात रोज पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची विक्रीसाठी येत होती. व्यापाºयांनी खरेदी केलेली ओली मिरची सुकवण्यासाठी शेकडो एकर जागेवर पथाºया होत्या. लालजर्द मिरचीने सजलेल्या पथाºया सर्वांचेच आकर्षण ठरत असे. आता मात्र चित्र बदलले आहे. पाच-सात वर्षांपासून मिरची उत्पादक शेतकरी इतर बागायती पिकांकडे वळले आहेत. रोगराईमुळे घटणारे उत्पन्न आणि त्यातच अस्थिर भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे उत्पादक संकटात सापडला आहे. परिणामी मिरची लागवडीचे क्षेत्रही घटत चालले आहे.पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड असलेले मिरचीचे क्षेत्र यंदा केवळ १,६०० हेक्टरवर आले आहे. त्यातच यावर्षी मिरचीवर घुबडा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने अपेक्षित वाढही झाली नाही. परिणामी उत्पन्न घटले.अनेक शेतकºयांनी मिरचीचे पीक काढून गहू आणि हरभºयाची पेरणी केली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये नंदुरबार बाजार समितीत रोज तीन ते सहा हजार क्विंटल मिरचीची आवक होती. आज ती केवळ ५०० ते ६०० क्विंटलवर आली आहे. सध्या जेमतेम ३० ते ४० वाहने येत असून त्यातही मध्य प्रदेशातील वाहनांचा समावेश अधिक आहे.गेल्या काही वर्षापासून येथील मिरची, मसाले उत्पादक गुंटूर व वारंगळ येथून मिरची मागवत आहेत. मात्र तेथील मिरचीचा हंगाम उशिरा असल्याने ही मिरची बाजारपेठेत यायला किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.नंदुरबार येथील मिरचीच्या ख्यातीमुळे ‘चिली पार्क’ सुरू करण्याच्या घोषणा अनेक वर्षांपासून होत आहेत. प्रत्यक्षात त्याबाबत कुठलीही कार्यवाही होत नाही. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मिरची निर्यातीचे केंद्र सुरूझाल्यास उत्पादनही वाढेल आणि शेतकºयांना भावही मिळेल.नंदुरबार बाजार समितीत सध्या मिरचीची आवक प्रचंड घटली आहे. मिरचीवर रोग पडल्याने अनेक शेतकºयांनी पीक काढले. त्यामुळे सध्या बाजारपेठेत जेमतेम आवक असून त्याचा दर्जाही समाधानकारक नाही. आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील मिरचीवर उद्योजकांना अवलंबून रहावे लागणार आहे.- जयेशकुमार कोचर,मिरची उद्योजक, नंदुरबार.