शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

नंदुरबारच्या मिरचीचा ठसका झाला कमी!, रोगामुळे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:00 IST

मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबारमध्ये विविध कारणांनी उत्पादन घटत आहे. परराज्यातील मिरचीने येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एकप्रकारे नंदुरबारच्या मिरचीचा ठसका कमी झाला आहे.

रमाकांत पाटील नंदुरबार : मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबारमध्ये विविध कारणांनी उत्पादन घटत आहे. परराज्यातील मिरचीने येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एकप्रकारे नंदुरबारच्या मिरचीचा ठसका कमी झाला आहे.१० वर्षापूर्वी येथील बाजारपेठेत हंगामात रोज पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची विक्रीसाठी येत होती. व्यापाºयांनी खरेदी केलेली ओली मिरची सुकवण्यासाठी शेकडो एकर जागेवर पथाºया होत्या. लालजर्द मिरचीने सजलेल्या पथाºया सर्वांचेच आकर्षण ठरत असे. आता मात्र चित्र बदलले आहे. पाच-सात वर्षांपासून मिरची उत्पादक शेतकरी इतर बागायती पिकांकडे वळले आहेत. रोगराईमुळे घटणारे उत्पन्न आणि त्यातच अस्थिर भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे उत्पादक संकटात सापडला आहे. परिणामी मिरची लागवडीचे क्षेत्रही घटत चालले आहे.पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड असलेले मिरचीचे क्षेत्र यंदा केवळ १,६०० हेक्टरवर आले आहे. त्यातच यावर्षी मिरचीवर घुबडा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने अपेक्षित वाढही झाली नाही. परिणामी उत्पन्न घटले.अनेक शेतकºयांनी मिरचीचे पीक काढून गहू आणि हरभºयाची पेरणी केली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये नंदुरबार बाजार समितीत रोज तीन ते सहा हजार क्विंटल मिरचीची आवक होती. आज ती केवळ ५०० ते ६०० क्विंटलवर आली आहे. सध्या जेमतेम ३० ते ४० वाहने येत असून त्यातही मध्य प्रदेशातील वाहनांचा समावेश अधिक आहे.गेल्या काही वर्षापासून येथील मिरची, मसाले उत्पादक गुंटूर व वारंगळ येथून मिरची मागवत आहेत. मात्र तेथील मिरचीचा हंगाम उशिरा असल्याने ही मिरची बाजारपेठेत यायला किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.नंदुरबार येथील मिरचीच्या ख्यातीमुळे ‘चिली पार्क’ सुरू करण्याच्या घोषणा अनेक वर्षांपासून होत आहेत. प्रत्यक्षात त्याबाबत कुठलीही कार्यवाही होत नाही. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मिरची निर्यातीचे केंद्र सुरूझाल्यास उत्पादनही वाढेल आणि शेतकºयांना भावही मिळेल.नंदुरबार बाजार समितीत सध्या मिरचीची आवक प्रचंड घटली आहे. मिरचीवर रोग पडल्याने अनेक शेतकºयांनी पीक काढले. त्यामुळे सध्या बाजारपेठेत जेमतेम आवक असून त्याचा दर्जाही समाधानकारक नाही. आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील मिरचीवर उद्योजकांना अवलंबून रहावे लागणार आहे.- जयेशकुमार कोचर,मिरची उद्योजक, नंदुरबार.