शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नंदुरबारच्या मिरचीचा ठसका झाला कमी!, रोगामुळे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:00 IST

मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबारमध्ये विविध कारणांनी उत्पादन घटत आहे. परराज्यातील मिरचीने येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एकप्रकारे नंदुरबारच्या मिरचीचा ठसका कमी झाला आहे.

रमाकांत पाटील नंदुरबार : मिरचीचे आगार असलेल्या नंदुरबारमध्ये विविध कारणांनी उत्पादन घटत आहे. परराज्यातील मिरचीने येथे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एकप्रकारे नंदुरबारच्या मिरचीचा ठसका कमी झाला आहे.१० वर्षापूर्वी येथील बाजारपेठेत हंगामात रोज पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची विक्रीसाठी येत होती. व्यापाºयांनी खरेदी केलेली ओली मिरची सुकवण्यासाठी शेकडो एकर जागेवर पथाºया होत्या. लालजर्द मिरचीने सजलेल्या पथाºया सर्वांचेच आकर्षण ठरत असे. आता मात्र चित्र बदलले आहे. पाच-सात वर्षांपासून मिरची उत्पादक शेतकरी इतर बागायती पिकांकडे वळले आहेत. रोगराईमुळे घटणारे उत्पन्न आणि त्यातच अस्थिर भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे उत्पादक संकटात सापडला आहे. परिणामी मिरची लागवडीचे क्षेत्रही घटत चालले आहे.पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड असलेले मिरचीचे क्षेत्र यंदा केवळ १,६०० हेक्टरवर आले आहे. त्यातच यावर्षी मिरचीवर घुबडा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने अपेक्षित वाढही झाली नाही. परिणामी उत्पन्न घटले.अनेक शेतकºयांनी मिरचीचे पीक काढून गहू आणि हरभºयाची पेरणी केली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये नंदुरबार बाजार समितीत रोज तीन ते सहा हजार क्विंटल मिरचीची आवक होती. आज ती केवळ ५०० ते ६०० क्विंटलवर आली आहे. सध्या जेमतेम ३० ते ४० वाहने येत असून त्यातही मध्य प्रदेशातील वाहनांचा समावेश अधिक आहे.गेल्या काही वर्षापासून येथील मिरची, मसाले उत्पादक गुंटूर व वारंगळ येथून मिरची मागवत आहेत. मात्र तेथील मिरचीचा हंगाम उशिरा असल्याने ही मिरची बाजारपेठेत यायला किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.नंदुरबार येथील मिरचीच्या ख्यातीमुळे ‘चिली पार्क’ सुरू करण्याच्या घोषणा अनेक वर्षांपासून होत आहेत. प्रत्यक्षात त्याबाबत कुठलीही कार्यवाही होत नाही. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मिरची निर्यातीचे केंद्र सुरूझाल्यास उत्पादनही वाढेल आणि शेतकºयांना भावही मिळेल.नंदुरबार बाजार समितीत सध्या मिरचीची आवक प्रचंड घटली आहे. मिरचीवर रोग पडल्याने अनेक शेतकºयांनी पीक काढले. त्यामुळे सध्या बाजारपेठेत जेमतेम आवक असून त्याचा दर्जाही समाधानकारक नाही. आंध्र प्रदेश व कर्नाटकमधील मिरचीवर उद्योजकांना अवलंबून रहावे लागणार आहे.- जयेशकुमार कोचर,मिरची उद्योजक, नंदुरबार.