शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

असह्य उकाडय़ाने नंदुरबारकर बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:54 IST

आद्रतेत वाढ : 43 अंशावर पारा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : तापमानासोबतच वाढत्या आद्रतेने जीवाची लाही लाही होत असल्याने नंदुरबारकर चांगलेच हैराण झाले आहेत़ शनिवारी 43 अंश सेल्सिअस तापमान तर तब्बल 29 टक्के आद्रतेची नोंद करण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच वाढत्या उकाडय़ाने जीव नकोसा झाला असल्याची भावना नागरिकांकडून उमटताना दिसून येतेय़ यंदाच्या मोसमातील सर्वाच्च तापमान बुधवारी नोंदविण्यात आले होत़े ते 44़9 अंश सेल्सिअस इतके होत़े त्याच दिवशी साधारणत 28 टक्के इतकी आद्रतेची नोंद करण्यात आली होती़ साधारणत समुद्र किना:यावरील शहरी भागात 50 ते 60 टक्के इतकी आद्रता असत़े परंतु नंदुरबारसारख्या शहरातसुध्दा जवळपास 30 टक्के आद्रतेची नोंद होत असल्याने उकाडय़ात कमालीची वाढ होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत  आह़े सध्या नंदुरबार शहराचे तापमान 41 ते 43 अंशावर स्थिर आहेत़ परंतु वातावरणातील आद्रतेत मात्र कमालीची वाढ होत आह़े सुरुवातीला 19 ते 20 टक्यांवर असलेली आद्रता आजअखेरीस 29 टक्यांवर पोहचली आह़े त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांना हा उकाडा असह्य झाला आह़े जवळपास ताशी 25 किमी प्रतिवेगाने ‘हिट वेव्हस्’ म्हणजे उष्ण लहरी वाहत आहेत़ दुपारी तसेच मध्यरात्रीसुध्दा या उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत़ वाढत्या तापमान व उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर जायबंदी झाले असल्याची स्थिती आह़े दरम्यान, राजस्थानाकडून येत असलेल्या अतिउष्ण लहरींच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याचा परिणाम जिल्ह्यातील तापमानावर व उष्णतेवर जाणवत आहेत़ येत्या काही दिवसात खान्देशात उष्णतेची लाट अधिक पसरणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े नंदुरबारात गेल्या काही दिवसांपासून दमट हवामान निर्माण झाल्याने नागरिकांना दुपारच्या वेळी अक्षरश घामाच्या धारा लागत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े सर्व वयोगटातील नागरिक उकाडय़ाने त्रस्त झाले आहेत़ दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवू लागला आह़े वाढत्या तापमानाचा अनेकांना त्रास जाणवत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े उष्णतेमुळे पाण्याचे प्रमाणत कमी होत असल्याने अनेकांना ‘डिहायड्रेशन’चा त्रास होत आह़े त्याच प्रमाणे अंगात बारीक ताप असणे, अशक्तपणा येणे, तोंड वारंवार कोरडे होणे, कुठलेही काम करण्याची इच्छा न होणे, नैराश्य जाणवने, हात पाय दुखणे आदी विविध प्रकारे लक्षण वाढत्या तापमानामुळे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत़  उन्हाळ्यात तापमान तसेच आद्रता जास्त असल्याने उकाडा जाणवत असतो़ त्यामुळे साहजिकच या दिवसांमध्ये घामाव्दारे मोठय़ा प्रमाणात पाण्याचे विसजर्न होत असत़े अशा स्थितीत शरिरात पाण्याची कमतरता जाणवत असल्याने दिवसभरातून निदान तीन ते चार लीटर पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात येत आह़े उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात घाम येत असतो़ याकडे दुर्लक्ष केल्यास तो त्वचेत मुरत असून त्यामुळे अनेक त्वचा विकारसुध्दा होण्याचा धोका नाकारता येत नाही़ त्यामुळे आलेला घाम त्वरीत कापडाने पुसणे महत्वाचे असत़े त्याच प्रमाणे उन्हाळ्यात हलक्या, फिकट रंगाच्या कपडय़ाचा वापर करावा, जास्तीत जास्त कॉटन किंवा खादीचे कपडे घालावे, त्याच प्रमाणे उन्हाळ्यात जास्त फिट कपडे न घालता सैल कपडे घालावे जेणेकरुन घाम येण्याचे प्रमाण यामुळे कमी होत असत़े  उन्हाळ्यात मसाले पदार्थ, तेलकट तसेच मद्याचे सेवन करणे घातक ठरु शकत़े या पदार्थाच्या सेवनामुळे पित्ताशयाचे आजार वाढण्याची शक्यता वाढत असत़े त्याच प्रमाणे अल्सर सारखे आजारसुध्दा यामुळे बळावत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या उष्णतेमुळे या पदार्थाचे सेवन टाळून त्याऐवजी सात्विक जेवनावर भर द्यावे तसेच आहार दुध, दही, ताक आदींचा समावेश करणे महत्वाचे ठरत असत़े