शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात सर्वच १९ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:54 IST

नंदुरबार : जिल्ह्यात पॉझिटिव्ह निघालेल्या २१ रुग्णांपैकी १९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, ...

नंदुरबार : जिल्ह्यात पॉझिटिव्ह निघालेल्या २१ रुग्णांपैकी १९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुळचे बामखेडा, ता.शहादा येथील रहिवासी व्यक्ती नाशिक येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत. यामुळे जिल्ह्याने प्राथमिक स्तरावर तरी कोरोनावर मात केली असून यापुढील काळात जनतेने काळजी घेवून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या सर्वच कोरोनारुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. यामुळे समाधान व्यक्त केले आहेत. शेवटच्या दोन अर्थात आष्टे व नटावद येथील रुग्णांना सोमवारी सायंकाळी उशीरा डिस्चार्ज देण्यात आला.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १७ एप्रिल रोजी नंदुरबार येथे आढळून आला होता. तेंव्हापासून ८ मे पर्यंत एकुण २१ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी शहादा येथील एका युवकाचा तर नंदुरबार येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. १९ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या आयशोलेशन कक्षात उपचार करण्यात आले. टप्प्याटप्याने सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना त्या प्रमाणे जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८ मे नंतर जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.दरम्यान, तीन दिवसांपूर्वी बामखेडा, ता.शहादा येथील मुळ रहिवासी असलेला व्यक्ती नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना तेथे पॉझिटिव्ह आढळून आला. त्यांच्यावर नाशिक येथेच उपचार सुरू आहेत.

बामखेडा ११ अहवाल निगेटिव्ह

बामखेडा : येथील कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील २७ लोकांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ११ स्वॅबचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.बामखेडा येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यानुसार प्रशासनाने लागलीच गावात धाव घेऊन पुढील उपाययोजना केल्या. आणि रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्ति, तीन खाजगी डॉक्टर व खाजगी ड्रायव्हर यांचे असे एकूण १६ स्वॅब नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचे नमुने हे निगेटीव्ह आल्याने गावात काही अंशी चिंतेचे वातावरण कमी झाले आहे.असे असले तरी ग्रामस्थांनी प्रशासन व ग्रामपंचायतील पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन सरपंच लिना चौधरी व पोलिस पाटील डॉ योगेश चौधरी यांनी केले आहे. दरम्यान, गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना कायम आहेत. ठिकठिकाणी बॅरीकेटींग कायम असून वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जात आहे.