शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

नंदुरबारात सर्वच १९ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:54 IST

नंदुरबार : जिल्ह्यात पॉझिटिव्ह निघालेल्या २१ रुग्णांपैकी १९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, ...

नंदुरबार : जिल्ह्यात पॉझिटिव्ह निघालेल्या २१ रुग्णांपैकी १९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुळचे बामखेडा, ता.शहादा येथील रहिवासी व्यक्ती नाशिक येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत. यामुळे जिल्ह्याने प्राथमिक स्तरावर तरी कोरोनावर मात केली असून यापुढील काळात जनतेने काळजी घेवून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या सर्वच कोरोनारुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. यामुळे समाधान व्यक्त केले आहेत. शेवटच्या दोन अर्थात आष्टे व नटावद येथील रुग्णांना सोमवारी सायंकाळी उशीरा डिस्चार्ज देण्यात आला.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १७ एप्रिल रोजी नंदुरबार येथे आढळून आला होता. तेंव्हापासून ८ मे पर्यंत एकुण २१ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी शहादा येथील एका युवकाचा तर नंदुरबार येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. १९ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या आयशोलेशन कक्षात उपचार करण्यात आले. टप्प्याटप्याने सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना त्या प्रमाणे जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८ मे नंतर जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.दरम्यान, तीन दिवसांपूर्वी बामखेडा, ता.शहादा येथील मुळ रहिवासी असलेला व्यक्ती नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना तेथे पॉझिटिव्ह आढळून आला. त्यांच्यावर नाशिक येथेच उपचार सुरू आहेत.

बामखेडा ११ अहवाल निगेटिव्ह

बामखेडा : येथील कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील २७ लोकांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील ११ स्वॅबचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.बामखेडा येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यानुसार प्रशासनाने लागलीच गावात धाव घेऊन पुढील उपाययोजना केल्या. आणि रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्ति, तीन खाजगी डॉक्टर व खाजगी ड्रायव्हर यांचे असे एकूण १६ स्वॅब नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचे नमुने हे निगेटीव्ह आल्याने गावात काही अंशी चिंतेचे वातावरण कमी झाले आहे.असे असले तरी ग्रामस्थांनी प्रशासन व ग्रामपंचायतील पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन सरपंच लिना चौधरी व पोलिस पाटील डॉ योगेश चौधरी यांनी केले आहे. दरम्यान, गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना कायम आहेत. ठिकठिकाणी बॅरीकेटींग कायम असून वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जात आहे.