शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

धांद्रे गावाला नाल्यातील पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील धांद्रे खुर्द गावालगत असलेल्या नाल्याला पावसाचे पाणी आल्यामुळे दिवसभर गावातील लोकांचा संपर्क तुटला ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील धांद्रे खुर्द गावालगत असलेल्या नाल्याला पावसाचे पाणी आल्यामुळे दिवसभर गावातील लोकांचा संपर्क तुटला होता. लोकांना शेतीकामासाठी पाच फूट पाण्यातून नाला पार करुन जावे लागते. या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरुन ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. धांद्रे ग्रामस्थांना दरवर्षी ही समस्या सतावत असून प्रशासनाने तात्पुरता रस्ता तयार करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.आदिवासीबहुल वस्तीचे असलेले धांद्रे खुर्द गावाची लोकसंख्या सुमारे ६०० पर्यंत आहे. जयनगरपासून पाच किलोमीटर अंतरावर निंबोरालगत असलेल्या या गावाला अद्यापपर्यंत महसुली दर्जा मिळाला नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील सर्वच कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असल्याने त्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागते. धांद्रे खुर्द गावाला चौफेरे नाल्याचा वेढा आहे. पावसाळ्यात या नाल्याला पाणी येत असल्याने आजूबाजू सर्वत्र पाणी व मध्येच गाव अशी एखाद्या बेटासारखी परिस्थिती निर्माण होते. वाहन तर सोडा बैलगाडी काढणेही या नाल्यातून मुश्कील होते. त्यामुळे नाल्यात असलेल्या चार ते पाच फूट पाण्यातून मार्गक्रमण करीत शेतात मजुरीसाठी जावे लागते. पाण्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने विंचू, सर्प यांचाही धोका असतो. गावाच्या चौफेर असलेल्या नाल्यात संपूर्ण पावसाळ्यात पाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी निर्माण होऊन ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्नही उभा ठाकतो.याबाबत स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते ईश्वर माळी यांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे नाल्याला पाणी आल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. धांद्रे खुर्द ग्रामस्थांना पावसाळ्यात दरवर्षी ही समस्या सतावत असल्याने प्रशासनाने किमान ये-जा करण्यासाठी नाल्यावर फरशी पूल किंवा रस्ता बनवून पावसाळ्यात होणारे हाल थांबविण्याची मागणी त्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे.