शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मुंबईची एसटी झाली रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाची ...

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी नंदुरबार आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस या शुक्रवारपासूनच थांबणार असल्याने मुंबईच्या एसटीचे रिझर्व्हेशन थांबले आहे. दरम्यान, दुसरीकडे कोरोनामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी कमी झाले असल्याने या बसेसही रिकाम्या धावत आहेत.

नंदुरबार बसस्थानकातून सकाळी व सायंकाळी अशा दोन बसेस मुंबई महानगरासाठी नियमित चालवण्यात येतात. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या बसेसला प्रतिसाद असतो. परंतु कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिक प्रवास करणे टाळत असल्याने या बसेस सध्या रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे. यातून गाड्यांना रिझर्व्हेशनही नसल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिक येथूनही बसला रिझर्व्हेशन नसल्याची माहिती आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवारच्या बंदमध्ये एसटी सहभागी होणार असल्याने आठवड्यातून केवळ पाचच दिवस या बसेस सुरू राहणार असल्याने महामंडळाचे नुकसान वाढणार आहे.

नंदुरबार आगारातून दिवसभरात ५२२ फेऱ्या

नंदुरबारात आगारातून सध्या ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण ५२२ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिवसभरात ३८ हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर या बसेस कापतात. यातून दिवसभरात १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

मोठ्या शहरांसाठी ४८ बसफेऱ्या दैनंदिन चालवण्यात येतात. यात पंढरपूर, नाशिक, मुंबई, पुणे, औरंगबाद आदी शहरांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बसेसमधील प्रवासी संख्या ही निम्म्यावर आली आहे.

मुक्कामी जाणाऱ्या बसेस शुक्रवारपासूनच आगारात थांबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बाहेरगावाहून मुक्कामी येणाऱ्या बसेसलाही थांबवले गेल्याची माहिती नंदुरबार आगारातून देण्यात आली आहे.

नंदुरबार आगारातून मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, औरंगाबाद व पंढरपूर अशा १० बसेस या रातराणी असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बसेसमध्ये प्रवासी नसल्याने त्या रिकाम्या चालवल्या जात असल्याचे दिसून आले आहे. काही शहरांमध्ये रात्री संचारबंदी असल्याने त्या ठिकाणी दिवसा जाण्यावर नागरिकांकडून भर दिला जात असल्याने बसेसची गर्दी कमी झाली आहे.

मुंबईकडे जाण्याची धास्ती

मुंबई परिसरात जिल्ह्यातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. हे नागरिक सण, उत्सव, लग्न यासह विविध कार्यक्रमांसाठी जिल्ह्यात येतात. या प्रवासाला त्यांची पहिली पसंती एसटीला असते. सोबतच येथून शिक्षण, नोकरी तसेच शासकीय कामांसाठी अनेक जण जातात. परंतु कोरोनामुळे नागरिक मुंबईकडे जाणे टाळत आहेत.

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली

जिल्ह्यातून नाशिक किंवा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट आली आहे. रात्रीच्या वेळी जाणाऱ्या बसेसमध्ये सहज जागा मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रवास करणे टाळले जात असल्याने मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवासी संख्या तुरळक आहे. धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाणाऱ्या तसेच सुरतकडे जाणाऱ्या बसेसही रिकाम्या आहेत.

लाॅकडाऊनची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार रात्रीपासूनच बसेस बंद करण्यात येणार आहेत. त्यानुसार नियाेजन सुरू करण्यात आले आहे. शनिवार व रविवारी मुंबई व पुणे येथील बसेसचेही रिझर्व्हेशन देण्यात आलेले नाही.

- मनोज पवार, आगार प्रमुख, नंदुरबार ­