शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मुंबईची एसटी झाली रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाची ...

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी नंदुरबार आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस या शुक्रवारपासूनच थांबणार असल्याने मुंबईच्या एसटीचे रिझर्व्हेशन थांबले आहे. दरम्यान, दुसरीकडे कोरोनामुळे मुंबईकडे जाणारे प्रवासी कमी झाले असल्याने या बसेसही रिकाम्या धावत आहेत.

नंदुरबार बसस्थानकातून सकाळी व सायंकाळी अशा दोन बसेस मुंबई महानगरासाठी नियमित चालवण्यात येतात. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या बसेसला प्रतिसाद असतो. परंतु कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिक प्रवास करणे टाळत असल्याने या बसेस सध्या रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे. यातून गाड्यांना रिझर्व्हेशनही नसल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिक येथूनही बसला रिझर्व्हेशन नसल्याची माहिती आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवारच्या बंदमध्ये एसटी सहभागी होणार असल्याने आठवड्यातून केवळ पाचच दिवस या बसेस सुरू राहणार असल्याने महामंडळाचे नुकसान वाढणार आहे.

नंदुरबार आगारातून दिवसभरात ५२२ फेऱ्या

नंदुरबारात आगारातून सध्या ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण ५२२ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिवसभरात ३८ हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर या बसेस कापतात. यातून दिवसभरात १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

मोठ्या शहरांसाठी ४८ बसफेऱ्या दैनंदिन चालवण्यात येतात. यात पंढरपूर, नाशिक, मुंबई, पुणे, औरंगबाद आदी शहरांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बसेसमधील प्रवासी संख्या ही निम्म्यावर आली आहे.

मुक्कामी जाणाऱ्या बसेस शुक्रवारपासूनच आगारात थांबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बाहेरगावाहून मुक्कामी येणाऱ्या बसेसलाही थांबवले गेल्याची माहिती नंदुरबार आगारातून देण्यात आली आहे.

नंदुरबार आगारातून मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, औरंगाबाद व पंढरपूर अशा १० बसेस या रातराणी असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बसेसमध्ये प्रवासी नसल्याने त्या रिकाम्या चालवल्या जात असल्याचे दिसून आले आहे. काही शहरांमध्ये रात्री संचारबंदी असल्याने त्या ठिकाणी दिवसा जाण्यावर नागरिकांकडून भर दिला जात असल्याने बसेसची गर्दी कमी झाली आहे.

मुंबईकडे जाण्याची धास्ती

मुंबई परिसरात जिल्ह्यातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. हे नागरिक सण, उत्सव, लग्न यासह विविध कार्यक्रमांसाठी जिल्ह्यात येतात. या प्रवासाला त्यांची पहिली पसंती एसटीला असते. सोबतच येथून शिक्षण, नोकरी तसेच शासकीय कामांसाठी अनेक जण जातात. परंतु कोरोनामुळे नागरिक मुंबईकडे जाणे टाळत आहेत.

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली

जिल्ह्यातून नाशिक किंवा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट आली आहे. रात्रीच्या वेळी जाणाऱ्या बसेसमध्ये सहज जागा मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रवास करणे टाळले जात असल्याने मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवासी संख्या तुरळक आहे. धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाणाऱ्या तसेच सुरतकडे जाणाऱ्या बसेसही रिकाम्या आहेत.

लाॅकडाऊनची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार रात्रीपासूनच बसेस बंद करण्यात येणार आहेत. त्यानुसार नियाेजन सुरू करण्यात आले आहे. शनिवार व रविवारी मुंबई व पुणे येथील बसेसचेही रिझर्व्हेशन देण्यात आलेले नाही.

- मनोज पवार, आगार प्रमुख, नंदुरबार ­