शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चिखलामुळे वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा-कुंडी ते होराफळी या घाट सेक्शनच्या रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारकांना त्रासदायक होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा-कुंडी ते होराफळी या घाट सेक्शनच्या रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारकांना त्रासदायक होऊन वाहने चिखलात फसत असल्याने हाल होत आहेत. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने वाहनधारकांना अखेर चिखलात दगड-गोटे गोळा करून चिखलातील खड्ड्यात टाकून वाहने निघतील अशी तात्पुरती डागडूजी करण्याची वेळ आली आहे.चार-पाच दिवसापूर्वी याच रस्त्यावर दरीजवळील वळणावर भाग खचून धोकेदायक झाला होता. त्याठिकाणीही वाहनधारकांनीच खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी दगड ठेवून वाहनधारकांना खचलेल्या रस्त्यापासून सावधान केले होते. अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम घाट सेक्शनच्या मोरंबा- कुंडी ते होराफळी या घाट सेक्शनच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. होराफळी गावाजवळील रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. याठिकाणी रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे असल्याने त्यात पावसाचे पाणी साचून चिखलमय होऊन वाहनधारकांना वाहन काढताना गैरसोयीचे व त्रासदायक होत आहे. वाहने चिखलात फसून जात असल्याने साधी मोटारसायकल काढायला दोन-तीन लोकांनी ढकलून उचलून काढावी लागत आहे.दररोजची होणारी गैरसोय व फजिती बघता संबंधित बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांवरच चिखलमय खड्ड्यात दगड-गोटे टाकून तात्पुरती दुरूस्ती करण्याची वेळ आली आहे. या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था झाली होती व पावसामुळे अधिक भर पडत रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून रस्त्यावर सर्वत्र गुडघाभर चिखल झाला आहे. चार-पाच दिवसापूर्वी वळणावर दरीचा काही भाग खचून रस्ता धोकेदायक झाला होता. त्यामुळे वाहनधारकांना खचलेचा भाग रात्रीच्यावेळी लक्षात यावा यासाठी वाहनधारकांनी जागोजागी दगड ठेवून धोका दर्शविला होता. या कुंडी-होराफळी दरम्यान घाट सेक्शनच्या रस्त्यावर खड्ड्यातील चिखलामुळे होराफळी, खडकापाणी, तिनखुन्या, मोरखी, वालंबा, माल्याआंबा, तोबीकुवा, टोकणापिप्री, गुजरात बॉर्डरच्या परिसरातील वाहनधारकांना गैरसोयीचे व त्रासदायक झाले असून संबधित विभागाने घाट सेक्शनच्या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.