शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या एक रुपया भाडे पट्टय़ाने गाळ जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनातर्फेविविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आता जलसंपदा, मृद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनातर्फेविविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आता जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखालील, तलावाखालील गाळपेर जमीन शेतक:यांना रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पीक उत्पादनासाठी नाममात्र एक रुपये दराने भाडेपट्टयावर देण्यात येणार आहे. दरम्यान, मका व ज्वारीचे 22 टन बियाणे सिंचन सुविधा असलेल्या पाच हजार 166 शेतक:यांना चारा उत्पादनासाठी वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील चार तालुके पुर्ण तर दोन तालुक्यांमधील काही मंडळे ही दुष्काळी जाहीर करण्यात आली आहेत. अपु:या पजर्न्यमानामुळे पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई देखील मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.चा:याची उपलब्धता जिल्ह्यात एकुण जनावरांची संख्या लक्षात घेता मोठय़ा पाळीव जनावरांची संख्या चार लाख पाच हजार 75, शेळ्या, मेंडय़ांची संख्या दोन लाख 85 हजार 904 इतकी आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार पडीकक्षेत्र वनक्षेत्र तसेच खरीप पिकांपासून मिळणारा चारा उपलब्ध पशुधनास पुढील चार महिन्यासाठी पुरेसा आहे. जिल्ह्यात उत्पादीत होणारा चारा जिल्हाबाहेर वाहतुकीस व विक्रीस जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. याशिवाय आरकेव्हीवाय योजनेअंतर्गत मका, ज्वारीचे 22 टन इतके बियाणे जिल्ह्यातील पाच हजार 16 शेतक:यांना चारा उत्पादनासाठी मोफत वाटप करण्यात आले आहे. नाममात्र भाडय़ाने गाळ जमीनजिल्ह्यातील जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखालील , तलावाखालील गाळपेर जमीनी शेतक:यांना चारा पीक उत्पादनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात अवघ्या 1 रुपये नाममात्र दराने भाडेतत्वावर ते उपलब्ध होणार आहे. जेणेकरून गाळपेर जमीनीमध्ये जनावरांसाठी सुयोग्य अशी वैरण व चारापिके घेता येतील. तसेच शेतक:यांकडे उपलब्ध अलसेली वैरण निकृष्ठ चारा सकस करणे, चारा कटाई करून पशुधनास खाण्यासाठी वापरणे, अझोला निर्मिती आदी उपाययोजनाबाबत जिल्ह्यातील पशुपालक शेतक:यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे.आठ विहिरी अधिग्रहीत तीव्र पाणी टंचाई असलेल्या नंदुरबार तालुक्यातील 32 गावांपैकी आठ गावात तहसीलदारांनी खाजगी विहिरी अधिग्रहीत करून त्याद्वारे गावक:यांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यात तलवाडे बुद्रूक, रनाळे, घोटाणे, बलवंड, निंबोणी, दहिंदुले, वेळावद, मांजरे या गावांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यात आणखी काही गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. मजुरांना कामे उपलब्धजिल्ह्यातील मजुरांना कामाअभावी परराज्यात, परजिल्ह्यात स्थलांतरीत होऊ नये यासाठी गावातच रोहयोची कामे उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यात येत्या वर्षभरात 93 हजार 929 मजूर क्षमतेची 27 हजार 906 कामे मंजुर करण्यात आली आहेत. त्यावर 40 कोटी नऊ लाख रुपये खर्चाची तरतूद देखील जिल्हा प्रशासनाने करून ठेवली आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात एक हजार 187 कामे सुरू असून त्यावर पाच हजार 748 मजुर कार्यरत आहेत. मागेल त्याला काम देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.चार महिना पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचा अहवाल कृषी विभागाने आधीच दिला आहे. रब्बी हंगाम देखील यंदा अपेक्षीत प्रमाणात येणार नसल्यामुळे रब्बी पिकांपासूनचा चारा देखील उपलब्ध होणार नाही.त्यामुळे जास्तीत जास्त चारा उत्पादन व्हावे यासाठी कृषी विभागाचा प्रय} सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी याबाबत आढावा बैठका देखील वेळोवेळी घेतल्या आहेत.