शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

निकालासाठी दुर्गम युवकांनी गाठल्या टेकडय़ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:49 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अन्य भागांसह दुर्गम भागात  विधानसभा निवडणूक निकालाची  उत्सुकता  लागून होती. परंतु भ्रमणध्वनीलाच रेंज मिळत ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अन्य भागांसह दुर्गम भागात  विधानसभा निवडणूक निकालाची  उत्सुकता  लागून होती. परंतु भ्रमणध्वनीलाच रेंज मिळत नव्हती, त्यामुळे  रेंजच्या शोधार्थ दुर्गम भागातील बहुतांश युवकांनी टेकडय़ा गाठल्या. टेकडय़ांवर रेंजच्या धरसोड स्थितीतच या युवकांनी निकालाचा धावता आनंद घेतला.  आचारसंहितेपासून रंगणा:या चर्चामध्ये अद्ययावत माहिती ठेवण्याचा प्रत्येक जण प्रय} करीत होता. राजकीय माहिती अद्यायावत ठेवण्यासाठी तेथील जनता भ्रमणध्वनीला रेंज मिळत नसल्याना देखील ठिकठिकाणी संपर्क साधत होता. संपूर्ण जगभर संपर्काचे महाजाळे निर्माण झाले असले तरी संपर्काच्या बाबतीत धडगाव व मोलगी हा परिसर मात्र अपवाद ठरतो, दळणवळण व संपर्काची अनेक साधने आली असतानाही या भागात पुरेशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या गेल्या नाही. त्यामुळे हा परिसर मागास शिवाय उपेक्षित देखील ठरतो. त्यामुळे या भागातील जनतेला काही समस्याशी समाना करावा लागत आहे. असे  असले तरी या समस्यांवर दुर्गम भागातील युवक मात करण्याचा  प्रय} करीत असून असाच  प्रय} यंदाच्या विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी युवकांकडून झाला आहे. बहुतांश गावांमध्ये         रेंजच मिळत नसल्यामुळे निकालाच्या दिवशी दुर्गम भागातील युवक  मोठय़ा कठीण परिस्थितीत निवडणूक निकालाची माहिती मिळविण्याचा प्रय} करताना दिसून आले. काही वेळा मोठय़ा टेकडीच्या अध्र्यावरही रेंज मिळत असते. त्यामुळे युवक अवघड भागातूनही निकालाची  माहिती मिळविण्याचा प्रय} करीत होते. अशी परिस्थिती धडगाव तालुक्यातील कुंडल, खांडबारा, मोजरा, तोरखापाडा, खडक्या, खुंटामोडी तर अक्कलकुवा तालुक्यातील जामली, पिंवटी, उमटी या गावांमध्ये दिसून आली. या गावांमध्ये निकालाच्या दिवशीच   नव्हे तर नेहमीच चांगली रेंज राहत नसल्याचे सांगण्यात येते.   कुंडल, ता.धडगाव येथील एकाउंच टेकडीवरुन निवडणऊक निकालाची माहिती घेतांना विलास पाडवी,  चंद्रसिंग पाडवी, हेमंत पाडवी, शांतीलाल पाडवी, सचिन पाडवी, अश्विन, बादल पाडवी, अंकुश पाडवी, संजय पाडवी वयोगेश पाडवी  यांच्यासह अन्य युवक आढळून     आले. 

धडगाव व मोलगी परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी बीएसएनएल व अन्य काही कंपन्यांमार्फत मनोरे उभारण्यात आले आहेत. परंतु यातून नागरिकांना दळणवळणाची योग्य ती सेवा दिली जात नाही. त्यामुळे तेथील नागरिकांमार्फत नेहमीच तक्रारी करण्यात आल्या परंतु संबंधित यंत्रणांमार्फत मागण्यांची दखल घेतली गेली नाही. परिणामी अजूनही (काही प्रमुख गावे वगळता)  हा भाग संपर्क क्षेत्रात येऊ शकला नाही. असे असले तरी या भागातील प्रत्येक नागरिकांकडे भ्रमणध्वनी आढळून येत आहे. त्यातच बहुतांश युवकांकडे महागडे भ्रमणध्वनी असून ते नेहमीच व्हॉट्सअपचा वापर देखील करीत आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच माहिती मिळविण्याचा युवकांनी प्रय} केला.