शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पावसाची यंदा सर्वाधिक झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मागील काही वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात या वर्षी सर्वाधिक पाऊस झाला. या पाऊसामुळे सर्वाधिक गावांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागील काही वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात या वर्षी सर्वाधिक पाऊस झाला. या पाऊसामुळे सर्वाधिक गावांना झळ पोहोचली असून लाल पट्टय़ातील गावांशिवाय अन्य गावातील नागरिकांना देखील या पावसाचा सामना करावा लागला. नंदुरबार जिल्ह्यात 2006 च्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी महापूर आले होते. त्या पूराची झळ जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांना सहन करावा लागली होती. परंतु त्याहीपेक्षा यंदाची अतिवृष्टी  अधिक राहिली असून जिल्ह्यात 119. 42 टक्के पर्जन्यवृष्टी झाल्याची नोंद शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे 12 वर्षापूर्वीच्या पुराच्या धोक्यापेक्षा यंदाचा पूर गंभीर असल्याचे म्हटले  जात आहे. जिल्ह्यात पुराच्या दृष्टीने सर्वाधिक धोका पोहोचणा:या गावांची संख्या 108 आहे. त्यात नंदरबार तालुक्यात 26, शहादा तालुक्यात   41, नवापूर तालुक्यात आठ तर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील नर्मदा नदी काठावरील 33 गावांचा समावेश असून ही गावे लाल पट्टय़ातील ठरत आहे. यंदाच्या पावसामुळे या लाल पट्टय़ातील 108 गावांना नेहमीप्रमाणे झळ पोहोचलीच. परंतु तळोदा तालुक्यात एकही गाव लाल पट्टय़ात येत नाही. त्याशिवाय अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा हे गाव देखील लाल पट्टय़ांतर्गत येत नाही. असे असतानाही तळोदा तालुक्यातून वाहणा:या निझरा नदीच्या पुराचे पाणी थेट तळोदा शहरात शिरले तर अक्कलकुवा शहरातून वाहणा:या  वरखेडी नदीचा पूर सोरापाडा गावात शिरला. दोन्ही ठिकाणच्या पुरात काही कुटुंबियांचा संसार उघडय़ावर आला होता. सोरापाडा येथील नुकसानग्रस्तांसाठी विविध यंत्रणेच्या माध्यमातून मदतनिधी गोळा करण्यात आला होता, त्यातून काही प्रमाणात पूरपिडीतांना नुकसानीतून सावरता आले. त्याशिवाय शहादा शहरात देखील पुराने यंदा कहरच केला होता. परिणामी तळोदा, सोरापाडा व शहाद्यातील जनजीवन धोक्यात आले होते. तालुक्यातील संपूर्ण वाहतुक व्यवस्था बंद पडल्याने तीन राज्यातील प्रवाशांना त्रास सहन करावा     लागला.त्याशिवाय दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यातील वाहतुक व्यवस्था देखील कोलमडली. काही वाहतुक आजही बंदच असल्याने नागरिकांना अडचणींशी दोन हात करावे लागत आहे. 

यंदाच्या पावसाने पुरात वाहून गेलेल्यांची संख्या चार तर वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाच अशी एकुण नऊ जणांचा बळी गेला. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत तीनने अधिक असल्याची नोंद शासनाकडे करण्यात आली आहे.खरीप हंगामातील पिकांचे देखील या वर्षी सर्वाधिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतक:यांना नुकसानीचा मोबदला देण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.