शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

मोरंबा-होराफळी रस्ता ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 11:36 IST

अपूर्ण काम : घाटातील रस्ता असताना संरक्षण भिंती नाही, दरडच्या दगडांमुळे वाहतुकीस अडथळा

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा-कुंडी ते होराफळी या घाटसेक्शनच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असून घाटसेक्शनचा रस्ता असतानाही आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत बांधलेल्या नाहीत. पावसाळ्यात जागोजागी कोसळलेली रस्त्यावरील दरड ‘जैसे थे’ पडून असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचे ठरत असून हा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.मोरंबा-कुंडी ते होराफळी रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे  झाल्याने  रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पाणी निघण्यासाठी चारी बनविलेली नसल्याने डोगरांचे उतार पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावर चढ-उताराचे मोठमोठे खड्डे पडून वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहेत. खडीकरण व डांबरीकरणाचे काम झाले नसल्याने रस्त्यावरून ये-जा करणा:या वाहनांमुळे उडणारे धुळीचे कण डोळ्यात जाऊन अपघात घडू शकतो. घाटसेक्शनचा रस्ता असतानाही आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत बांधल्या नसल्याने वाहनधारकांसाठी हा रस्ता धोकेदायक झाला आहे. पावसाळ्यात  कोसळलेली दरडदेखील ‘जैसै थे’च असून ग्रामस्थांनी वाहने निघतील असे दगड-गोटे व माती सरकवली. मात्र मोठमोठे दगड तसेच पडून असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी याकडे लक्ष देवून रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणासह आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम चांगल्या दर्जाचे करून वाहनधारकांचे होणारे   हाल थांबवावेत, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे.