जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा बँकेकडून सुमारे सहा हजार ९९० शेतकऱ्यांना ७५ कोटी ९४ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. कर्ज वितरणात जिल्हा बँक अव्वल राहिली होती. यातील अडीच हजार शेतकरी हे नियमित कर्जाची परतफेड करत असल्याचे सांगण्यात आले होते. रब्बी हंगामात कर्ज घेणारे दोन हजार ८००च्या जवळपास शेतकऱ्यांकडूनही कर्जाचा परतावा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा बँकसोबतच गेल्या वर्षात ६१ हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट्य घेणाऱ्या बँकांकडून केवळ १८ हजार ३८१ शेतकऱ्यांना १२५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती आहे. खासगी बँकांनी गेल्या वर्षात सरासरी २७ टक्केच कर्जवाटप केले होते. यात कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच कर्जमुक्तीतील २५ हजार शेतकऱ्यांची कर्ज खाती यंदा अपडेट झाल्याने आगामी खरीप हंगाम कर्जवाटपाचे आकडे हे २०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या कर्जवाटपाला जिल्हा प्रशासनाने लक्ष देत गती दिल्यास शेतकऱ्यांना जूनपूर्वी कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.
जिल्ह्यातील ११ हजारपेक्षा अधिक शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST