शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

नोकरीवालाच वर हवाची मानसिता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

नंदुरबार : समाजात मुलींची कमी होणारी संख्या, शिक्षित व नोकरदार मुलींचे वाढते प्रमाण यामुळे आता प्रत्येक जणाचा शिक्षित आणि ...

नंदुरबार : समाजात मुलींची कमी होणारी संख्या, शिक्षित व नोकरदार मुलींचे वाढते प्रमाण यामुळे आता प्रत्येक जणाचा शिक्षित आणि नोकरीवाला वर पाहण्याकडे कल राहत आहे. त्यामुळे बेरोजगार किंवा शेतकरी वराला अपेक्षित मागणी राहत नसल्याचे चित्र आहे. वधू-वर सूचक मंडळातदेखील वधूकडील मंडळींच्या अपेक्षा याबाबत बरेच काही सांगून जात आहे.

सध्या कोरोनाचा कहर असला तरी लग्नांचे बार उडविण्याचे कमी झालेले नाही. शासन, प्रशासनाच्या नियमांना अधीन राहून किंवा काही भागात त्याचे पालन न होताच मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभ होत आहेत. समाजात सध्या मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे. जन्मदरातील तफावतदेखील बरेच काही सांगून जात आहे. जिल्ह्यात दर हजारामागे मुलींचा जन्मदर हा ९८० पर्यंत आहे. गेल्या काही काळात तो स्थिर असला तरी यामुळे मात्र लग्नासाठी अनेकांना वधू मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे प्रत्येक वधूपिता व तरुणी शिक्षित आणि नोकरीवाला वर शोधत आहेत.

सद्या कोरोनामुळे लग्न समारंभांवर मर्यादा आल्या आहेत. कमी पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत लग्न समारंभ आटोपते घ्यावे लागत आहेत. त्यात पैसा आणि वेळही वाचत असल्याने समाधान आहे.

अटी मान्य असतील तरच लग्नाचे बोला...

वधूपित्याकडून वरमंडळींना विविध अटी घालण्याचे प्रमाणदेखील सध्याच्या स्थितीत वाढत आहे. यामुळे मात्र एकत्र कुटुंब, थोरामोठ्यांचा मानसन्मान यांना तिलांजली दिली जात असल्याचेही चित्र निर्माण होत आहे. लग्नाच्या आधीच वधूकडील मंडळींकडून टाकल्या जाणाऱ्या अटींमध्ये मुलगा शहरी भागातच राहणारा असावा. नोकरीच्या ठिकाणीच त्याचा फ्लॅट किंवा भाड्याचे घर असावे. सोबत सासू, सासरे किंवा इतर कुणीही मंडळी नको. मुलगा सहसा नोकरी करणाराच असावा व ग्रामीण भागात राहणारा नसावा अशा अटी असतात. ज्याच्याकडे शेती मोठ्या प्रमाणावर असली तरी केवळ शहरी भागात राहत नाही म्हणून त्याला नकार देण्याचे प्रकारदेखील वधूकडील मंडळींकडून घडल्याचे चित्र आहे. त्यामुळे वधूमंडळींच्या वाढत्या अपेक्षा आणि अटींमुळे वराकडील मंडळींना ते जिकिरीचे ठरत असल्याचेही दिसून येते.

वधूकडील मंडळींच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. यामुळे सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे आता प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तडजोडीने व समविचारी घराणे मिळाले अशा ठिकाणी सोयरीक जुळविण्यास हरकत नाही.

- एक वरपिता, नंदुरबार

मुलींची संख्या कमी होत असली तरी वराकडील मंडळींकडून अपेक्षा कमी झालेल्या नाहीत. विवाहात अमुकच पाहिजे, लग्न समारंभ भव्य-दिव्य झाला पाहिजे अशी अपेक्षा असते. कोरोनामुळे मर्यादा आल्या असल्याने समाधान आहे.

-वधूपिता, नंदुरबार