शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीवालाच वर हवाची मानसिता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

नंदुरबार : समाजात मुलींची कमी होणारी संख्या, शिक्षित व नोकरदार मुलींचे वाढते प्रमाण यामुळे आता प्रत्येक जणाचा शिक्षित आणि ...

नंदुरबार : समाजात मुलींची कमी होणारी संख्या, शिक्षित व नोकरदार मुलींचे वाढते प्रमाण यामुळे आता प्रत्येक जणाचा शिक्षित आणि नोकरीवाला वर पाहण्याकडे कल राहत आहे. त्यामुळे बेरोजगार किंवा शेतकरी वराला अपेक्षित मागणी राहत नसल्याचे चित्र आहे. वधू-वर सूचक मंडळातदेखील वधूकडील मंडळींच्या अपेक्षा याबाबत बरेच काही सांगून जात आहे.

सध्या कोरोनाचा कहर असला तरी लग्नांचे बार उडविण्याचे कमी झालेले नाही. शासन, प्रशासनाच्या नियमांना अधीन राहून किंवा काही भागात त्याचे पालन न होताच मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभ होत आहेत. समाजात सध्या मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे. जन्मदरातील तफावतदेखील बरेच काही सांगून जात आहे. जिल्ह्यात दर हजारामागे मुलींचा जन्मदर हा ९८० पर्यंत आहे. गेल्या काही काळात तो स्थिर असला तरी यामुळे मात्र लग्नासाठी अनेकांना वधू मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे प्रत्येक वधूपिता व तरुणी शिक्षित आणि नोकरीवाला वर शोधत आहेत.

सद्या कोरोनामुळे लग्न समारंभांवर मर्यादा आल्या आहेत. कमी पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत लग्न समारंभ आटोपते घ्यावे लागत आहेत. त्यात पैसा आणि वेळही वाचत असल्याने समाधान आहे.

अटी मान्य असतील तरच लग्नाचे बोला...

वधूपित्याकडून वरमंडळींना विविध अटी घालण्याचे प्रमाणदेखील सध्याच्या स्थितीत वाढत आहे. यामुळे मात्र एकत्र कुटुंब, थोरामोठ्यांचा मानसन्मान यांना तिलांजली दिली जात असल्याचेही चित्र निर्माण होत आहे. लग्नाच्या आधीच वधूकडील मंडळींकडून टाकल्या जाणाऱ्या अटींमध्ये मुलगा शहरी भागातच राहणारा असावा. नोकरीच्या ठिकाणीच त्याचा फ्लॅट किंवा भाड्याचे घर असावे. सोबत सासू, सासरे किंवा इतर कुणीही मंडळी नको. मुलगा सहसा नोकरी करणाराच असावा व ग्रामीण भागात राहणारा नसावा अशा अटी असतात. ज्याच्याकडे शेती मोठ्या प्रमाणावर असली तरी केवळ शहरी भागात राहत नाही म्हणून त्याला नकार देण्याचे प्रकारदेखील वधूकडील मंडळींकडून घडल्याचे चित्र आहे. त्यामुळे वधूमंडळींच्या वाढत्या अपेक्षा आणि अटींमुळे वराकडील मंडळींना ते जिकिरीचे ठरत असल्याचेही दिसून येते.

वधूकडील मंडळींच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. यामुळे सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे आता प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तडजोडीने व समविचारी घराणे मिळाले अशा ठिकाणी सोयरीक जुळविण्यास हरकत नाही.

- एक वरपिता, नंदुरबार

मुलींची संख्या कमी होत असली तरी वराकडील मंडळींकडून अपेक्षा कमी झालेल्या नाहीत. विवाहात अमुकच पाहिजे, लग्न समारंभ भव्य-दिव्य झाला पाहिजे अशी अपेक्षा असते. कोरोनामुळे मर्यादा आल्या असल्याने समाधान आहे.

-वधूपिता, नंदुरबार