शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येकडील वा-यांचा प्रभाव वाढल्याने राज्यभरात मान्सून परतला

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: August 13, 2018 11:39 IST

‘आयएमडी’ची माहिती : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

ठळक मुद्देमान्सून ट्रफ उत्तरेत सक्रीय15 ते 18 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ईशान्येकडील मान्सून वा:यांचा जोर वाढू लागला असून हवेचा दाब कमी झाला आह़े शिवाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यातून मध्य महाराष्ट्रासह कोकण, विदर्भात श्रावण सरी पुन्हा परतल्या आहेत़ असे असले  तरी खान्देशात जुन व जुलै महिन्यातील पावसाच्या खंडाची तुट परतीचा पाऊस भरुन काढण्याची शक्यता कमी असल्याचे ‘आयएमडी’तर्फे सांगण्यात येत आह़े तब्बल 45 दिवसानंतर बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या दृष्टीने सकारात्मक घडामोडी  घडल्या आहेत़ उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आह़े त्यामुळे याचे सकारात्मक परिणाम म्हणून राज्यात विविध ठिकाणी तुरळक स्वरुपाचा का होईना परंतु मान्सून परतला आह़े हवेच्या दाबाचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने पुढील मान्सूनवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झालेले आहेत़ सध्या हवेचा दाब कमी असल्याने खान्देशात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावलेली दिसून येतेय़ परंतु ही स्थिती फार काळ टिकणार नसल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े 25 ऑगस्टनंतर पुन्हा हवेचा दाब वाढणार असून त्यामुळे मान्सूनला अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आह़े हिमालयाच्या पायथ्याची बाष्पयुक्त ढगांना निर्माण झालेला अडथळा दूर झाल्याने आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहू लागलेले आहेत़ त्यामुळे हा बदलाचा कालखंड सुरु असून यामुळे खान्देशात बहुतेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आह़े 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान, तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आह़े परंतु त्यानंतर हवेच्या दाबावर मान्सूनची स्थिती अवलंबून असणार असल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े मान्सून ट्रफ उत्तरेत सक्रीयमान्सून ट्रफ हा उत्तरेकडे अधिक सक्रीय असल्याने उत्तरेकडील प्रदेशात त्यापासून मोठय़ा प्रमाणावर मान्सून मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े खान्देशासह मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसार्पयत तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता ू‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात येत आह़े खान्देशात जुन व जुलै महिन्यात पावसाच्या पडलेल्या खंडाची तुट भरुन काढण्याची सर्व भिस्त आता परतीच्या पावसावर आह़े ही संपूर्ण तुट भरुन काढणे परतीच्या पावसाने शक्य नसले तरी, मागील काही वर्षाच्या परतीच्या पावसाची टक्केवारी बघता साधारणत 60 टक्के तुट भरुन निघण्याची शक्यता ‘आयएमडी’तर्फे व्यक्त होत आह़े 2015 साली नंदुरबारात सरासरी 379 मि़मी इतका परतीचा पाऊस झालेला होता़ त्याच प्रमाणे 2016 - 357 मि़मी़ व मागील वर्षी 458 मि़मी इतका परतीचा पाऊस झाला असल्याची माहिती देण्यात आली़ परतीच्या पावसाचा कालखंड साधारणत सप्टेंबरच्या शेवटापासून सुरु होत असतो़ 2016 मध्ये 15 सप्टेंबरपासून ईशान्य-पूर्व भारतातून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली होती़ तर, 14 ऑक्टोबरपासून मध्य महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात होऊन केवळ दोनच दिवसात म्हणजे 16 ऑक्टोबर्पयत परतीचा पावसाचा कालखंड पूर्ण झाला होता़तर, 2017 साली 27 सप्टेंबरपासून पंजाब, हरियाणा येथून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली होती़ 15 ऑक्टोबर पासून मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली होती़ साधारणत 24 ऑक्टोबर्पयत परतीच्या पावसाचा कालखंड पूर्ण झालेला होता़ यंदाही साधारणत सप्टेंबरच्या मध्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता ‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात आलेली आह़े मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसातून चांगला मान्सून मिळाल्याचे मागील आकडेवारीतून दिसत़े