शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोमवार ठरला ‘कही खुशी कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या शहादा शहरासह तालुक्याला सोमवारचा दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या शहादा शहरासह तालुक्याला सोमवारचा दिवस ‘कही खुशी कही गम’ असा ठरला. सोमवारी तब्बल शहरातील पाच व तालुक्यातील तोरखेडा येथील एक अशा सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना जिल्हा रुग्णालयातर्फे घरी पाठविण्यात आले. तर दिवसभरात शहरात गरीब-नवाज कॉलनीत एक, कुंभारगल्ली व गांधीनगर भागातील मयताच्या कुटुंबातील सात असे आठ बाधित रुग्ण आढळून आले आहे. रविवारी सायंकाळी उशिरा मुंबई येथून परत शहाद्याकडे येणाºया मलोणी येथील एकाचा मृत्यू झाला आहे.२२ एप्रिलला शहरात पहिला बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर मे महिन्यापर्यंत ही संख्या १० झाली होती. या कालावधीत या दहापैकी एकाचे निधन झाले होते तर उर्वरित नऊ रुग्णांनी कोरोना संक्रमणावर यशस्वीपणे मात केली होती. मात्र जून महिन्यात पुन्हा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर जुलै महिन्याच्या गतसप्ताहात शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत चालली होती.सोमवारअखेर शहरात व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा हा ९० झाला आहे. पैकी १० मयत झाले असून ४३ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सोमवारी शहरासह तालुक्यातील २४ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. पैकी १६ अहवाल निगेटीव्ह आले असून आठ कोरोना बाधित आले आहे. नव्याने आढळून आलेल्या या बाधित रुग्णांमध्ये कुंभारगल्ली व गांधीनगर येथील मयत रुग्णाच्या कुटुंबातील सात सदस्यांचा समावेश आहेतालुक्यातील तोरखेडा येथील एक व शहरातील मुलब्रिज नगर, सदाशिवनगर व विजयनगर येथील प्रत्येकी एक तर डोंगरगाव रस्त्यावरील दोन अशा पाच बाधितांनी कोरोना संक्रमणावर यशस्वीपणे मात केली आहे. उपचाराअंती बºया झालेल्या सर्वांना सोमवारी जिल्हा रुग्णालयाकडून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे घरी पोहोचविण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार शहरातील गरीब-नवाज कॉलनीतील ४० वर्षीय पुरुषाचा कोरोना बाधित अहवाल आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील गरीब-नवाज कॉलनीतील बाधित रुग्णाच्या अतिसंपर्कातील तीन, पाडळदा व सोनवद येथील बाधित रुग्णाच्या अतिसंपर्कातील व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.दरम्यान, रविवारी मलोणी येथील एका नागरिकाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती गेल्या चार महिन्यांपासून मुंबई येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होता. मुंबई येथून परत मलोणी येथे येत असताना त्याचे रस्त्यात निधन झाले. मलोणी परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित न करता अन्य उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली आहे. बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या अतिसंपर्कातील व्यक्तींचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात असून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णाच्या परिसरात निर्जंतुकीकरण केले जात आहे.