शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अखेर उत्तरपत्रिका नेण्यास मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नियमकांकडे रखडून पडलेल्या दहावी-बारावीच्या उत्तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नियमकांकडे रखडून पडलेल्या दहावी-बारावीच्या उत्तर पत्रिका गुरूवारी नाशिक विभागीय मंडळाने शहादा व नंदुरबार केंद्रावर अखेर जमा केल्यात. जिल्ह्यातील १२३ नियमकांनी या उत्तर पत्रिका बोर्डाकडे स्वाधीन केल्या. तब्बल दोन महिन्यांपर्यंत उत्तर पत्रिकांचा गाठोड्यांची डोळ्यात तेल टाकून काळजी घेत मनावरील प्रचंड दडपण दूर झाल्याने शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे सांगितले.कोरोना या महामारीचा राज्यात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन केले आहे. साहजिकच संचारबंदीमुळे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा परिणाम दहावी व बारावीच्या परीक्षांबरोबरच नाशिक विभागीय मंडळांनी नियमकांकडे तपासणी करीता पाठविलेल्या उत्तर पत्रिकांवर झाला होता. इतिसाहाचा पेपर वगळता सर्वच विषयांचे पेपर परिक्षकांकडून तपासणी केल्यानंतर पुनर्तपासणीसाठी नियमकांकडे आले होते. नाशिक बोर्डाने पुनर्तपासणी करून २८ मार्च ते १० एप्रिलपर्यंत बोर्डात जमा करण्याचे वेळापत्रक नियमकांना दिले होते. त्यामुळे नियमकांनीदेखील युद्ध पातळीवर पुनर्तपासणीचे काम करून पेपरचे गाठोडे सुसज्ज केले. मात्र शासनाने लॉकडाऊनच्या मर्यादेत सातत्याने वाढ केली. साहजिकच वाहतुकीअभावी पेपर जमा करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. परिणामी गेल्या दीड दोन महिन्यापासून नियमकांकडे पेपरचे हे गाठोडे तसेच पडून राहिले होते. शेवटी दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकालाला लागणारा वाढता विलंब लक्षात घेऊन नाशिक विभागीय मंडळाने पोलीस विभागाकडे वाहतुकीची विशेष परवानगी मागितली. त्यानुसार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारपासून तपासलेल्या उत्तर पत्रिका केंद्रानिहाय जमा करण्याची कार्यवाही सुरू केली. जिल्ह्यात नंदुरबार व शहादा ही केंद्रे निश्चित करण्यात आली होती.शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगावसाठी शहादा तर नंदुरबार, नवापूरसाठी नंदुरबार केंद्र निश्चित करण्यात आली होती. जिल्ह्यातील नियामक शिक्षकांनी या दोन केंद्रांवर मंडळाचे विभागीय सचिव नितीन उपासणी यांच्या उपस्थितीत जमा करून उत्तर पत्रिकांच्या गोण्या वाहनाने मंडळात रवाना केल्या. जिल्ह्यातून १२३ नियमकांनी उत्तरपत्रिका जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदा कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमिवर नाशिक विभागीय परीक्षा मंडळाने उत्तरपत्रिका केंद्रस्तरीय संकलन पद्धतीचा अवलंब केला असला तरी पुढील वर्षीही अशाच पद्धतीने संकलन करावे, अशी शिक्षकांची मागणी आहे. कारण तपासलेल्या उत्तर पत्रिका मंडळात शिक्षकांनाच न्याये लागतात. यात शिक्षकांचा नाहक वेळ खर्च होतो. शिवाय प्रवास भाडे, डी.ए.मुळे बोर्डालाही अधिक पैसा खर्च करावा लागतो. एकाच वाहनातून जिल्ह्यातील संपूर्ण उत्तर पत्रिका नेण्यात आल्याने मोठी आर्थिक बचत झाली आहे. याबाबत शिक्षकांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.