शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उत्तरपत्रिका नेण्यास मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नियमकांकडे रखडून पडलेल्या दहावी-बारावीच्या उत्तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नियमकांकडे रखडून पडलेल्या दहावी-बारावीच्या उत्तर पत्रिका गुरूवारी नाशिक विभागीय मंडळाने शहादा व नंदुरबार केंद्रावर अखेर जमा केल्यात. जिल्ह्यातील १२३ नियमकांनी या उत्तर पत्रिका बोर्डाकडे स्वाधीन केल्या. तब्बल दोन महिन्यांपर्यंत उत्तर पत्रिकांचा गाठोड्यांची डोळ्यात तेल टाकून काळजी घेत मनावरील प्रचंड दडपण दूर झाल्याने शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे सांगितले.कोरोना या महामारीचा राज्यात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन केले आहे. साहजिकच संचारबंदीमुळे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा परिणाम दहावी व बारावीच्या परीक्षांबरोबरच नाशिक विभागीय मंडळांनी नियमकांकडे तपासणी करीता पाठविलेल्या उत्तर पत्रिकांवर झाला होता. इतिसाहाचा पेपर वगळता सर्वच विषयांचे पेपर परिक्षकांकडून तपासणी केल्यानंतर पुनर्तपासणीसाठी नियमकांकडे आले होते. नाशिक बोर्डाने पुनर्तपासणी करून २८ मार्च ते १० एप्रिलपर्यंत बोर्डात जमा करण्याचे वेळापत्रक नियमकांना दिले होते. त्यामुळे नियमकांनीदेखील युद्ध पातळीवर पुनर्तपासणीचे काम करून पेपरचे गाठोडे सुसज्ज केले. मात्र शासनाने लॉकडाऊनच्या मर्यादेत सातत्याने वाढ केली. साहजिकच वाहतुकीअभावी पेपर जमा करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. परिणामी गेल्या दीड दोन महिन्यापासून नियमकांकडे पेपरचे हे गाठोडे तसेच पडून राहिले होते. शेवटी दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकालाला लागणारा वाढता विलंब लक्षात घेऊन नाशिक विभागीय मंडळाने पोलीस विभागाकडे वाहतुकीची विशेष परवानगी मागितली. त्यानुसार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारपासून तपासलेल्या उत्तर पत्रिका केंद्रानिहाय जमा करण्याची कार्यवाही सुरू केली. जिल्ह्यात नंदुरबार व शहादा ही केंद्रे निश्चित करण्यात आली होती.शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगावसाठी शहादा तर नंदुरबार, नवापूरसाठी नंदुरबार केंद्र निश्चित करण्यात आली होती. जिल्ह्यातील नियामक शिक्षकांनी या दोन केंद्रांवर मंडळाचे विभागीय सचिव नितीन उपासणी यांच्या उपस्थितीत जमा करून उत्तर पत्रिकांच्या गोण्या वाहनाने मंडळात रवाना केल्या. जिल्ह्यातून १२३ नियमकांनी उत्तरपत्रिका जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदा कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमिवर नाशिक विभागीय परीक्षा मंडळाने उत्तरपत्रिका केंद्रस्तरीय संकलन पद्धतीचा अवलंब केला असला तरी पुढील वर्षीही अशाच पद्धतीने संकलन करावे, अशी शिक्षकांची मागणी आहे. कारण तपासलेल्या उत्तर पत्रिका मंडळात शिक्षकांनाच न्याये लागतात. यात शिक्षकांचा नाहक वेळ खर्च होतो. शिवाय प्रवास भाडे, डी.ए.मुळे बोर्डालाही अधिक पैसा खर्च करावा लागतो. एकाच वाहनातून जिल्ह्यातील संपूर्ण उत्तर पत्रिका नेण्यात आल्याने मोठी आर्थिक बचत झाली आहे. याबाबत शिक्षकांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.