शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अखेर उत्तरपत्रिका नेण्यास मिळाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नियमकांकडे रखडून पडलेल्या दहावी-बारावीच्या उत्तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नियमकांकडे रखडून पडलेल्या दहावी-बारावीच्या उत्तर पत्रिका गुरूवारी नाशिक विभागीय मंडळाने शहादा व नंदुरबार केंद्रावर अखेर जमा केल्यात. जिल्ह्यातील १२३ नियमकांनी या उत्तर पत्रिका बोर्डाकडे स्वाधीन केल्या. तब्बल दोन महिन्यांपर्यंत उत्तर पत्रिकांचा गाठोड्यांची डोळ्यात तेल टाकून काळजी घेत मनावरील प्रचंड दडपण दूर झाल्याने शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे सांगितले.कोरोना या महामारीचा राज्यात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने गेल्या २४ मार्चपासून लॉकडाऊन केले आहे. साहजिकच संचारबंदीमुळे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा परिणाम दहावी व बारावीच्या परीक्षांबरोबरच नाशिक विभागीय मंडळांनी नियमकांकडे तपासणी करीता पाठविलेल्या उत्तर पत्रिकांवर झाला होता. इतिसाहाचा पेपर वगळता सर्वच विषयांचे पेपर परिक्षकांकडून तपासणी केल्यानंतर पुनर्तपासणीसाठी नियमकांकडे आले होते. नाशिक बोर्डाने पुनर्तपासणी करून २८ मार्च ते १० एप्रिलपर्यंत बोर्डात जमा करण्याचे वेळापत्रक नियमकांना दिले होते. त्यामुळे नियमकांनीदेखील युद्ध पातळीवर पुनर्तपासणीचे काम करून पेपरचे गाठोडे सुसज्ज केले. मात्र शासनाने लॉकडाऊनच्या मर्यादेत सातत्याने वाढ केली. साहजिकच वाहतुकीअभावी पेपर जमा करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. परिणामी गेल्या दीड दोन महिन्यापासून नियमकांकडे पेपरचे हे गाठोडे तसेच पडून राहिले होते. शेवटी दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकालाला लागणारा वाढता विलंब लक्षात घेऊन नाशिक विभागीय मंडळाने पोलीस विभागाकडे वाहतुकीची विशेष परवानगी मागितली. त्यानुसार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारपासून तपासलेल्या उत्तर पत्रिका केंद्रानिहाय जमा करण्याची कार्यवाही सुरू केली. जिल्ह्यात नंदुरबार व शहादा ही केंद्रे निश्चित करण्यात आली होती.शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगावसाठी शहादा तर नंदुरबार, नवापूरसाठी नंदुरबार केंद्र निश्चित करण्यात आली होती. जिल्ह्यातील नियामक शिक्षकांनी या दोन केंद्रांवर मंडळाचे विभागीय सचिव नितीन उपासणी यांच्या उपस्थितीत जमा करून उत्तर पत्रिकांच्या गोण्या वाहनाने मंडळात रवाना केल्या. जिल्ह्यातून १२३ नियमकांनी उत्तरपत्रिका जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदा कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमिवर नाशिक विभागीय परीक्षा मंडळाने उत्तरपत्रिका केंद्रस्तरीय संकलन पद्धतीचा अवलंब केला असला तरी पुढील वर्षीही अशाच पद्धतीने संकलन करावे, अशी शिक्षकांची मागणी आहे. कारण तपासलेल्या उत्तर पत्रिका मंडळात शिक्षकांनाच न्याये लागतात. यात शिक्षकांचा नाहक वेळ खर्च होतो. शिवाय प्रवास भाडे, डी.ए.मुळे बोर्डालाही अधिक पैसा खर्च करावा लागतो. एकाच वाहनातून जिल्ह्यातील संपूर्ण उत्तर पत्रिका नेण्यात आल्याने मोठी आर्थिक बचत झाली आहे. याबाबत शिक्षकांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.