शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जलकुंभाच्या परिसरात मोकाट कुत्रे आणि काटेरी झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:26 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   राज्यातील अनेक शहरांमध्ये जलकुंभात डेंग्यूच्या डासाच्या अळ्या सापडणे, अस्वच्छता आणि गळतीमुळे साथीच्या ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   राज्यातील अनेक शहरांमध्ये जलकुंभात डेंग्यूच्या डासाच्या अळ्या सापडणे, अस्वच्छता आणि गळतीमुळे साथीच्या आजारांची लागण होणे असे प्रकार सुरू आहेत. नंदुरबार पालिकेमार्फत मात्र जलकुंभांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाते. त्यासाठी नियमित जलकुंभ स्वच्छ केले जात असल्याचा दावा पालिकेचा आहे. परंतु ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये मात्र काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून आले. त्याकडे पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्प व आंबेबारा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्या ठिकाणाहून आलेल्या पाईपलाईनमधून साक्रीनाका, शांतीनगर व संजय नगर या मोठ्या जलकुंभात पाणी साठवण करून इतर १२ लहान जलकुंभात ते नेले जाते. त्या माध्यमातून शहरातील साधारणत: १६ हजारांपेक्षा अधिक नळजोडणीधारकांना आणि शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालय, शासकीय वसतिगृह यांना पाणीपुरवठा केला जातो. शहराची आगामी अर्थात २०४० पर्यंतच्या लोकसंख्येला अनुसरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे विविध आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर होते. आजारांचे मूळ कारण अशुद्ध पाणी हेच आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार पालिकेचे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि सर्वच १५ जलकुंभ हे दर २० ते २५ दिवसात स्वच्छ केले जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. रहिवासी वस्तीत असलेल्या जलकुंभांच्या परिसरात काही नागरिक अस्वच्छता करतात, तेथेच पाणी भरण्यासाठी येणे आणि कपडे धुणे असे प्रकार करतात. ते होऊ नये यासाठी शांतीनगर व संजयनगर जलकुंभ परिसरात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साक्रीनाका जलकुंभाच्या परिसरात आणखी उपाययोजना आवश्यक आहे. इतर जलकुंभ हे नवीन व उंचावर असल्याने तेथे कुणी जाऊ शकत नाही.पावसाळ्यात पाईपलाईन लिकेज होणे, व्हाॅल्व्ह नादुरुस्त होणे असे प्रकार होत असल्यामुळे काही भागात अशुद्ध पाणीपुरवठा होतो. परंतु तो देखील वेळीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न असतो. अस्वच्छता आणि अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आणखी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.