शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

जलकुंभाच्या परिसरात मोकाट कुत्रे आणि काटेरी झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:26 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   राज्यातील अनेक शहरांमध्ये जलकुंभात डेंग्यूच्या डासाच्या अळ्या सापडणे, अस्वच्छता आणि गळतीमुळे साथीच्या ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   राज्यातील अनेक शहरांमध्ये जलकुंभात डेंग्यूच्या डासाच्या अळ्या सापडणे, अस्वच्छता आणि गळतीमुळे साथीच्या आजारांची लागण होणे असे प्रकार सुरू आहेत. नंदुरबार पालिकेमार्फत मात्र जलकुंभांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाते. त्यासाठी नियमित जलकुंभ स्वच्छ केले जात असल्याचा दावा पालिकेचा आहे. परंतु ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये मात्र काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून आले. त्याकडे पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे.नंदुरबार शहराला विरचक प्रकल्प व आंबेबारा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्या ठिकाणाहून आलेल्या पाईपलाईनमधून साक्रीनाका, शांतीनगर व संजय नगर या मोठ्या जलकुंभात पाणी साठवण करून इतर १२ लहान जलकुंभात ते नेले जाते. त्या माध्यमातून शहरातील साधारणत: १६ हजारांपेक्षा अधिक नळजोडणीधारकांना आणि शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालय, शासकीय वसतिगृह यांना पाणीपुरवठा केला जातो. शहराची आगामी अर्थात २०४० पर्यंतच्या लोकसंख्येला अनुसरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे विविध आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर होते. आजारांचे मूळ कारण अशुद्ध पाणी हेच आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार पालिकेचे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि सर्वच १५ जलकुंभ हे दर २० ते २५ दिवसात स्वच्छ केले जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. रहिवासी वस्तीत असलेल्या जलकुंभांच्या परिसरात काही नागरिक अस्वच्छता करतात, तेथेच पाणी भरण्यासाठी येणे आणि कपडे धुणे असे प्रकार करतात. ते होऊ नये यासाठी शांतीनगर व संजयनगर जलकुंभ परिसरात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. साक्रीनाका जलकुंभाच्या परिसरात आणखी उपाययोजना आवश्यक आहे. इतर जलकुंभ हे नवीन व उंचावर असल्याने तेथे कुणी जाऊ शकत नाही.पावसाळ्यात पाईपलाईन लिकेज होणे, व्हाॅल्व्ह नादुरुस्त होणे असे प्रकार होत असल्यामुळे काही भागात अशुद्ध पाणीपुरवठा होतो. परंतु तो देखील वेळीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न असतो. अस्वच्छता आणि अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आणखी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.