शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मोदीसाहेब चहा आवडला, आता लायसनही द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:01 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माङया चहाचे कौतुक केले, त्यातच माझा ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माङया चहाचे कौतुक केले, त्यातच माझा चार दशकातील श्रमाचे सार्थक झाले आहे. आता माङया चहाची चर्चाच सुरू झाली आहे तर पंतप्रधान साहेबांनी मला रेल्वेस्थानकावर चहा विक्रीचे लायसन द्यावे, एवढीच हात जोडून विनंती आहे.’ ही प्रतिक्रिया आहे येथील चार दशकांपासून रेल्वेत चहा विक्री करणा:या रामदास चौधरी या वृद्ध विक्रेत्याची.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यातच नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेविकांशी व्हीडीओ कॉन्फरन्सने चर्चा करताना नंदुरबारच्या चौधरी चहाचा उल्लेख केला होता. तेव्हापासून येथील चौधरी गल्लीत राहणारे रामदास चौधरी हे चर्चेत आले. शुक्रवारी पुन्हा पंतप्रधानांनी शिर्डी येथे घरकूल वाटपाच्या कार्यक्रमात नंदुरबारच्या लाभाथ्र्याशी व्हीडीओ कान्फरन्सने संपर्क साधताना चौधरी चहाचे कौतुक केल्याने या चर्चेत अधिकच भर पडली आहे.नंदुरबारमधील चौधरी गल्लीत रामदास चैत्राम चौधरी हे 70 वर्षीय वृद्ध राहतात. गेल्या 41 वर्षापासून ते रेल्वेत चहा विक्रीचा व्यवसाय करतात. रोज पहाटे साडेपाच वाजता घरुन चहाचे कॅन भरुन नंदुरबार स्थानकावरून हावडा एक्सप्रेसने सुरतकडे जातात. रेल्वेतच ‘चौधरी चहा’च्या नावाने चहा विक्री करतात. प्रवासीदेखील त्यांच्या चहाची प्रतीक्षाच करीत असतात. दुपारी तीन वाजता ते पुन्हा रेल्वेत चहा विक्री करीतच सुरतहून नंदुरबारला परततात. हा त्यांचा नित्याचा उपक्रम. या फेरीत किमान 40 लीटर चहाची विक्री ते करतात.गेल्या महिन्यातच दूरदर्शनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी चहाचे जाहीरपणे कौतुक केले होते. तेव्हापासून रामदास चौधरी हे चर्चेत आलेले व्यक्तिमत्व. अतिशय साधे व्यक्तिमत्व, त्यांचा मिशा या लक्षवेधी आहेत. अनेकवेळा रेल्वेत ते ‘मूछवाले चौधरी की चाय’ या नावानेही चहा विक्री करतात. शुक्रवारी पंतप्रधानांनी पुन्हा त्यांच्या चहाचे कौतुक केल्याने महाराष्ट्रातच नव्हे तर आता देशभरात चौधरी चहा चर्चेची झाली आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, साधारणत: 25-30 वर्षापूर्वी आपण मोदीसाहेबांना नंदुरबार स्थानकावर चहा दिल्याचे आठवते. तेव्हाची आठवण आजही त्यांना असल्याने आपण धन्य झालो. खरेतर या व्यवसायात गेल्या 40 वर्षात आपल्याला काहीच मिळाले नाही. केवळ दोनवेळची गुजराण होते तेवढेच. चहा विक्रीतून दोन पैसे हाती लागतात पण अनेकवेळा निम्मे रक्कम दंड भरण्यातच जाते. आता मोदीसाहेबांनी माङया चहाचे कौतुक केले आहे. हा व्यवसाय आपण सुरू ठेवणारच पण आपल्यानंतर मुलगाही तो चालवणार. माङो तर आयुष्य गेले पण मुलासाठी तरी पंतप्रधानांनी रेल्वेस्थानकावर चहा विक्रीसाठी लायसन दिले किंवा पेन्ट्रीकारमध्ये परवाना दिला तर त्यांचे आपण कायम ऋणी राहू, असे त्यांनी सांगितले.रामदास चौधरी यांचे दोन मुले, पत्नी, सुना असा परिवार आहे. त्यापैकी एक मुलगा सुरेश हा त्यांना या व्यवसायासाठी मदत करतो. त्यांच्यासकट एक रोजंदारी मजूर त्यांनी लावला आहे. पहाटे चार वाजता उठून घरी ते स्वत:च चहा बनवतात. त्यांच्या चहाची चव एकच राहिली आहे. त्याच्यात दूध, साखर, चहाचे प्रमाण एकसारखे ठेवले आहे. त्यात मसालादेखील ते स्वत: बनवतात. त्याचेही प्रमाण चार दशकांपासून सारखेच ठेवले आहे. या कामात त्यांना त्यांची पत्नी मदत करते.