शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशभर कोरोनाचा हाहाकार अन् दुर्गम भागात आरोग्य केंद्र बंद ठेवण्याचा चमत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : जगभरात कोरोनाची साथ सुरु असताना दुर्गम भागात पुन्हा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवली ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : जगभरात कोरोनाची साथ सुरु असताना दुर्गम भागात पुन्हा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे़ राजबर्डी ता़ धडगाव येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच हजेरी देत नसल्याने कोरोनाचे गांभिर्य केवळ कागदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे़सातपुड्याच्या दुर्गम भागातील राजबर्डी या तीन हजार लोकसंख्येच्या गावासह शेलकुवी, राजबर्डी, कामोद, कुकलट, सिंदवाणी सह लगतच्या पाड्यांच्या सोयीसाठी राजबर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे़ गेल्या एक वर्षांपासून येथे वैद्यकीय अधिकारी नियमित येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ नियुक्तीस असलेले इतर सर्व कर्मचारी येथे हजर असतात परंतू वैद्यकीय अधिकारी मात्र दिसून येत नाहीत़ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी कुणी गेल्यास योग्य ती उत्तरे दिली जात नाहीत़ तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने राजबर्डी येथील आरोग्य केंद्र आदिवासी बांधवांसाठी सर्वाधिक सोयीचे आहे़ १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धडगाव येथे जाण्यापेक्षा या केंद्रातच उपचार करणे योग्य मानले जाते़ धडगाव ग्रामीण रुग्णालय तसेच इतर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर होत असताना राजबर्डी येथेच अधिकारी येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़याबाबत आरोग्य विभागाकडे नागरिकांनी तक्रारी करुनही कारवाई करण्यात आलेली नाही़ काही कर्मचारी निवासी असल्याने वेळ मारुन नेली जात आहे़ परंतू वैद्यकीय अधिकारी हे निवासी नसल्याने अडचणी वाढत आहेत़ दरम्यान याबाबत आरोग्य विभागासोबत संपर्क केला असता, तो होवू शकलेला नाही़ कोरोनामुळे क्वारंटाईन कक्षात राजबर्डीचे वैद्यकीय अधिकारी असावेत असे सांगण्यात येत होते़ परंतू तालुक्यातील मांडवी येथे कक्षात ग्रामीण रुग्णालय आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे पथक कार्यरत आहे़ त्यात संबधित अधिकाºयाचा समावेश नाही़दुसरीकडे राजबर्डी आरोग्य केंद्रात येथे नियुक्ती देण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग तपासणी केंद्र आणि कुष्ठरोग कार्यालय यांचा भार देण्यात आला आहे़ यातून वर्षभरापासून त्यांनी येथे पायच ठेवला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़ यामुळे कारवाईची मागणी होत आहे़राजबर्डी हे गाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्मार्ट व्हिलेज योजनेत समाविष्ट गाव आहे़ त्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य सातत्याने बंद राहत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ रविवारीही केंद्र सुरु करण्याचे आदेश असताना केंद्राला टाळे लावल्याचे प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे़