शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

देशभर कोरोनाचा हाहाकार अन् दुर्गम भागात आरोग्य केंद्र बंद ठेवण्याचा चमत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : जगभरात कोरोनाची साथ सुरु असताना दुर्गम भागात पुन्हा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवली ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : जगभरात कोरोनाची साथ सुरु असताना दुर्गम भागात पुन्हा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे़ राजबर्डी ता़ धडगाव येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच हजेरी देत नसल्याने कोरोनाचे गांभिर्य केवळ कागदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे़सातपुड्याच्या दुर्गम भागातील राजबर्डी या तीन हजार लोकसंख्येच्या गावासह शेलकुवी, राजबर्डी, कामोद, कुकलट, सिंदवाणी सह लगतच्या पाड्यांच्या सोयीसाठी राजबर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे़ गेल्या एक वर्षांपासून येथे वैद्यकीय अधिकारी नियमित येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ नियुक्तीस असलेले इतर सर्व कर्मचारी येथे हजर असतात परंतू वैद्यकीय अधिकारी मात्र दिसून येत नाहीत़ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी कुणी गेल्यास योग्य ती उत्तरे दिली जात नाहीत़ तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने राजबर्डी येथील आरोग्य केंद्र आदिवासी बांधवांसाठी सर्वाधिक सोयीचे आहे़ १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धडगाव येथे जाण्यापेक्षा या केंद्रातच उपचार करणे योग्य मानले जाते़ धडगाव ग्रामीण रुग्णालय तसेच इतर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर होत असताना राजबर्डी येथेच अधिकारी येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़याबाबत आरोग्य विभागाकडे नागरिकांनी तक्रारी करुनही कारवाई करण्यात आलेली नाही़ काही कर्मचारी निवासी असल्याने वेळ मारुन नेली जात आहे़ परंतू वैद्यकीय अधिकारी हे निवासी नसल्याने अडचणी वाढत आहेत़ दरम्यान याबाबत आरोग्य विभागासोबत संपर्क केला असता, तो होवू शकलेला नाही़ कोरोनामुळे क्वारंटाईन कक्षात राजबर्डीचे वैद्यकीय अधिकारी असावेत असे सांगण्यात येत होते़ परंतू तालुक्यातील मांडवी येथे कक्षात ग्रामीण रुग्णालय आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे पथक कार्यरत आहे़ त्यात संबधित अधिकाºयाचा समावेश नाही़दुसरीकडे राजबर्डी आरोग्य केंद्रात येथे नियुक्ती देण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग तपासणी केंद्र आणि कुष्ठरोग कार्यालय यांचा भार देण्यात आला आहे़ यातून वर्षभरापासून त्यांनी येथे पायच ठेवला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़ यामुळे कारवाईची मागणी होत आहे़राजबर्डी हे गाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्मार्ट व्हिलेज योजनेत समाविष्ट गाव आहे़ त्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य सातत्याने बंद राहत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ रविवारीही केंद्र सुरु करण्याचे आदेश असताना केंद्राला टाळे लावल्याचे प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे़