शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

देशभर कोरोनाचा हाहाकार अन् दुर्गम भागात आरोग्य केंद्र बंद ठेवण्याचा चमत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : जगभरात कोरोनाची साथ सुरु असताना दुर्गम भागात पुन्हा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवली ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : जगभरात कोरोनाची साथ सुरु असताना दुर्गम भागात पुन्हा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे़ राजबर्डी ता़ धडगाव येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच हजेरी देत नसल्याने कोरोनाचे गांभिर्य केवळ कागदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे़सातपुड्याच्या दुर्गम भागातील राजबर्डी या तीन हजार लोकसंख्येच्या गावासह शेलकुवी, राजबर्डी, कामोद, कुकलट, सिंदवाणी सह लगतच्या पाड्यांच्या सोयीसाठी राजबर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे़ गेल्या एक वर्षांपासून येथे वैद्यकीय अधिकारी नियमित येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ नियुक्तीस असलेले इतर सर्व कर्मचारी येथे हजर असतात परंतू वैद्यकीय अधिकारी मात्र दिसून येत नाहीत़ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी कुणी गेल्यास योग्य ती उत्तरे दिली जात नाहीत़ तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची गावे असल्याने राजबर्डी येथील आरोग्य केंद्र आदिवासी बांधवांसाठी सर्वाधिक सोयीचे आहे़ १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धडगाव येथे जाण्यापेक्षा या केंद्रातच उपचार करणे योग्य मानले जाते़ धडगाव ग्रामीण रुग्णालय तसेच इतर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर होत असताना राजबर्डी येथेच अधिकारी येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़याबाबत आरोग्य विभागाकडे नागरिकांनी तक्रारी करुनही कारवाई करण्यात आलेली नाही़ काही कर्मचारी निवासी असल्याने वेळ मारुन नेली जात आहे़ परंतू वैद्यकीय अधिकारी हे निवासी नसल्याने अडचणी वाढत आहेत़ दरम्यान याबाबत आरोग्य विभागासोबत संपर्क केला असता, तो होवू शकलेला नाही़ कोरोनामुळे क्वारंटाईन कक्षात राजबर्डीचे वैद्यकीय अधिकारी असावेत असे सांगण्यात येत होते़ परंतू तालुक्यातील मांडवी येथे कक्षात ग्रामीण रुग्णालय आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे पथक कार्यरत आहे़ त्यात संबधित अधिकाºयाचा समावेश नाही़दुसरीकडे राजबर्डी आरोग्य केंद्रात येथे नियुक्ती देण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग तपासणी केंद्र आणि कुष्ठरोग कार्यालय यांचा भार देण्यात आला आहे़ यातून वर्षभरापासून त्यांनी येथे पायच ठेवला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़ यामुळे कारवाईची मागणी होत आहे़राजबर्डी हे गाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्मार्ट व्हिलेज योजनेत समाविष्ट गाव आहे़ त्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य सातत्याने बंद राहत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ रविवारीही केंद्र सुरु करण्याचे आदेश असताना केंद्राला टाळे लावल्याचे प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे़