शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नंदुरबार गारठले, किमान तापमान आठ अंशाखाली; रब्बी पिकांना हे वातावरण लाभदायी ठरणार

By मनोज शेलार | Updated: January 18, 2024 17:42 IST

गेल्या दोन दिवसांपासून गारठ्यात वाढ झाली असून किमान तापमान आठ अंशाखाली गेले आहे.

मनोज शेलार

नंदुरबार : गेल्या दोन दिवसांपासून गारठ्यात वाढ झाली असून किमान तापमान आठ अंशाखाली गेले आहे. सातपुड्याच्या डोंगराळ भागात तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे मात्र रब्बी पिकांना हे वातावरण लाभदायी ठरणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केेले.

 यंदाच्या हिवाळ्यात अपेक्षित गारठा जाणवलाच नाही. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला किमान तापमान ७ अंशांवर गेले होते. त्यानंतर मात्र थंडी जाणवली नाही. ढगाळ वातावरण, पावसाचा शिडकावा आणि त्यामुळे वाढलेली आर्द्रता परिणामी थंडीचे प्रमाण कमी झाले होते. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना फटका बसला होता. थंडीचे प्रमाण वाढावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत होती. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यात थंडी वाढल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

जानेवारी अखेरपर्यंत थंडीचे प्रमाण कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. नंदुरबारचे गुरुवारचे किमान तापमान ७.९ अंश सेल्सियस नोंदले गेले. कमाल तापमान २९ अंश होते. सातपुड्यातील डोंगराळ भागात सपाटी भागापेक्षा कमी अर्थात ७.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सातपुड्याचे उंच ठिकाण असलेले तोरणमाळ व डाब येथेदेखील थंडीचा कडाका वाढला आहे. डोंगराळ भागात पहाटे दवबिंदूचे प्रमाणदेखील अधिक राहत आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत धुकेदेखील राहत असल्याचे चित्र आहे.