शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

कुपोषित बालकांसाठीची लाखो रुपयांची यंत्रसामूग्री धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी खास ‘स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट’ अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्यातील अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी खास ‘स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट’ अर्थात एनबीसीयूची मंजुरी मिळून त्यासाठी लाखो रुपयांची यंत्रसामग्री आली असली तरी दोन वर्षांपासून ती धूळखात पडून आहे. एकीकडे योग्य उपचाराअभावी बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याने दुसरीकडे यंत्रसामग्री वापराविना पडून आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या जिल्ह्याला बालराेग तज्ज्ञाचीच नियुक्ती का होत नाही हा देखील संशाेधनाचा विषय ठरला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कुपाेषणाचे प्रमाण जास्त असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यासाठी अनेक विशेष कार्यक्रम, प्रयोग व शासन स्तरावरून उपाययोजना सुरू आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या देखील त्यासाठी पुढाकार मिळत आहे. असे असतानाही प्रशासन यासंदर्भात इतके बेपर्वाईने का वागते? हा प्रश्न आता जाणकार करू लागले आहे. त्याचे वास्तव उदाहरण म्हणजे एनबीसीयू युनिट. या युनिटला मान्यता मिळून दोन वर्षांपासून यंत्रसामग्री अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाला आली आहे. त्यासाठी काही पदेही भरण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात संबंधित कर्मचारी युनिट कार्यान्वित न झाल्याने दुसऱ्याच विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. या ठिकाणी बालरोगतज्ज्ञ भरला जात नसल्याने हे युनिट कार्यान्वित न झाल्याचे म्हटले आहे. येथील अर्धी सामग्री धडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठिवण्यात आल्याचेही सांगितले जाते. मात्र, तेथे देखील ते धूळखातच आहे.

वास्तविक जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. वर्षानुवर्षांपासून ही समस्या आहे. असे असताना ग्रामीण रुग्णालयात एकाही बालरोगतज्ज्ञाची नियुक्ती होत नाही. ही शोकांतिका आहे. कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ मिळत नसेल तर मानधनावर अथवा तात्पुरती नियुक्ती होणे अपेक्षित आहे; पण त्याबाबतही कार्यवाही होत नाही. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कमी वजनाचे बाळ, पूर्ण विकसित न झालेले बाळ, जन्माला येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा बालकांसाठी एनबीसीयू युनिट कार्यान्वित होणे गरजेचे आहे; पण यंत्रसामग्री मिळाल्यानंतरही ते सुरू होऊ नये, ही गंभीर बाब आहे.

मुळातच कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने पाहिले जात नसल्याने हा प्रश्न कमी हाेण्याऐवजी वाढतच असल्याचे आजवरचा अनुभव आहे. गेल्या वर्षीदेखील पोषण आहार तब्बल दोन महिने उशिरा पोहोचला. त्यामुळे कुपोषित बालकांची संख्याही वाढली होती. त्याबाबत वृत्तपत्रांतून चर्चा झाल्याने शासनाची चौकशी समिती नियुक्त झाली. जिल्हा परिषद स्तरावर व राज्यस्तरावर त्याची चौकशी झाली. यासंदर्भात ठपकाही ठेवण्यात आला. महिला बालकल्याण विकासमंत्र्यांनी तर काही अधिकाऱ्यांवर दोषारोप करून कारवाईचे आदेश काढले; पण कुणावरही कारवाई झाली नाही. हे चक्र वर्षानुवर्षे सुरू आहे. दोषी यंत्रणेला पाठीशी घातले जात असल्याने सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र आहे; पण हे चित्र आता बदलण्याची आवश्यकता आहे. अन्यथा लोकांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्यास त्याचे वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील.