शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांसाठीची लाखो रुपयांची यंत्रसामूग्री धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी खास ‘स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट’ अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्यातील अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी खास ‘स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट’ अर्थात एनबीसीयूची मंजुरी मिळून त्यासाठी लाखो रुपयांची यंत्रसामग्री आली असली तरी दोन वर्षांपासून ती धूळखात पडून आहे. एकीकडे योग्य उपचाराअभावी बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याने दुसरीकडे यंत्रसामग्री वापराविना पडून आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या जिल्ह्याला बालराेग तज्ज्ञाचीच नियुक्ती का होत नाही हा देखील संशाेधनाचा विषय ठरला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कुपाेषणाचे प्रमाण जास्त असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यासाठी अनेक विशेष कार्यक्रम, प्रयोग व शासन स्तरावरून उपाययोजना सुरू आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या देखील त्यासाठी पुढाकार मिळत आहे. असे असतानाही प्रशासन यासंदर्भात इतके बेपर्वाईने का वागते? हा प्रश्न आता जाणकार करू लागले आहे. त्याचे वास्तव उदाहरण म्हणजे एनबीसीयू युनिट. या युनिटला मान्यता मिळून दोन वर्षांपासून यंत्रसामग्री अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाला आली आहे. त्यासाठी काही पदेही भरण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात संबंधित कर्मचारी युनिट कार्यान्वित न झाल्याने दुसऱ्याच विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. या ठिकाणी बालरोगतज्ज्ञ भरला जात नसल्याने हे युनिट कार्यान्वित न झाल्याचे म्हटले आहे. येथील अर्धी सामग्री धडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठिवण्यात आल्याचेही सांगितले जाते. मात्र, तेथे देखील ते धूळखातच आहे.

वास्तविक जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. वर्षानुवर्षांपासून ही समस्या आहे. असे असताना ग्रामीण रुग्णालयात एकाही बालरोगतज्ज्ञाची नियुक्ती होत नाही. ही शोकांतिका आहे. कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ मिळत नसेल तर मानधनावर अथवा तात्पुरती नियुक्ती होणे अपेक्षित आहे; पण त्याबाबतही कार्यवाही होत नाही. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कमी वजनाचे बाळ, पूर्ण विकसित न झालेले बाळ, जन्माला येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा बालकांसाठी एनबीसीयू युनिट कार्यान्वित होणे गरजेचे आहे; पण यंत्रसामग्री मिळाल्यानंतरही ते सुरू होऊ नये, ही गंभीर बाब आहे.

मुळातच कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी गांभीर्याने पाहिले जात नसल्याने हा प्रश्न कमी हाेण्याऐवजी वाढतच असल्याचे आजवरचा अनुभव आहे. गेल्या वर्षीदेखील पोषण आहार तब्बल दोन महिने उशिरा पोहोचला. त्यामुळे कुपोषित बालकांची संख्याही वाढली होती. त्याबाबत वृत्तपत्रांतून चर्चा झाल्याने शासनाची चौकशी समिती नियुक्त झाली. जिल्हा परिषद स्तरावर व राज्यस्तरावर त्याची चौकशी झाली. यासंदर्भात ठपकाही ठेवण्यात आला. महिला बालकल्याण विकासमंत्र्यांनी तर काही अधिकाऱ्यांवर दोषारोप करून कारवाईचे आदेश काढले; पण कुणावरही कारवाई झाली नाही. हे चक्र वर्षानुवर्षे सुरू आहे. दोषी यंत्रणेला पाठीशी घातले जात असल्याने सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र आहे; पण हे चित्र आता बदलण्याची आवश्यकता आहे. अन्यथा लोकांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्यास त्याचे वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील.