शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

स्थलांतरामुळे खोडसगाव पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नेहमीच गजबजणारे खोडसगाव ता. नंदुरबार येथील बहुतांश नागरिक रोजगारानिमित्त परराज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नेहमीच गजबजणारे खोडसगाव ता. नंदुरबार येथील बहुतांश नागरिक रोजगारानिमित्त परराज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या गावात शुकशुकाट दिसून येत आहे.नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव या गावात तसे विविध समाजाचे वास्तव्य आहे. असे असले तरी तेथे नेहमीच सौख्याचे वातावण दिसून येते. शिवाय समाज अथवा जातीचा कुठलाही विचार न करता एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येक समाज बांधव पार पाडत आहे. हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने फारसे मोठे नसून तेथील लोकसंख्या एकुण एक हजार ३६१ असल्याचे आढळून आले आहेत. तत ७०३ पुरुष तर ६५८ महिलांचा समावेश आहे.खोडसगाव परिसरात काही प्रमाणातील शेतीची कामे वगळता अन्य कुठलीही कामे नसल्यामुळे तेथील मजूरांना स्थानिक ठिकाणी वेळेवर व अपेक्षेनुसार रोजगार मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूने गुजरातमध्ये निश्चितच रोजगार मिळतो शिवाय तो रोजगार समाधानकारकही असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे खोडसगाव येथील बहुसंख्य मजूर सौराष्टÑात स्थलांतरीत झाले आहेत. परिणामी खोडसगाव येथे सद्यस्थितीत शुकशुकाट दिसून येत आहे. नेहमीच गजबजणाºया या गावात प्रत्येक गल्ल्यांमध्ये ठराविकच नागरिक दिसून येत आहे. हे नागरिक घराचा सांभाळ करण्यासाठी तसेच काही पशुधनाच्या सेवेसाठी थांबल्याचे सांगण्यात आले.सौराष्टÑात आॅक्टोबरमध्ये भूईमुगच्या शेंगा काढण्यात येत होत्या. त्यानंतर भात कापणीला सुरुवात झाली. भात कापणीचा हंगाम आटाक्यात आला असतानाच पुन्हा कापूस वेचणीला सुरुवात झाली. त्यामुळे तेथे रोजगार सहजच उपलब्ध होत असल्याचे म्हटले जात आहे. कापूस वेचणीशिवाय गुजरातमध्ये ऊसतोड कामासाठी देखील अपेक्षेनुसार रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे खोडसगाव येथील मजूर तेथे स्थलांतरीत झाल्याचे म्हटले जात आहे.खोडसगावसह त्या परिसरातील अन्य गावांमधूनही बहुसंख्य मजूर स्थलांतरीत झाल्याचे आढळून आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या या स्थलांतरामुळे शासनाकडूनही रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला नसावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. अशा स्थलांतरामुळे या मजूर बांधवांमध्ये काही समस्या निर्माण होतात. अशा समस्यांमधून या मजूरांची सुटका करण्यासाठी किंवा समस्याच उदघभवू नये, यासाठी प्रशासनामार्फत विशेष काळजी घेणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन स्थरावरुन याबाबत कुठल्या उपययोजना करण्यात येतात, याकडे लक्ष लागले आहे.खोडसगाव येथे जिल्हा परिषदेची मराठी शाळा सुरू करण्यात आली असून सद्यस्थितीत तेथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू आहे. तेथे एकुण १८४ विद्यार्थी असल्याचे आढळून आले आहेत. एकुण विद्यार्थ्यांपैकी गुजरातमध्ये स्थलांतरीत झालेल्या पालकांसोबत १४ विद्यार्थी देखील स्थलांतरीत झालेत. परंतु हे विद्यार्थी अधूनमधून त्यांच्या अजी-आजोबांकडे परत येतही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थलांतरीत झाले असले तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.