शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्ह्यातील रोजगारासाठी स्थलांतराचे प्रमाण चिंताजनक, कुपोषणाचे प्रमाणही वाढले; कुपोषित बालकांची संख्या १४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

नंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराची कुठलीही साधने नसल्याने दरवर्षी परराज्यात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची संख्याही वाढतच आहे. विशेष म्हणजे जून महिन्याच्या ...

नंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराची कुठलीही साधने नसल्याने दरवर्षी परराज्यात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची संख्याही वाढतच आहे. विशेष म्हणजे जून महिन्याच्या पूर्वी ही स्थलांतरित कुटुंबे परत येतात असा समज आहे. पण यंदा लॉकडाऊन असतानाही जूनमध्ये करण्यात आलेल्या कुपोषित बालकांच्या स्किनिंग सर्वेक्षणात तब्बल १३ टक्क्यांहून अधिक बालके स्थलांतरित झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात मजुरांच्या स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी दिवाळीनंतर रोजगारासाठी सुमारे एक लाखाहून अधिक कुटुंबे स्थलांतरित होतात. परंतु याबाबतची अधिकृत नोंद शासन स्तरावर राहत नाही. यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनातही साधारणत: अडीच दशकांपूर्वी प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री गो. शि. चौधरी यांनी असे कुठलेही स्थलांतर होत असल्याची नोंद शासन दरबारी नसल्याचे म्हटले होते. अर्थातच स्थलांतराचे सर्वेक्षण होत नाही. त्यामुळे प्रशासनाकडेही त्याची अधिकृत नोंद राहत नाही. नोंदच नसल्याने उपाययोजनाही होत नाहीत, असे आजवरचे चित्र आहे.

यावर्षी लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी परत आलेले मजूर जाणार नाहीत असा समज होता. पण प्रत्यक्षात मात्र हा समज खोटा ठरला आहे. कारण अनेक मजूर पुन्हा रोजगारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. सध्या कुपोषित बालकांचे स्किनिंग सर्वेक्षण सुरू आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक बालकापर्यंत टीम पोहोचत आहे. १ जून ते १० जुलै २०२१ दरम्यान धडगाव, अक्कलकुवा, शहादा आणि तळोदा या चार तालुक्यांतील स्किनिंग झाले आहेत. या तालुक्यात एकूण एक लाख आठ हजार ७५० शून्य ते सहा वर्षांची मुले आहेत. परंतु त्यापैकी केवळ ९४ हजार ९२ मुले स्किनिंग पथकाला स्किनिंग करता आली. १४ हजार ५२४ मुले पालकांसोबत स्थलांतरित झाल्याने त्यांचे स्किनिंग करता आले नाही. अर्थातच या सर्वेक्षणातून कुपोषित बालकांची माहिती तर मिळालीच पण त्यासोबत अनेक कुटुंबे स्थलांतरित झाल्याचेही समोर आले आहे. वास्तविक जून महिन्यात अर्थात पावसाळ्यापूर्वी सर्व स्थलांतरित कुटुंबे आपल्या गावी परततात. पण यंदा जवळपास या चार तालुक्यातील १० हजार कुटुंबे स्थलांतरितच असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन काळातील ही स्थिती निश्चितच चिंताजनक आहे.

जिल्ह्यातील कुपोषण व स्थलांतराची स्थिती अशी

तालुका एकूण बालकेअतितीव्र कुपोषितकुपोषितस्थलांतर

अक्कलकुवा ३६,६६२ ७५९ ३,७८४४,७९९

धडगाव ३१,५१४ ७१८ ३,१३४५,४९४

तळोदा१२,१७८ ३०७ १,५८८१,४५०

शहादा२८,६९६ ४५८ २,६६१२,७८१

एकूण१,०८,७५०२,२४२११,१६७१४,५२४