शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत मजूरांना परत आणणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोट भरण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या असंघटित मजुरांच्या समस्येवर सुरू असलेले राजकारण चुकीचे असून या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोट भरण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या असंघटित मजुरांच्या समस्येवर सुरू असलेले राजकारण चुकीचे असून या मजुरांना त्यांच्या मूळ गावात परत आणणे गरजेचे असल्याचे मत लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले आहे़ परराज्यात अडकलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी त्यांनी केली आहे़प्रतिभा शिंदे यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार स्थलांतरीत मजूर ज्या शहरांमध्ये काम करत आहेत़ त्याठिकाणी त्यांच्या राहण्याच्या जागा अत्यंत अस्वच्छ आणि अनारोग्यदायी आहेत़ लॉकडाऊन काळात अशा जागांमध्ये राहणे त्यांच्यासाठी नरकयातना समान आहे़ राज्यातील तसेच परराज्यातील शेती व ऊस कारखान्यातील मजूर शेत किंवा कारखान्यांच्या आवारात राहत आहेत़ त्याठिकाणी कोरोनाने अद्याप हातपाय पसलेले नाहीत़ अनेक मजूरांना मालकाने पूर्ण मजूरी न देताच काम बंद केले आहे़ शेतात मजूरी करणाऱ्या मजूरांना रोख मजूरी मिळणे बंद झाले आहे़ यातून त्यांची परवड वाढली आहे़ यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देवून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे़दरम्यान जे मजूर हिंमत करून पायी रस्त्यावर निघून पडलेत त्यांना रस्त्यात अडवून सरकारने निवारा गृहात ठेवले आहे़ ही माहिती मिळाल्यानंतर वाटेवर असलेल्या इतर मजूरांनी मिळेल त्या ठिकाणी राहणे पसंत केले आहे़ काही जण रस्त्यावर तर काही जण झाडांखाली राहून वेळ काढत आहेत़ यामुळे लहान बालके, गर्भवती माता यांचे प्रचंड हाल सुरु असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे़लगतच्या गुजरात राज्यासह मध्यप्रदेश राज्यात अडकलेल्या मजूरांना राज्य शासनाने वाहनांद्वारे आणण्यास काहीच हरकत नसल्याचे प्रतिभा शिंदे यांनी म्हटले आहे़ दरम्यान लोकसंघर्ष मोर्चाकडून जिल्ह्यातून परजिल्ह्यात तसेच परराज्यात गेलेल्या मजूरांचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़