शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

एमआयडीसीचे भिजत घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:52 IST

जनतेच्या जिव्हाळ््याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

नंदुरबार : जिल्हा निर्मितीपासून रेंगाळलेली एमआयडी अद्यापही चालना घेत नसल्याची स्थिती आहे. उद्योग नसल्यामुळे जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नवापूरची एमआयडीसी रडत-रखडत सुरू आहे.नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सातत्याने विचार झाला. त्याअनुषंगाने प्रत्येक तालुका स्तरावर औद्योगिक विकास वसाहत उभारण्याचा प्रयत्न झाला. मात्र नवापूर वगळता अजूनही या औद्योगिक वसाहती सुरू झाल्या नाहीत. नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणीदेखील औद्योगिक वसाहतीची शोकांतीका आहे. दुर्देव म्हणजे येथील औद्योगिक विकास वसाहतीचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. मोठ्या थाटात औद्योगिक वसाहतीची कोनशिलाही उभारण्यात आली. पण प्रत्यक्षात तेथे औद्योगिक वसाहतीचे कामच सुरू झाले नाही. आता पुन्हा दुसऱ्यांदा औद्योगिक वसाहतीची जागा बदलण्यात आली असून, टोकरतलाव रस्त्याऐवजी भालेर रस्त्यावर ती उभारण्यात येत असली तरी तिची गती संथ आहे. नवापूर येथे सुरू असलेल्या एमआयडीसीमध्ये उद्योजकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर काही स्थलांतर होण्याच्या स्थितीत आहेत.शहादा, तळोद्याची एमआयडीसीचा प्रस्ताव अद्याप लाल फितीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला कशी आणि कोणती चालना मिळणार याबाबत शंकाच आहे.